शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
3
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
4
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
5
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
9
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
10
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
11
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
12
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
13
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
14
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
15
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
16
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
17
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
18
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
19
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
20
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...

काडवली-निरबाडे पुलावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

चिपळूण : खेड तालुक्यातील काडवली व निरबाडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये ...

चिपळूण : खेड तालुक्यातील काडवली व निरबाडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून, वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. या विषयाकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

खेड तालुक्यातील काडवलीकडे जाण्यासाठी निरबाडे हा जवळचा मार्ग आहे. या दरम्यान नदी वाहात असून, २६ जुलै २००५च्या अतिवृष्टीत या नदीवरील साकव वाहून गेल्याने या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. काडवली येथून निरबाडे हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली होती. या विद्यार्थ्यांना आंबडसमार्गे पालीफाट्यावरून हायस्कूलला जावे लागत असे. हा मार्ग लांबचा असल्याने पालक व ग्रामस्थांमधून दोन गावांना जोडणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी जोरदार मागणी होऊ लागली.

लोकांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून काही महिन्यातच काडवली - निरबाडे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात आला. मात्र, या पुलावरील काँक्रीट निघून गेल्याने खड्डे पडले आहेत.

या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. पर्यायाने वाहन वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या वरील खड्डे भरण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थांमधून केला जात आहे.