शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पितृपंधरवड्यात भाेपळा खाताेय भाव, भाज्यांचा विशेष खप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांना वाढती मागणी आहे. परजिल्ह्यांतून आलेल्या भाज्यांचा बाजार समिती ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांना वाढती मागणी आहे. परजिल्ह्यांतून आलेल्या भाज्यांचा बाजार समिती आवारात लिलाव झाल्यानंतर भाज्या शहरात व आसपासच्या गावात विक्रीसाठी येतात. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री यामध्ये मात्र प्रचंड तफावत आहे. नाईलाजास्तव ग्राहकांना दामदुप्पट किमतीने भाज्यांची खरेदी करावी लागत आहे.

पितृपंधरवड्यामुळे ‘म्हाळ’ घालण्याची प्रथा आहे. त्यावेळी जेवण देण्यात येत असल्याने या दिवसात भाज्यांचा विशेष खप होतो. भोपळ्याचा वापर भाजी बरोबर कोशिंबीर तसेच वड्यासाठी केला जात असल्याने भोपळ्याला विशेष मागणी आहे. भोपळ्यासह अन्य भाज्यांचाही खप वाढला आहे. बाजारात गावठी भाज्याही विक्रीसाठी येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील दर व प्रत्यक्ष बाजारातील दरात फरक असून, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मात्र दरावर कोणाचे नियंत्रण नसल्याने ग्राहकांना विक्रेते सांगतील, त्या दराने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. वड्यासाठी भोपळ्यासह काकडीचा वापर केला जात असल्याने मोठ्या काकड्यांचा खप वाढला आहे. मात्र, नगावर विक्री सुरू असून ३० ते ४० रुपये दराने काकडी विक्री सुरू आहे. चिबूड, हळदीची पाने, अळूची पाने यांनाही मागणी वाढली आहे.

इंधन दरात सातत्याने वाढ होत असून, हमालीसाठीही पैसे मोजावे लागत असल्याने विक्रीवर परिणाम होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून शहर व आसपासच्या भागात विक्रीसाठी जावे लागत असल्याने वाहतूक खर्च वाढत आहे. त्यामुळे साहजिकच लिलावच्या दरात विक्री करणे परवडत नाही.

- संतोष रेवाळे, रत्नागिरी

लिलावावेळी किमान दहा किलोच्या दरात भाज्यांची खरेदी करावी लागते. एकाच दिवशी भाज्या संपत नाहीत, नाशवंत माल असल्यामुळे भाज्या लवकर संपवाव्या लागतात अन्यथा भुर्दंड आम्हालाच बसतो. एकूणच वाहतूकखर्च, हमाली व अन्य खर्चाची सांगड घालूनच विक्री करावी लागत आहे.

- प्रशांत चव्हाण, खंडाळा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दहा किलोच्या पटीत भाज्यांचा लिलाव होत असल्याने किरकोळ खरेदीसाठी बाजार समितीत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे विक्रेते सांगतील तो दर देऊन भाज्यांची खरेदी करावी लागत आहे. दरावर शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

- सुहानी पाथरे, रत्नागिरी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांचा लिलाव झाल्यानंतर शहर व परिसरात भाज्यांची विक्री केली जाते. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री यामध्ये फरक पडतो. वाहतूक व अन्य खर्च वगळला तरी भाज्या दामदुप्पट किमतीने विकल्या जात असल्याने ग्राहक व शेतकरी यामध्ये भरडला जात आहे.

- वृषाली माेरे, कोतवडे

पालेभाज्यांची जुडी २५ ते ३० रुपये, माॅल, बाजार समितीत १० ते १२ रुपये दराने विक्री होते.

किलोवर भाेपळा स्वस्त आहे. किरकोळ भोपळ्याची शेड १० ते १५ रुपये दराने उपलब्ध आहे.

दोडके, पडवळ, दुधी भोपळे नगावर स्वस्त असले तरी किलोवर महाग पडत आहेत.