शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

कोकणच्या आर्थिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यांच्या विविधांगी विकासाकरिता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सहकार्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची ...

रत्नागिरी : जिल्ह्यांच्या विविधांगी विकासाकरिता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सहकार्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. कोकणचे सुपुत्र खासदार डॉ. सुरेश प्रभू यांच्या विशेष प्रयत्नांमुळे व सातत्याने केलेल्या आग्रहामुळे देशातील निवडक सहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश या पथदर्शी प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. कोकणच्या विविध प्रश्नांचे अभ्यासक ॲड. विलास पाटणे यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काजू आणि आंबा उत्पादनाला तसेच खेकडा आणि मत्स्यशेती व पर्यटन या व्यवसायांचा विकास करण्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुर्लक्षित नैसर्गिक संसाधने, सेवाक्षमता आणि कौशल्य यांचा उपयोग करून विकासाची वाटचाल करण्यात येईल. लखनौ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषद यांनी हे जिल्हा विकास आराखडे बनविले असून, मुजफ्फरपूर (बिहार), वाराणसी (उत्तरप्रदेश), सोलान (हिमाचल प्रदेश) आणि विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) या अन्य चार जिल्ह्यांचाही पथदर्शी प्रकल्पात समावेश आहे.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम हे संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्वाचे अंग आहे. संस्था सक्षमीकरण, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण व ऊर्जा संवर्धन इत्यादी क्षेत्रात कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीचे उल्लेखनीय कार्य या संस्थेने केले आहे. खासदार प्रभू यांनी 'यूएनडीपी'कडे जिल्हा विकास योजनेचा प्रस्ताव पाठवला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना लिहिलेल्या पत्रात 'यूएनडीपी'चे प्रशासक आचिम स्टाईनर यांनी २०१९ च्या मार्च महिन्यात भारतभेटीच्या वेळी खासदार प्रभू यांच्याशी या विषयावर झालेल्या चर्चेच्या आठवणीलाही उजाळा दिला आहे. खासदार प्रभू यांच्या प्रयत्नामुळे कोकणात मार्गी लागत असलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा आशावाद ॲड. विलास पाटणे यानी व्यक्त केला आहे.