शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

परिवहन बंदमुळे होणार जनतेचे हाल

By admin | Updated: April 28, 2015 23:47 IST

सेफ्टी बिल : एस.टी., रिक्षा, टॅक्सी बंद

रत्नागिरी : रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बील २०१४ मधील अन्यायकारक तरतुदींविरोधात परिवहन कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंरोजगारित रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांनी दि. ३० एप्रिल रोजी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे देशभर परिवहन बंद राहणार आहे.नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्स्पोर्ट वर्क र्स आणि महाराष्ट्र परिवहन कामगार, अधिकारी व स्वयंरोजगारित चालक - मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला आहे. एस. टी., बीएसटीसारख्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या संस्थांची प्रवासी टप्पे वाहतुकीची मोनोपॉली या तरतुदीमुळे संपणार आहे. बसमार्ग राज्य शासन, महानगरपालिका ठरवणार आहे. राज्य शासन, महानगरपालिका बसमार्गाचे टेंडर काढणार आहे. एस. टी., बीएसटीला खासगी मालकांसोबत स्पर्धेत उतरुन बसमार्ग विकत घ्यावे लागणार आहेत. सहा आसनी, बारा आसनी गाड्यांना मुक्त परवाना देणार असल्याने पर्यायाने रिक्षा, टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त होईल. वाहतूक परवाना नूतनीकरणाच्या वेळेस वैद्यकीय तपासणी, वाहन चालविण्याच्या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. ज्या कंपनीचे वाहन असेल त्यांच्याकडूनच सुटे भाग खरेदी करावे लागणार आहेत. एक वर्षापासून चार वर्षांच्या कारावासासारख्या गंभीर शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.या अन्यायकारक तरतुदीमुळे त्याचे परिणाम एस. टी., रिक्षा व टॅक्सी व्यवसायावर होणार आहेत. शिवाय एस. टी., बीएसटीसारख्या सार्वजनिक संस्थांचे अस्तित्त्व धोक्यात येणार आहे. रिक्षा, टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेक कुटुंबांची वाताहत होण्याची शक्यता आहे. यासाठी कामगार व अधिकारी, स्वयंरोजगारित एस. टी., बीएसटी रिक्षा, टॅक्सी वाचविण्यासाठी व प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिलाच्या विरोधात चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बील २०१४ मधील अन्यायकारक तरतुदींविरोधात चक्का जाम आंदोलन. देशभर परिवहन बंद राहणार.परिवहन कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंरोजगारीत रिक्षा, टॅक्सी चालक- मालक सहभागी होणार.नागरिकांचे निष्कारण हाल होणार.