शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना कायमचे कुलूप?

By admin | Updated: November 25, 2014 00:32 IST

जिल्हा परिषद : ११३९ विद्यालयांची वाचण्यासाठी धडपड

रहिम दलाल- रत्नागिरी =जिल्हा परिषदेच्या १ ते २० पटाच्या ११३९ प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ अत्यल्प पटसंख्या असलेल्या या शाळांमध्ये चालू वर्षात ६५ शाळांची वाढ झाल्याने शिक्षण विभागाकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे़ यामध्ये १ लाख ७ हजार ६३८ विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत़ मात्र, ही पटसंख्या प्रत्येक शैक्षणिक वर्षात घटत चालल्याने शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ डोंगराळ, अतिदुर्गम भागातील अत्यल्प पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आरटीईचा फटका बसणार असल्याने शैक्षणिक क्षेत्रात याबाबत जोरदार चर्चा नेहमीच सुरु असते़ ग्रामीण भागातही खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक शाळांची संख्या वाढत असून, त्याकडे पालकवर्ग आकर्षित होत आहे़ तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते़जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येत असतानाही खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ चिंतेची स्थिती निर्माण करणारी आहे़ जिल्हा परिषदेच्या ११३९ प्राथमिक शाळांची स्थिती बिकट असून, त्या कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामध्ये मराठी १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ४६६, तर ११ ते २० पटसंख्या असलेल्या ६७३ शाळा आहेत़ जिल्हा परिषदेकडून मोफत पाठ्यपुस्तकांसह गणवेश देऊनही संपूर्ण शिक्षण मोफत असताना या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंंता व्यक्त करण्यात येत आहे़ येत्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांचीच कमीजिल्हा परिषद शाळांमधील प्रत्येक वर्षी घट होत चाललेली पटसंख्या ही लोकसंख्या कमी होत असल्याचे कारण शिक्षण विभागाकडून पुढे करण्यात येत आहे़ मात्र, प्रत्यक्षात खासगी शैक्षणिक संस्थांच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांची संख्याही वाढत चालली आहे़ जिल्हा परिषद शाळांमधील प्रत्येक वर्षी घट होत चाललेली पटसंख्या ही लोकसंख्या कमी होत असल्याचे कारण शिक्षण विभागाकडून पुढे करण्यात येत आहे़ मात्र, प्रत्यक्षात खासगी शैक्षणिक संस्थांच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांची संख्याही वाढत चालली आहे़ चालू शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या गतवर्षीपेक्षा १२००ने घटली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची एकूण स्थिती पाहता यावर्षी इयत्ता पाचवीचे ७१२ आणि इयत्ता आठवीचे ३२४ नवीन वर्ग जोडण्यात आले. इयत्ता पाचवी व आठवीचे नवीन वर्ग जोडले नसते तर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असती.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण असतानाही विद्यार्थीसंख्या वाढत नसल्याने विद्यार्थीवाढीसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. शासनाचा खासगीकरणाकडे कल असल्याने खासगी शाळांना मोठ्या प्रमाणात मंजूरी देण्यात आहे.मागील शैक्षणिक वर्षामध्ये १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या १०७४ होती. मात्र, चालू शैक्षणिक वर्षामध्ये ही संख्या कमी होण्याऐवजी त्यामध्ये ६५ शाळांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता ही ११३९ शाळा झाली आहे. पटसंख्या घट होण्याच्या शाळांचा आखेर वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुका १ ते १० ११ ते २०पटसंख्या असलेल्या शाळामंडणगड४०३९दापोली५५७९खेड८४९२चिपळूण५३९४गुहागर२८४५संगमेश्वर७२१०५रत्नागिरी३९७१लांजा३३५७राजापूर६२९१एकूण-४६६६७३