शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोकणच्या आर्थिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यांच्या विविधांगी विकासाकरिता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सहकार्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची ...

रत्नागिरी : जिल्ह्यांच्या विविधांगी विकासाकरिता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सहकार्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. कोकणचे सुपुत्र खासदार डॉ. सुरेश प्रभू यांच्या विशेष प्रयत्नांमुळे व सातत्याने केलेल्या आग्रहामुळे देशातील निवडक सहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश या पथदर्शी प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. कोकणच्या विविध प्रश्नांचे अभ्यासक ॲड. विलास पाटणे यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काजू आणि आंबा उत्पादनाला तसेच खेकडा आणि मत्स्यशेती व पर्यटन या व्यवसायांचा विकास करण्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुर्लक्षित नैसर्गिक संसाधने, सेवाक्षमता आणि कौशल्य यांचा उपयोग करून विकासाची वाटचाल करण्यात येईल. लखनौ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषद यांनी हे जिल्हा विकास आराखडे बनविले असून, मुजफ्फरपूर (बिहार), वाराणसी (उत्तरप्रदेश), सोलान (हिमाचल प्रदेश) आणि विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) या अन्य चार जिल्ह्यांचाही पथदर्शी प्रकल्पात समावेश आहे.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम हे संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्वाचे अंग आहे. संस्था सक्षमीकरण, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण व ऊर्जा संवर्धन इत्यादी क्षेत्रात कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीचे उल्लेखनीय कार्य या संस्थेने केले आहे. खासदार प्रभू यांनी 'यूएनडीपी'कडे जिल्हा विकास योजनेचा प्रस्ताव पाठवला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना लिहिलेल्या पत्रात 'यूएनडीपी'चे प्रशासक आचिम स्टाईनर यांनी २०१९ च्या मार्च महिन्यात भारतभेटीच्या वेळी खासदार प्रभू यांच्याशी या विषयावर झालेल्या चर्चेच्या आठवणीलाही उजाळा दिला आहे. खासदार प्रभू यांच्या प्रयत्नामुळे कोकणात मार्गी लागत असलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा आशावाद ॲड. विलास पाटणे यानी व्यक्त केला आहे.