शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

लोकप्रतिनिधी, कर्मचारी यामध्ये वरचढ कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

मतदारांनी लोकांच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासावर भर देणे आवश्यक आहे. काहीवेळा सभांमध्ये अवाक्षरही न काढता कधी पाच ...

मतदारांनी लोकांच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासावर भर देणे आवश्यक आहे. काहीवेळा सभांमध्ये अवाक्षरही न काढता कधी पाच वर्षे निघून गेली, हेही कळलं नाही, असेही आपल्यामध्ये लोकप्रतिनिधी होऊन गेलेत. एखादा कर्मचारी, अधिकाऱ्याला टार्गेट करून त्याच्याविरोधात आवाज उठवायचा आणि नंतर हातमिळवणी करायची, असेही प्रकार काहीवेळा पाहावयास मिळतात. आपल्याला कोणी पाहात नसल्याचे समजून मांजर डोळे झाकून दूध पिते, त्याप्रमाणे काहीजण वागताना दिसतात. मात्र, लोकांना हे सर्वकाही दिसत असले, तरी तेही मूग गिळून बसलेले आहेत का, असाच सवाल उठतो. विकास कामांचा कसा बोऱ्या वाजतो, हे आपल्याला पाहावयास मिळते. चांगल्या प्रतीची कामे न करता अधिकाऱ्यांच्या नावे टाहो फोडायचा. अहो पण, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय करता, लोकांनी कशासाठी निवडून दिले, असे प्रश्न लोकांनी उपस्थित केल्यावर ते चुकीचे ठरणार नाहीत, हे खरे आहे. मात्र, आवाज कोण उठवणार, असाही प्रश्न आहेच. त्यामुळे विकास कामे होतच राहणार, एक दोन वर्षांनी त्या विकासकामांचा काय दर्जा होता, हे समजणार, पण पुढच्या पाच वर्षांनी परत तीच मालिका सुरू झालेली असणार आहे. लोकशाही असल्याने ठोकशाही करणाऱ्यांना बोलणार कोण, असाच प्रश्न पुन्हा उद्भवतो. त्यामुळे आहे तोच तमाशा प्रेक्षक बनून पाहात बसण्यापलीकडे काहीही करायचं नाही, असाच प्रत्येक विचार करत राहिला, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मागच्या आठवड्यात पार पडली. या सभेत अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली. त्यामध्ये दापोली तालुक्यातील जालगाव नवानगर येथील एक महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. दापोली पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्यानेच जिल्हा परिषदेचा रस्ता उखडून त्याच्यावर अतिक्रमण केलेले आहे. आता हा वाद न्यायालयात आहे. मात्र, यावर जोरदार चर्चा झाली. अध्यक्षांनी दोन ते चारवेळा अतिक्रमण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव सभागृहात विचारले; मात्र, त्याचे नाव घेण्यास आवाज उठविणारे सदस्य घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे नाव गुलदस्त्यात राहिले असले, तरी लोकप्रतिनधीपेक्षा कर्मचारी वरचढ झाले, असेच म्हणावे का.

रहिम दलाल