शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

परिवहन बंदमुळे होणार जनतेचे हाल

By admin | Updated: April 28, 2015 23:47 IST

सेफ्टी बिल : एस.टी., रिक्षा, टॅक्सी बंद

रत्नागिरी : रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बील २०१४ मधील अन्यायकारक तरतुदींविरोधात परिवहन कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंरोजगारित रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांनी दि. ३० एप्रिल रोजी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे देशभर परिवहन बंद राहणार आहे.नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्स्पोर्ट वर्क र्स आणि महाराष्ट्र परिवहन कामगार, अधिकारी व स्वयंरोजगारित चालक - मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला आहे. एस. टी., बीएसटीसारख्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या संस्थांची प्रवासी टप्पे वाहतुकीची मोनोपॉली या तरतुदीमुळे संपणार आहे. बसमार्ग राज्य शासन, महानगरपालिका ठरवणार आहे. राज्य शासन, महानगरपालिका बसमार्गाचे टेंडर काढणार आहे. एस. टी., बीएसटीला खासगी मालकांसोबत स्पर्धेत उतरुन बसमार्ग विकत घ्यावे लागणार आहेत. सहा आसनी, बारा आसनी गाड्यांना मुक्त परवाना देणार असल्याने पर्यायाने रिक्षा, टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त होईल. वाहतूक परवाना नूतनीकरणाच्या वेळेस वैद्यकीय तपासणी, वाहन चालविण्याच्या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. ज्या कंपनीचे वाहन असेल त्यांच्याकडूनच सुटे भाग खरेदी करावे लागणार आहेत. एक वर्षापासून चार वर्षांच्या कारावासासारख्या गंभीर शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.या अन्यायकारक तरतुदीमुळे त्याचे परिणाम एस. टी., रिक्षा व टॅक्सी व्यवसायावर होणार आहेत. शिवाय एस. टी., बीएसटीसारख्या सार्वजनिक संस्थांचे अस्तित्त्व धोक्यात येणार आहे. रिक्षा, टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेक कुटुंबांची वाताहत होण्याची शक्यता आहे. यासाठी कामगार व अधिकारी, स्वयंरोजगारित एस. टी., बीएसटी रिक्षा, टॅक्सी वाचविण्यासाठी व प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिलाच्या विरोधात चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बील २०१४ मधील अन्यायकारक तरतुदींविरोधात चक्का जाम आंदोलन. देशभर परिवहन बंद राहणार.परिवहन कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंरोजगारीत रिक्षा, टॅक्सी चालक- मालक सहभागी होणार.नागरिकांचे निष्कारण हाल होणार.