शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

पितृपंधरवड्यात भाेपळा खाताेय भाव, भाज्यांचा विशेष खप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:34 AM

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांना वाढती मागणी आहे. परजिल्ह्यांतून आलेल्या भाज्यांचा बाजार समिती ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांना वाढती मागणी आहे. परजिल्ह्यांतून आलेल्या भाज्यांचा बाजार समिती आवारात लिलाव झाल्यानंतर भाज्या शहरात व आसपासच्या गावात विक्रीसाठी येतात. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री यामध्ये मात्र प्रचंड तफावत आहे. नाईलाजास्तव ग्राहकांना दामदुप्पट किमतीने भाज्यांची खरेदी करावी लागत आहे.

पितृपंधरवड्यामुळे ‘म्हाळ’ घालण्याची प्रथा आहे. त्यावेळी जेवण देण्यात येत असल्याने या दिवसात भाज्यांचा विशेष खप होतो. भोपळ्याचा वापर भाजी बरोबर कोशिंबीर तसेच वड्यासाठी केला जात असल्याने भोपळ्याला विशेष मागणी आहे. भोपळ्यासह अन्य भाज्यांचाही खप वाढला आहे. बाजारात गावठी भाज्याही विक्रीसाठी येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील दर व प्रत्यक्ष बाजारातील दरात फरक असून, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मात्र दरावर कोणाचे नियंत्रण नसल्याने ग्राहकांना विक्रेते सांगतील, त्या दराने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. वड्यासाठी भोपळ्यासह काकडीचा वापर केला जात असल्याने मोठ्या काकड्यांचा खप वाढला आहे. मात्र, नगावर विक्री सुरू असून ३० ते ४० रुपये दराने काकडी विक्री सुरू आहे. चिबूड, हळदीची पाने, अळूची पाने यांनाही मागणी वाढली आहे.

इंधन दरात सातत्याने वाढ होत असून, हमालीसाठीही पैसे मोजावे लागत असल्याने विक्रीवर परिणाम होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून शहर व आसपासच्या भागात विक्रीसाठी जावे लागत असल्याने वाहतूक खर्च वाढत आहे. त्यामुळे साहजिकच लिलावच्या दरात विक्री करणे परवडत नाही.

- संतोष रेवाळे, रत्नागिरी

लिलावावेळी किमान दहा किलोच्या दरात भाज्यांची खरेदी करावी लागते. एकाच दिवशी भाज्या संपत नाहीत, नाशवंत माल असल्यामुळे भाज्या लवकर संपवाव्या लागतात अन्यथा भुर्दंड आम्हालाच बसतो. एकूणच वाहतूकखर्च, हमाली व अन्य खर्चाची सांगड घालूनच विक्री करावी लागत आहे.

- प्रशांत चव्हाण, खंडाळा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दहा किलोच्या पटीत भाज्यांचा लिलाव होत असल्याने किरकोळ खरेदीसाठी बाजार समितीत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे विक्रेते सांगतील तो दर देऊन भाज्यांची खरेदी करावी लागत आहे. दरावर शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

- सुहानी पाथरे, रत्नागिरी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांचा लिलाव झाल्यानंतर शहर व परिसरात भाज्यांची विक्री केली जाते. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री यामध्ये फरक पडतो. वाहतूक व अन्य खर्च वगळला तरी भाज्या दामदुप्पट किमतीने विकल्या जात असल्याने ग्राहक व शेतकरी यामध्ये भरडला जात आहे.

- वृषाली माेरे, कोतवडे

पालेभाज्यांची जुडी २५ ते ३० रुपये, माॅल, बाजार समितीत १० ते १२ रुपये दराने विक्री होते.

किलोवर भाेपळा स्वस्त आहे. किरकोळ भोपळ्याची शेड १० ते १५ रुपये दराने उपलब्ध आहे.

दोडके, पडवळ, दुधी भोपळे नगावर स्वस्त असले तरी किलोवर महाग पडत आहेत.