शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्रज्ञानातून बारमाही शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मूळ बांधकाम क्षेत्रात कार्यरत असतानाच निव्वळ शेतीची आवड म्हणून चिपळूण तालुक्यातील पोफळी गावचे संजय ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मूळ बांधकाम क्षेत्रात कार्यरत असतानाच निव्वळ शेतीची आवड म्हणून चिपळूण तालुक्यातील पोफळी गावचे संजय बामणे गेली १२ ते १३ वर्षे बारमाही शेती करत आहेत. सेंद्रिय शेतीवर त्यांचा विशेष भर आहे. पडीक जमीन लागवडीखाली आणून शरिराला अपाय होणार नाही, अशी शेती उत्पादने ते घेत आहेत. उत्पादनाचा दर्जाही उत्कृष्ट असल्याने विक्रीही चांगली होते.

पावसाळ्यात सहा एकर क्षेत्रावर भात लागवड करत असून, विविध प्रकारचे वाण लावून उत्पादन घेत आहेत. वाडा कोलम, चिंटू, अंकूरपूजा या वाणांची लागवड त्यांनी केली आहे. दर्जेदार तांदूळ विक्री ते करत असून, त्यासाठी त्यांना दरही चांगला प्राप्त होत आहे. भात काढल्यानंतर दोन एकर क्षेत्रावर झेंडू लागवड करत आहेत. कऱ्हाड येथील नर्सरीतून रोपे आणून लागवड करतात. दसरा, दीपावली, मार्गशीर्ष महिन्यात त्यांच्याकडील झेंडू संपतो. याशिवाय उर्वरित क्षेत्रात पावटा, चवळी, कोबी, दुधीभोपळा तसेच झुकीनी आदी विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करत आहेत. त्यानंतर सहा एकर क्षेत्रावर ते कलिंगड लागवड करत आहेत. आतून लाल व बाहेरून राखाडी, आतून बाहेरून पिवळे, आतून पिवळे व बाहेरून हिरवे अशा वाणांची कलिंगड लागवड ते करत असून, एकरी १३ ते १४ टन उत्पादन त्यांना प्राप्त होत आहे. दर्जेदार मालाचा खप हातोहात होतो.

शेती करताना व्यावसायिक दृष्टीकोन असावा, शिवाय जमीन ओसाड ठेवण्यापेक्षा लागवडीखाली यावी. कोकणच्या लाल मातीत विविध प्रकारचे उत्पादन घेता येते, पिके घेत असताना, कोणत्याही प्रकारचा शरिराला अपाय होणार नाही, याची काळजी घेतली तर उत्पादनांना दर चांगलाच प्राप्त होतो. योग्य नियोजन मात्र गरजेचे आहे.

- संजय बामणे, पोफळी

मुंबईत विक्री

गतवर्षी ३८ पोती तांदूळ बामणे यांनी ५५ रूपये किलो दराने विकला.

कलिंगड विक्रीसाठी मुंबईत स्टाॅल लावण्यात येतात.

विविध प्रकारचे वाण लावत असून, शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन घेतात.

कोबी, दुधीभोपळा, झुकीनी, आंबा, काजू पिकाचे उत्पादन घेत असतानाच दर्जा मात्र जपला आहे.

झुकीनी लागवड

बामणे यांनी वीस गुंठे क्षेत्रावर झुकीनी लागवड केली होती. कोकणच्या लाल मातीत चांगले उत्पन्न त्यांना प्राप्त झाले. दिवसाला ७५० किलो झुकीनी काढली जात होती. सलग दोन महिने उत्पन्न काढण्यात आले. मात्र, विक्रीसाठी मुंबईत पाठवावी लागत असे. त्यामुळे त्याचे पॅकिंग व वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी झुकीनी लागवड करणे बंद केली आहे. बामणे यांनी २५० आंबा, ५०० काजूंची लागवड केली आहे. वाळलेल्या बी पेक्षा ओल्या काजूगरांची विक्री करत असून, त्याला चांगला दर प्राप्त होतो, असा त्यांचा दावा आहे. कलिंगडाचे विविध प्रकार ते लागवड करून उत्पादन घेत आहेत. मुंबईत कलिंगडाचा खप चांगला होत असल्याचे त्यांनी सांगितले.