शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पावणे सोळा लाख खर्चाविना

By admin | Updated: February 2, 2015 00:03 IST

कृषी विभाग : भात मळणी यंत्राची आॅर्डर रद्द

रत्नागिरी : शेतकऱ्यांना पारंपरिक पध्दतीने मळणी करण्यापेक्षा आधुनिक यंत्राव्दारे मळणी करता यावी, यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून १०५ मळणी यंत्राची आॅर्डर देण्यात आली होती. त्यासाठी १५ लाख ७५ हजाराचे अनुदान मंजूर झाले होते. मात्र, मळणी यंत्राची अचानक आॅर्डर रद्द केल्यामुळे संबंधित अनुदान कृषी विभागाकडे पडून राहिले आहे.भात मळणीसाठी अद्यापही पारंपरिक पध्दत अवलंबण्यात येते. त्यासाठी, वेळही अधिक जातो व परिश्रमही अधिक घ्यावे लागतात. तसेच मजुरीचा खर्चही वाढतो. मात्र, आता यांत्रिक शेतीचा जमाना आला आहे. त्यामुळे शेतकरीही आता या यांत्रिक शेतीकडे वळू लागले आहेत. मळणी कमीत कमी वेळेत लवकर पूर्ण व्हावी, याकरिता अत्याधुनिक मळणी यंत्र अनुदानावर पुरवण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने १०५ यंत्राची आॅर्डर नोंदवली होती. संबंधित यंत्राची किमंत १८ हजार असून, शासकीय अनुदान म्हणून १५ हजार तर शेतकऱ्यांना केवळ तीन हजार भरायचे होते. अतिशय माफक दरात मळणी यंत्र उपलब्ध होणार असल्याने, जिल्हाभरातून १०५ यंत्रांची मागणी करण्यात आली होती. मळणी यंत्रणासाठी प्रत्येक १५ हजार प्रमाणे १५ लाख ७५ हजारांचे अनुदान जिल्ह्याच्या कृषी विभागास प्राप्त देखील झाले होते.मात्र, अचानक कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित आॅर्डरच रद्द केल्यामुळे, शेतकरी मळणी यंत्रापासून वंचित तर राहिलेच; शिवाय त्यासाठी आलेले अनुदान अद्याप पडून आहे. वास्तविक गतवर्षीचा हंगाम आता संपला असल्याने, तरी यावर्षीच्या हंगामासाठीही मळणी यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु, पुढील हंगामासाठी मळणी यंत्राची आॅर्डर द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.वास्तविक शासन यांत्रिक शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे. किंबहुना, शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध योजनादेखील राबवत आहे. परंतु, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील शेतकरी सुविधांपासून वंचित राहत आहे. (प्रतिनिधी)