शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

निराधारांची पेन्शन चार महिने पोस्टात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : निराधारांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारकडून विशेष सहाय्य योजनेतून अशा निराधार व्यक्तींना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : निराधारांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारकडून विशेष सहाय्य योजनेतून अशा निराधार व्यक्तींना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांचे अर्थसहाय दिले जाते. येथील कुष्ठरुग्ण वसाहतीतील १९ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाकडून गेल्या चार महिन्यांचे अनुदान पोस्टात येऊनही त्याचे वाटप करण्यासाठी पोस्टमन या वसाहतीकडे वळलेच नसल्याने या लाभार्थ्यांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे यापैकी काही वृद्धा वसाहतीच्या परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत.

शहरानजीकच्या उद्यमनगर परिसरातील कुष्ठरुग्ण वसाहतीत सुमारे २० निराधार स्त्री - पुरूष राहतात. यापैकी सुमारे १५ महिला असून यात काही विधवा व वृद्ध आहेत. यापैकी सात जणी ७० वर्षांवरील आहेत. हे रुग्ण बरे होऊनही त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना न स्वीकारल्याने वर्षानुवर्षे या व्यक्ती या वसाहतीतच रहात आहेत. त्यांना केंद्र तसेच राज्य सरकारच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ आदी योजनांमधून महिन्याला १००० रुपये अनुदान दिले जात आहेत. कोरोना काळात काही महिने त्यांचे वेतन अनियमित झाले होते. मात्र, आता नोव्हेंबर, डिसेंबर २०२० ते जानेवारी, फेब्रुवारी २०२१ असे चार महिन्यांचे त्यांचे वेतन पोस्टात जमा झाले आहे.

या रुग्णांना पोस्टाच्या घरपोच सेवेचा लाभ मिळावा, यासाठी यापैकी काही रुग्णांचे पोस्टातील खाते पोस्ट पेमेंटस बँकेत रूपांतरीत करण्यात आली आहेत. हे रुग्ण दुर्धर व्याधीग्रस्त असल्याने ते पोस्टात किंवा या बँकेत जात येत नाहीत. ही त्यांची समस्या लक्षात घेऊन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी या लाभार्थ्यांचे पैसे पोस्टात जमा होताच ते तातडीने त्यांना घरपोच करावे, असे पत्र रत्नागिरीतील पोस्ट पेमेंट बँक तसेच डाकघर अधीक्षक, पोस्टमास्तर यांना १० डिसेंबर २०२० रोजी दिले आहे. या पत्रासोबत या लाभार्थ्यांची यादीही आहे.

मात्र, या लाभार्थ्यांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे चार महिन्यांचे अनुदान पोस्टात तसेच पोस्ट पेमेंटस बँकेत येऊनही ते या वसाहतीकडे अद्याप पोस्टमनच न फिरकल्याने या लाभार्थ्यांना भीक मागून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. आजारी पडल्यास उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत.

कोट

कुष्ठरूग्ण वसाहतीतील रुग्णांना विशेष योजनेचे पैसे घरपोच करण्यासंदर्भात १० डिसेंबर २०२० रोजी तहसीलदार यांनी लाभार्थ्यांच्या यादीसह पोस्टाला तसेच पोस्ट पेमेंट बँकेला पत्र दिले आहे.

खेडेकर, नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना विभाग, रत्नागिरी

चौकट

पोस्ट पेमेंटस बँकेत असलेले पैसे या लाभार्थ्यांना घरपोच नेऊन देण्यासाठी त्यांच्या वेतनाच्या रकमेतून पोस्टमन यांना २५ रुपये देण्याची तरतूद आहे. पोस्टात आलेले वेतन मात्र त्यांनी विनाशुल्क या लाभार्थ्यांना पोहोच करायचे आहे. प्रशासनाकडून या रुग्णांसाठी सुविधा देऊनही पोस्टाकडून असंवेदनशीलता दाखविली जात आहे.