शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी, कर्मचारी यामध्ये वरचढ कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

मतदारांनी लोकांच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासावर भर देणे आवश्यक आहे. काहीवेळा सभांमध्ये अवाक्षरही न काढता कधी पाच ...

मतदारांनी लोकांच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासावर भर देणे आवश्यक आहे. काहीवेळा सभांमध्ये अवाक्षरही न काढता कधी पाच वर्षे निघून गेली, हेही कळलं नाही, असेही आपल्यामध्ये लोकप्रतिनिधी होऊन गेलेत. एखादा कर्मचारी, अधिकाऱ्याला टार्गेट करून त्याच्याविरोधात आवाज उठवायचा आणि नंतर हातमिळवणी करायची, असेही प्रकार काहीवेळा पाहावयास मिळतात. आपल्याला कोणी पाहात नसल्याचे समजून मांजर डोळे झाकून दूध पिते, त्याप्रमाणे काहीजण वागताना दिसतात. मात्र, लोकांना हे सर्वकाही दिसत असले, तरी तेही मूग गिळून बसलेले आहेत का, असाच सवाल उठतो. विकास कामांचा कसा बोऱ्या वाजतो, हे आपल्याला पाहावयास मिळते. चांगल्या प्रतीची कामे न करता अधिकाऱ्यांच्या नावे टाहो फोडायचा. अहो पण, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय करता, लोकांनी कशासाठी निवडून दिले, असे प्रश्न लोकांनी उपस्थित केल्यावर ते चुकीचे ठरणार नाहीत, हे खरे आहे. मात्र, आवाज कोण उठवणार, असाही प्रश्न आहेच. त्यामुळे विकास कामे होतच राहणार, एक दोन वर्षांनी त्या विकासकामांचा काय दर्जा होता, हे समजणार, पण पुढच्या पाच वर्षांनी परत तीच मालिका सुरू झालेली असणार आहे. लोकशाही असल्याने ठोकशाही करणाऱ्यांना बोलणार कोण, असाच प्रश्न पुन्हा उद्भवतो. त्यामुळे आहे तोच तमाशा प्रेक्षक बनून पाहात बसण्यापलीकडे काहीही करायचं नाही, असाच प्रत्येक विचार करत राहिला, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मागच्या आठवड्यात पार पडली. या सभेत अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली. त्यामध्ये दापोली तालुक्यातील जालगाव नवानगर येथील एक महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. दापोली पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्यानेच जिल्हा परिषदेचा रस्ता उखडून त्याच्यावर अतिक्रमण केलेले आहे. आता हा वाद न्यायालयात आहे. मात्र, यावर जोरदार चर्चा झाली. अध्यक्षांनी दोन ते चारवेळा अतिक्रमण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव सभागृहात विचारले; मात्र, त्याचे नाव घेण्यास आवाज उठविणारे सदस्य घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे नाव गुलदस्त्यात राहिले असले, तरी लोकप्रतिनधीपेक्षा कर्मचारी वरचढ झाले, असेच म्हणावे का.

रहिम दलाल