शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाणलोटचा पर्याय : माळी

By admin | Updated: August 9, 2014 00:39 IST

सतर्क राहण्याचा इशारा : अनेक उपाययोजनांची आवश्यकता आता पुढे येतेय

चिपळूण : जलसंवर्धनासाठी पाणलोट विकास कार्यक्रम हा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन मालदोलीचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माळी यांनी केले.एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत झालेल्या जाणीव जागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते बोलत होते. विकास सहयोग प्रतिष्ठान आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समिती, मालदोली यांच्या संयुक्त विद्यमाने मालदोली ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते म्हणाले की, गावामध्ये पाणलोट प्रकल्पाच्या निमित्ताने सुंदर असे वातावरण निर्माण झाले आहे. तरीदेखील भविष्याची पावले ओळखून आपणास निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अधिक सतर्क राहावे लागणार आहे. लोकांनी निसर्गाच्या चक्रात अतिरेकी हस्तक्षेप केला, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे माळीण गावच्या दुर्घटनेने देशाने अनुभवले आहे.या कार्यक्रमात विकास सहयोग प्रतिष्ठानचे विभागीय समन्वयक विजय कदम प्रमुख मार्गदर्शक होते. ते म्हणाले की, जमीन, पाणी व पर्यावरण संवर्धनाची कामे तडीस नेताना या गावातील सर्व समाज घटकामध्ये चैतन्य निर्माण व्हावे, यासाठी आपणास काम करावे लागणार आहे. गावातील महिलांनी सकारात्मक पुढाकार घेतला, तर हा प्रकल्प निश्चितपणे आपल्या गावाकडे जगाचे लक्ष वेधू शकतो, एवढी ताकद आणि नियोजन या प्रकल्पामध्ये आहे.यावेळी लांजा येथील शाहीर काशीराम जाधव यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून पाणलोट विकास प्रकल्पाबद्दल गावातील ग्रामस्थांमध्ये जागृती केली. या सभेत विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)