शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

विनामास्क आढळणाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST

चिपळूण : शहरासह बाजारपेठेत तसेच तालुक्यात विविध भागात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस बारीक ठेवून आहेत. सध्या कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू ...

चिपळूण : शहरासह बाजारपेठेत तसेच तालुक्यात विविध भागात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस बारीक ठेवून आहेत. सध्या कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू असून याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यासाठी विनामास्क आढळणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. पोलिसांनी अनेकांना दंड केला आहे.

आठवडा बाजारांवर संक्रांत

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने त्याचा परिणाम आठवडा बाजारांवर झाला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील अनेक आठवडाबाजार बंद करण्यात आले आहेत. या भागातील वार्षिक यात्रोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमही न करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

शेतकरी, बागायतदारांचे नुकसान

राजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणात अनेक ठिकाणी संबंधित यंत्रणेने अतिक्रमण करीत अतिरिक्त भूसंपादन केल्याने अनेक शेतकरी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत जमीनमालकांकडून असंख्य तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, जादा जमिनीचा मोबदला देण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.

कामगिरी चोखपणे पार पाडण्याची गरज

लांजा: अनेक शासकीय योजना ग्रामपंचायतीपर्यंत येतात; पण त्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे नव्या सदस्यांनी प्रत्येक शासकीय योजना घराघरांत पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे पार पडल्यास प्रत्येक गावचा विकास होणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच आणि सरपंच यांनी प्रयत्न करावेत.

विकास कामांचा सपाटा

दापोली : वांझळोली बौद्धवाडी ते गावठवाडी रस्ता डांबरीकरण करणे, ग्रामपंचायत संरक्षण भिंत बांधणे, आदी कामांचा भूमिपूजन सोहळा माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. यावेळी वांझळोली ग्रामपंचायत सरपंच नितीन दुर्गावळे, राष्ट्रवादीचे गणअध्यक्ष नितीन कोठारी, युवक तालुकाध्यक्ष नीलेश तांबे, डॉ. दिलीप तांबे, बुद्धविहार कमिटीचे अध्यक्ष सुरेश अहिरे, आदी उपस्थित होते.

मासेमारी व्यवसाय तोट्यात

रत्नागिरी : किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय हा जिल्ह्याचा आर्थिक कणा मानला जातो. चालू मासेमारी मोसमामध्ये माशांची आवक कमी झाल्याने मच्छीमार हैराण झाले आहे. डिझेलचाही खर्च भागेनासा झाला आहे आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे.

फळ विक्रेत्यांकडून फसवणूक

रत्नागिरी : शहर परिसरातमध्ये अनेक फळ विक्रेते हातगाड्यांवरून फिरताना दिसतात. या हातगाड्यांवरील फळे विकणाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची ओरड सध्या सुरू आहे. सफरचंद विकताना सुकलेली व कमी प्रतीची विकली जात असतानाच भावही जास्त घेतला जात असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

उद्यमनगर परिसरात विजेचा लपंडाव

रत्नागिरी : शहरालगतच्या शिरगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उद्यमनगर परिसरामध्ये गुरुवारी ५ वाजल्यापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. दुपारी पुन्हा वीजपुरवठा अचानक बंद झाला होता. आधीच उकाडा होत असल्याने वीजपुरवठा बंद असल्याने उकाड्याने लोक त्रस्त झाले होते.