शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

रामदास कदमांना जनताच हद्दपार करेल

By admin | Updated: May 31, 2016 00:34 IST

संजय कदम : खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत जोरदार टिकास्त्र; सर्व आरोपांना प्रत्युत्तर

खेड : मला गोरगरीब जनतेने आमदार केलय़ं इथल्या लोकांनाही माहीत आहे की, मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलयं, त्यांच्या मदतीला धावून जातो. केवळ मतांकडे पाहिले नसल्याने जनतेने मला मोठ्या मतांनी निवडून दिले आहे. रामदास कदम हे केवळ मतांसाठी जोगवा मागत आहेत़, हे जनतेने विसरू नये़ आगामी निवडणुकीत जनताच त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन खेड, दापोली व मंडणगडचे आमदार संजय कदम यांनी केले़ खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खेड नगर परिषदेच्या स्व़ किशोर कानडे मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये आमदार संजय कदम बोलत होते. खेडचे माजी आमदार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका सभेमध्ये संजय कदम यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष अजित यशवंतराव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, जिल्हा युवकचे अध्यक्ष राजेंद्र आंब्रे, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, दापोलीचे जयंत जालगावकर, चिपळूणचे जयंद्रथ खताते, मंडणगडचे प्रकाश शिगवण, मंडणगडच्या नगराध्यक्षा श्रुती साळवी, कोकण बँकेचे बशीर मुर्तूझा, सुलतान मुकादम, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर, रमेश दळवी, रमेश चव्हाण, मोहन मुळ्ये, सायली कदम, शिवराम दळवी, सिंकदर जसनाईक, मुंबइचे मनोज घागरू, नगरसेवक सतीश चिकणे, बोरघरच्या सरपंच हौसाबाई पवार उपस्थित होते़ यावेळी संजय कदम यांनी रामदास कदम यांच्या एकूण कार्यपध्दतीवर परखड टीका केली़ रामदास कदम हे विविध समाजांचे लांगुलचालन करत आहेत़ मात्र, त्यांना तो अधिकार नाही़ कारण तालुक्यातील विविध समाजांना त्यांनी गेल्या २५ वर्षामध्ये न्याय दिला नसून, त्यांचेवर अन्यायच केल्याचे सांगितले. आजपर्यंत त्यांनी तालुक्याचा विकास करण्याऐवजी अधोगतीच केली आहे़ संजय कदम यांच्यावर केलेल्या भगतगिरीच्या आरोपाचे खंडन करत आपण तसे काही केले नसून रामदास कदम हे खोटे बोलत आहेत, त्यांनी ते सिध्द करून दाखवावे, असे आव्हान दिले. संजय कदम म्हणाले की, मी गोरगरीब समाजाचा आमदार आहे. मात्र, एवढ्या खालच्या पातळीवर जावून केलेली टीका एका जबाबदार मंत्र्याला शोभत नाही, असे सांगितले. रामदास कदम यांना तत्कालीन केशवराव भोसले आणि तु़ का. कदम यांच्या भांडणात लॉटरी लागल्याचे स्मरण करून दिले. पक्षनिष्ठा आम्हाला शिकवू नका, असे सांगत त्यांनी गुहागर मतदार संघातून रामदास कदम यांचा पराभव झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला निघाले होते, असा गौप्यस्फोट संजय कदम यांनी यावेळी केला. मात्र, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही थारा दिला नसल्याचे संजय कदम यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी सांगितले की, जिल्ह््यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व यापुढे आमदार संजय कदम यांनी करावे, असे सांगितले़ तर प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव यांनी आमदार संजय कदम हेच यापुढचेही आमदारकीचे उमेदवार असतील असेही जाहीर केले. (प्रतिनिधी)21भाषा शोभत नाही : जागा मालकाला पैसे दिले नसल्याचा आरोपएकाही कुटुंबाला त्यांनी रोजगार दिला नाही. त्यामुळे रोजगार देण्याची भाषा यांच्या तोंडात शोभत नसल्याचे सांगत रामदास कदम यांनी गेली २५ वर्षे केवळ कमिशन खाण्याचे काम केले. दुसऱ्याकडे बोट दाखवून त्याचा त्यांना काहीही लाभ होणार नसल्याचा टोला यावेळी संजय कदम यांनी हाणला.डेंटल मेडिकल कॉलेजसाठी जी जागा घेतली आहे, त्या जागेच्या मालकाला अद्यापही जागेचे पैसे दिले नसून, त्याची घोर फसवणूक केल्याचा आरोप संजय कदम यांनी केला़ त्यामुळे जनतेची फसवणूक करण्यासाठी रामदास कदम असल्याचा टोलाही संजय कदम यांनी सभेत लगावला.