शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

आधुनिक तंत्रज्ञानातून बारमाही शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मूळ बांधकाम क्षेत्रात कार्यरत असतानाच निव्वळ शेतीची आवड म्हणून चिपळूण तालुक्यातील पोफळी गावचे संजय ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मूळ बांधकाम क्षेत्रात कार्यरत असतानाच निव्वळ शेतीची आवड म्हणून चिपळूण तालुक्यातील पोफळी गावचे संजय बामणे गेली १२ ते १३ वर्षे बारमाही शेती करत आहेत. सेंद्रिय शेतीवर त्यांचा विशेष भर आहे. पडीक जमीन लागवडीखाली आणून शरिराला अपाय होणार नाही, अशी शेती उत्पादने ते घेत आहेत. उत्पादनाचा दर्जाही उत्कृष्ट असल्याने विक्रीही चांगली होते.

पावसाळ्यात सहा एकर क्षेत्रावर भात लागवड करत असून, विविध प्रकारचे वाण लावून उत्पादन घेत आहेत. वाडा कोलम, चिंटू, अंकूरपूजा या वाणांची लागवड त्यांनी केली आहे. दर्जेदार तांदूळ विक्री ते करत असून, त्यासाठी त्यांना दरही चांगला प्राप्त होत आहे. भात काढल्यानंतर दोन एकर क्षेत्रावर झेंडू लागवड करत आहेत. कऱ्हाड येथील नर्सरीतून रोपे आणून लागवड करतात. दसरा, दीपावली, मार्गशीर्ष महिन्यात त्यांच्याकडील झेंडू संपतो. याशिवाय उर्वरित क्षेत्रात पावटा, चवळी, कोबी, दुधीभोपळा तसेच झुकीनी आदी विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करत आहेत. त्यानंतर सहा एकर क्षेत्रावर ते कलिंगड लागवड करत आहेत. आतून लाल व बाहेरून राखाडी, आतून बाहेरून पिवळे, आतून पिवळे व बाहेरून हिरवे अशा वाणांची कलिंगड लागवड ते करत असून, एकरी १३ ते १४ टन उत्पादन त्यांना प्राप्त होत आहे. दर्जेदार मालाचा खप हातोहात होतो.

शेती करताना व्यावसायिक दृष्टीकोन असावा, शिवाय जमीन ओसाड ठेवण्यापेक्षा लागवडीखाली यावी. कोकणच्या लाल मातीत विविध प्रकारचे उत्पादन घेता येते, पिके घेत असताना, कोणत्याही प्रकारचा शरिराला अपाय होणार नाही, याची काळजी घेतली तर उत्पादनांना दर चांगलाच प्राप्त होतो. योग्य नियोजन मात्र गरजेचे आहे.

- संजय बामणे, पोफळी

मुंबईत विक्री

गतवर्षी ३८ पोती तांदूळ बामणे यांनी ५५ रूपये किलो दराने विकला.

कलिंगड विक्रीसाठी मुंबईत स्टाॅल लावण्यात येतात.

विविध प्रकारचे वाण लावत असून, शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन घेतात.

कोबी, दुधीभोपळा, झुकीनी, आंबा, काजू पिकाचे उत्पादन घेत असतानाच दर्जा मात्र जपला आहे.

झुकीनी लागवड

बामणे यांनी वीस गुंठे क्षेत्रावर झुकीनी लागवड केली होती. कोकणच्या लाल मातीत चांगले उत्पन्न त्यांना प्राप्त झाले. दिवसाला ७५० किलो झुकीनी काढली जात होती. सलग दोन महिने उत्पन्न काढण्यात आले. मात्र, विक्रीसाठी मुंबईत पाठवावी लागत असे. त्यामुळे त्याचे पॅकिंग व वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी झुकीनी लागवड करणे बंद केली आहे. बामणे यांनी २५० आंबा, ५०० काजूंची लागवड केली आहे. वाळलेल्या बी पेक्षा ओल्या काजूगरांची विक्री करत असून, त्याला चांगला दर प्राप्त होतो, असा त्यांचा दावा आहे. कलिंगडाचे विविध प्रकार ते लागवड करून उत्पादन घेत आहेत. मुंबईत कलिंगडाचा खप चांगला होत असल्याचे त्यांनी सांगितले.