शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी पासपोर्टची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:22 IST

राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांच्या हस्ते झाले. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात हा कार्यक्रम पार पडला.कोकणातील दोन जिल्ह्यांसाठी प्रथमच सुरू होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र्र, पुढील काही महिन्यांत सुरू होणारी विमानसेवा अशा विविध सुविधांमुळे येथील कोकणच्या विकासाला ...

राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांच्या हस्ते झाले. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात हा कार्यक्रम पार पडला.कोकणातील दोन जिल्ह्यांसाठी प्रथमच सुरू होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र्र, पुढील काही महिन्यांत सुरू होणारी विमानसेवा अशा विविध सुविधांमुळे येथील कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.अलीकडच्या काळात कोकणचा विकास झपाट्याने होत आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळ सज्ज झाले असून, लवकरच तेथून विमान उड्डाण घेतील. कोकण रेल्वे मार्गावर सुधारणा होत आहेत. महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे.त्यानंतर आता कोकणात प्रथमच दोन जिल्ह्यांसाठी राजापूरमधील पोस्ट कार्यालयात टपाल पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत असून, या सर्वांचे श्रेय हे खासदार विनायक राऊत यांना असल्याची भावना वायकर यांनी व्यक्त केली. त्यावेळी खासदार राऊत यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. राजापूर पंचायत समितीला नवीन सभागृह देणार असून, त्यासाठी ५० लाखांचा निधी देणार असल्याची पालकमंत्र्यांनी घोषणा केली.दोन जिल्ह्यातील विमानतळांवरून विमानसेवादेखील लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणचा विकास जलदगतीने होणार असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. कोकणात पासपोर्ट सेवा केंद्र्र व्हावे, अशी मागील ३५ वर्षे मागणी होती पण ती काही केंद्र्र सरकारला पूर्ण करता आली नव्हती. मात्र ते शिवधनुष्य खासदार विनायक राऊत यांनी यशस्वीपणे पेलवले. साधारणपणे कोणत्याही विकासकामाला अधिकारीवर्गाची साथ नसेल, तर कामे खोळंबतात पण पासपोर्ट सेवा केंद्रासाठी संबंधित अधिकाºयांनी चांगले सहकार्य केले, याचा त्यांनी उल्लेख केला.सेवेमुळे परदेशगमनाला जाणाºया सर्वांना आता पासपोर्टसाठी कुठेच जाण्याची गरज नाही. आता राजापुरातच ती सेवा सुरु झाली आहे. याबद्दल आमदार राजन साळवी यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित असणाºया पासपोर्ट विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी पासपोर्ट सेवेबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यानुसार देशात सध्या ३६ पासपोर्ट कार्यालये असून, ९२ सेवाकेंद्रे व २१५ पीओपीएससी सेवा सुरु असल्याची माहिती दिली. देशात वर्षाला सात ते आठ लाख नवीन पासपोर्ट काढले जातात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, स्थानिक आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, विधानपरिषद सदस्य अ‍ॅड. हुस्नबानु खलिफे, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, राजापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, सभापती अभिजित तेली, मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट सेवेच्या अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्राचे डॉ. एन. विनोदकुमार, माजी आमदार गणपत कदम, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, महिला आघाडीच्या शिल्पा सुर्वे, तहसीलदार प्रतिभा वराळे, उपसभापती प्रशांत गावकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिलकुमार करगुटकर यासह पोस्ट कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.बीएसएनएल अधिकाºयांशी चर्चा करणारसर्व प्रयत्न सुरू असताना संबंधित अधिकाºयांनीदेखील चांगले सहकार्य केल्यामुळे कोणतीच अडचण आली नाही. कोकणात प्रथमच पासपोर्ट सेवा केंद्र्र सुरु झाले असून त्यांना ‘कनेक्टिव्हीटी’ची अडचण येऊ नये म्हणून मुंबईतील ‘बीएसएनएल’च्या अधिकाºयांशी आपण चर्चा करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.