शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

होम आयसोलेशनचे रूग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागली आहे. या रूग्णांसाठी जिल्हा शासकीय रूग्णालय तसेच महिला रूग्णालयांबरोबरच आता ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागली आहे. या रूग्णांसाठी जिल्हा शासकीय रूग्णालय तसेच महिला रूग्णालयांबरोबरच आता डेडिकेटेड कोरोना रूग्णालये (डी. सी. एच. सी.) तसेच कोरोना केअर सेंटर (सी. सी. सी) येथील खाटाही अपुऱ्या पडू लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने ज्या रूग्णांना अजिबातच लक्षणे नाहीत किंवा साैम्य लक्षणे आहेत, अशा रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये रहाण्याची परवानगी दिली आहे. सध्या लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांचीच संख्या अधिक असल्याने जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात सध्या होम आयसोलेशनमध्ये दोन हजारपेक्षा अधिक रूग्ण आहेत. मात्र, ज्या रूग्णांना अजिबातच लक्षणे नाहीत, असे रूग्ण बाहेर फिरत असल्याने त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.

जुलै महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या राज्यभरातच वाढू लागली. यात साैम्य किंवा अजिबातच लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती. वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यातील कोरोना रूग्णालये, तसेच कोविड केअर सेंटरही अपुरी पडू लागल्याने अखेर शासनाने अजिबातच लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरीच राहून उपचार घेण्यासाठी परवानगी दिली. मात्र, त्यासाठी अशा रूग्णांकडून घरातील इतरांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी घरातच स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे असते. त्यानुसार पहिल्या लाटेतही अशा अनेक रूग्णांना घरी राहून उपचार मिळाले. त्यामुळे रूग्णालयांवरचा ताण कमी झाला.

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात शिमगोत्सवासाठी आलेल्या मुुंबईकरांमुळे वाढली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून भरमसाठ रूग्ण वाढू लागले आहेत. यापैकी काहींना अजिबातच लक्षणे नाहीत किंवा साैम्य लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांना घरीच उपचार सुरू आहेत. मात्र, ज्यांच्यामध्ये अजिबात लक्षणे नाहीत, असे रूग्ण बाहेर फिरताना दिसत आहे. लक्षणे असलेल्या रूग्णांकडूनच इतरांना संसर्गाचा धोका जास्त आहे. दुसऱ्या लाटेत तर हा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे ज्यांनी चाचणी केलेली नाही, अशा लक्षणे नसलेल्यांमुळे कोरोनाचा फैलाव अधिक झाला आहे.

ज्यांच्या चाचण्या झाल्या आहेत आणि जे होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांच्यात कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने अशा व्यक्तींपैकी काही व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सध्या अशांकडूनही संसर्गाचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात आता एकूण रूग्णसंख्या १५,८८९ इतकी असून त्यापैकी २०३७ रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ८८६ रूग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिवसागणिक रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यात अजिबात लक्षणे नसलेल्या किंवा कमी लक्षणे असलेल्या रूग्णांची होम आयसोलेशनमध्ये अधिकच भर पडत आहे.