शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाणलोटचा पर्याय : माळी

By admin | Updated: August 9, 2014 00:39 IST

सतर्क राहण्याचा इशारा : अनेक उपाययोजनांची आवश्यकता आता पुढे येतेय

चिपळूण : जलसंवर्धनासाठी पाणलोट विकास कार्यक्रम हा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन मालदोलीचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माळी यांनी केले.एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत झालेल्या जाणीव जागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते बोलत होते. विकास सहयोग प्रतिष्ठान आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समिती, मालदोली यांच्या संयुक्त विद्यमाने मालदोली ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते म्हणाले की, गावामध्ये पाणलोट प्रकल्पाच्या निमित्ताने सुंदर असे वातावरण निर्माण झाले आहे. तरीदेखील भविष्याची पावले ओळखून आपणास निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अधिक सतर्क राहावे लागणार आहे. लोकांनी निसर्गाच्या चक्रात अतिरेकी हस्तक्षेप केला, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे माळीण गावच्या दुर्घटनेने देशाने अनुभवले आहे.या कार्यक्रमात विकास सहयोग प्रतिष्ठानचे विभागीय समन्वयक विजय कदम प्रमुख मार्गदर्शक होते. ते म्हणाले की, जमीन, पाणी व पर्यावरण संवर्धनाची कामे तडीस नेताना या गावातील सर्व समाज घटकामध्ये चैतन्य निर्माण व्हावे, यासाठी आपणास काम करावे लागणार आहे. गावातील महिलांनी सकारात्मक पुढाकार घेतला, तर हा प्रकल्प निश्चितपणे आपल्या गावाकडे जगाचे लक्ष वेधू शकतो, एवढी ताकद आणि नियोजन या प्रकल्पामध्ये आहे.यावेळी लांजा येथील शाहीर काशीराम जाधव यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून पाणलोट विकास प्रकल्पाबद्दल गावातील ग्रामस्थांमध्ये जागृती केली. या सभेत विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)