शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी, कर्मचारी यामध्ये वरचढ कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

मतदारांनी लोकांच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासावर भर देणे आवश्यक आहे. काहीवेळा सभांमध्ये अवाक्षरही न काढता कधी पाच ...

मतदारांनी लोकांच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासावर भर देणे आवश्यक आहे. काहीवेळा सभांमध्ये अवाक्षरही न काढता कधी पाच वर्षे निघून गेली, हेही कळलं नाही, असेही आपल्यामध्ये लोकप्रतिनिधी होऊन गेलेत. एखादा कर्मचारी, अधिकाऱ्याला टार्गेट करून त्याच्याविरोधात आवाज उठवायचा आणि नंतर हातमिळवणी करायची, असेही प्रकार काहीवेळा पाहावयास मिळतात. आपल्याला कोणी पाहात नसल्याचे समजून मांजर डोळे झाकून दूध पिते, त्याप्रमाणे काहीजण वागताना दिसतात. मात्र, लोकांना हे सर्वकाही दिसत असले, तरी तेही मूग गिळून बसलेले आहेत का, असाच सवाल उठतो. विकास कामांचा कसा बोऱ्या वाजतो, हे आपल्याला पाहावयास मिळते. चांगल्या प्रतीची कामे न करता अधिकाऱ्यांच्या नावे टाहो फोडायचा. अहो पण, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय करता, लोकांनी कशासाठी निवडून दिले, असे प्रश्न लोकांनी उपस्थित केल्यावर ते चुकीचे ठरणार नाहीत, हे खरे आहे. मात्र, आवाज कोण उठवणार, असाही प्रश्न आहेच. त्यामुळे विकास कामे होतच राहणार, एक दोन वर्षांनी त्या विकासकामांचा काय दर्जा होता, हे समजणार, पण पुढच्या पाच वर्षांनी परत तीच मालिका सुरू झालेली असणार आहे. लोकशाही असल्याने ठोकशाही करणाऱ्यांना बोलणार कोण, असाच प्रश्न पुन्हा उद्भवतो. त्यामुळे आहे तोच तमाशा प्रेक्षक बनून पाहात बसण्यापलीकडे काहीही करायचं नाही, असाच प्रत्येक विचार करत राहिला, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मागच्या आठवड्यात पार पडली. या सभेत अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली. त्यामध्ये दापोली तालुक्यातील जालगाव नवानगर येथील एक महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. दापोली पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्यानेच जिल्हा परिषदेचा रस्ता उखडून त्याच्यावर अतिक्रमण केलेले आहे. आता हा वाद न्यायालयात आहे. मात्र, यावर जोरदार चर्चा झाली. अध्यक्षांनी दोन ते चारवेळा अतिक्रमण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव सभागृहात विचारले; मात्र, त्याचे नाव घेण्यास आवाज उठविणारे सदस्य घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे नाव गुलदस्त्यात राहिले असले, तरी लोकप्रतिनधीपेक्षा कर्मचारी वरचढ झाले, असेच म्हणावे का.

रहिम दलाल