शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गावात राहणाऱ्या काही महिला घरची शेती करीत असतानाच मजुरी करून संसाराला हातभार लावत असत. नियमित ...

रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गावात राहणाऱ्या काही महिला घरची शेती करीत असतानाच मजुरी करून संसाराला हातभार लावत असत. नियमित कामकाज करीत असतानाच बचत गट स्थापन करून नवीन उत्पन्नाचा मार्ग शोधत असतानाच त्यांना ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) यांच्या जिल्हा व्यवस्थापन कक्षाचे मार्गदर्शन लाभले. सर्व महिलांनी एकत्रित येऊन काजू प्रक्रिया युनिट स्थापन केले आहे.

मावळंगे गावातील बहुतुलेवाडीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटाची स्थापना करण्यात आली. महिलांनी एकत्रित येऊन नवीन व्यवसाय करून स्वत:साठी रोजगार निर्माण करण्याबाबत विचारविनिमय सुरू केला. ‘उमेद’च्या मार्गदर्शनाने समान व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी एनआरईटीपी प्रकल्पांतर्गत उत्पादक गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती. वाडीतील महिलांची चर्चा करून काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत एकमत झाले व तीन वर्षांपूर्वी झेप उत्पादक गटाची निर्मिती करण्यात आली.

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाबरोबर भांडवलाची आवश्यकता भासते. त्याप्रमाणे काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल, कच्चा माल, प्रक्रिया करण्यासाठी यंत्रे, उद्योग उभारण्यासाठी जागेशिवाय मशीन हाताळणे व उत्पादनाचा दर्जा राखण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. शिवाय ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोयी कमी असल्याने महिलांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला. मात्र न डगमगता सर्व हिरकणींनी एकजूट दाखवत, झोकून देत काम करण्याचा निश्चय केला.

झेप उत्पादक गटाने लागणारा कच्चा माल गोळा कसा करता येईल त्याकरिता संग्राम प्रभाग संघाच्या व्यवस्थापक रिया पवार यांची बैठक घेऊन माहिती घेतली. भांडवलासाठी ग्रामसंघाकडून बचत गटाने कर्ज घ्यायचे ठरले. शिवाय काजू बी ग्रामसंघाकडून खरेदी करायचे निश्चित करण्यात आले. जेणेकरून काजू खरेदीमुळे इतर महिलांनाही त्याचा फायदा होईल. त्यानुसारे एक लाख ८० हजार रुपयांची काजू बी खरेदी करण्यात आली. शिवाय ती उन्हात वाळविण्यात आली.

काजूवर प्रक्रिया करून गर अलगीकरणासाठी प्रशिक्षण गरजेचे असल्याने राजापूर येथे गटाच्या सर्व महिलांनी भेट देऊन काजू प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती घेतली. एक दिवस थांबून पूर्ण प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षित असलेल्या शीला कदम यांना गटात सहभागी करून घेतले. प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्र तातडीने खरेदी करण्याऐवजी सुरुवातीला भाडेतत्त्वाने कुठे यंत्र मिळते का, ते पाहण्यास सुरवात केली गेली. परंतु त्याच दरम्यान एनआरईटीपी प्रकल्पांतर्गत उत्पादक गटाला दोन लाखांचे कर्ज प्राप्त झाले. त्यामुळे भाड्याने यंत्र घेण्याऐवजी महिलांनी ते स्वत:च खरेदी करण्याचे निश्चित केले. आता आवश्यकता होती ती जागा व वीजजोडणीची. मात्र संघ सचिव वृषाली कदम यांच्या सहकार्याने तोही प्रश्न निकाली निघाला.

कामकाजाची जुळणी झाल्यानंतर महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आनंदाने ‘युनिट’चे उद्घाटन करण्यात आले. ग्रामस्थांनीही महिलांच्या कार्याचे कौतुक केले. विविध शासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनीही भेट देऊन झेप उत्पादक गटाचे कौतुक केले.

काजूगर प्रक्रिया सुरू असतानाच बाजारात माल विक्रीसाठी पाठविताना आकर्षक पॅकिंग तसेच लेबल लावणे गरजेचे आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष रत्नागिरी जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर व जिल्हा व्यवस्थापक विपणन अतुल चाटे यांच्या मदतीने लेबलिंग व पॅकिंगचे प्रशिक्षण देण्यात आले; शिवाय उत्पादक गटाचे फूड लायसेन्स, उद्योग आधार व इतर कागदपत्रांसाठी मार्गदर्शन केले.

माल तयार झाल्यानंतर माल विकण्याचा मार्ग शोधतानाच ‘उमेद’अंतर्गत विविध व्यापारी यांचे पत्ते व मोबाईल क्रमांक मिळविण्यात आले. त्यानंतर प्रक्रिया केलेले काजूगर मुंबई, पुणे, गुजरात येथे विक्रीसाठी पाठविण्यात आले. मोठ्या शहराबरोबर परराज्यांतून मागणी वाढू लागली. त्यानंतर स्थानिक बाजारपेठेतही विक्री सोपी झाली. मावळंगेतील १५ महिलांनी एकत्रित येऊन काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू केला असून, अन्य बचतगटांतील महिलांसाठी तो प्रेरणादायी आहे.