शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

एप्रिलपासून प्रवाशांना तिकीट दराचा भुर्दंड

By admin | Updated: March 27, 2016 01:04 IST

पुन्हा भाडेवाढ : तिकिटाच्या किंमतीवर रुपयाचा सेस

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने तिकीटाच्या किंमतीवर १ रूपया सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दि. १ एप्रिलपासून प्रवाशांना तिकीटाच्या भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी दिवाळीमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एस. टी.ला होणारा तोटा भरुन काढण्यासाठी वीस दिवसांकरिता ही हंगामी भाडेवाढ दि. ५ ते दि. २५ नोव्हेंबरपर्यंत केली होती. महामंडळातर्फे अपघातग्रस्त मृत प्रवाशांच्या नातेवाईकाला ३ लाख रूपये व जखमी प्रवाशाला ४० हजार रूपयांपासून ७५ हजार रूपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते. या रकमेत वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार मृत प्रवाशांच्या वारसांना दहा लाख रूपये देण्यात येणार आहेत. तसेच जखमींना देण्यात येणाऱ्या मदत निधीतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित वाढीव निधी देण्यासाठी तिकीटदरावर एक रूपयांची वाढ करण्यात येणार आहे. संबंधित भाडेवाढीची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून लागू होणार आहे. यापूर्वी महामंडळाने दि. २२ आॅगस्ट २०१४ रोजी भाडेवाढ केली होती. त्यानंतर दि. ५ ते दि. २५ नोव्हेंबरपर्यंत लवचिक भाडेवाढ करण्यात आली होती. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या प्रवाशांना या तिकीटवाढीचा दणका बसणार आहे. रत्नागिरी विभागाचे महिन्याचे उत्पन्न ३० कोटी इतके आहे. भाडेवाढीमुळे या उत्पन्नात १ कोटीची वाढ होणार आहे. रत्नागिरी - आरेवारेमार्गे - गणपतीपुळे पूर्वीचा तिकीट दर ३२ रुपये असून, आता तो ३३ रूपये होणार असून, रत्नागिरी - कोतवडेमार्गे गणपतीपुळे तिकीट दर ४४ रूपये असून, तो आता ४५ रूपये होणार आहे. रत्नागिरी चाफेमार्गे गणपतीपुळे तिकीट दर ५० रूपये असून, तो आता ५१ रूपये होणार आहे. महामंडळातर्फे दि. २२ आॅगस्ट २०१४ रोजी नियमीत भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इंधनाचे दरातील चढउतार विचारात घेता महामंडळाने तिकिट दर स्थिर ठेवले होते. मात्र, दिवाळीच्या सुटीत सहलीसाठी व पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेतातोटा भरुन काढण्यासाठी हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे. ही भाडेवाढ केवळ गर्दीच्या हंगामासाठी लागू राहणार असल्याचे एस. टी.च्या सूत्रांनी सांगितले. प्रत्येक तिकीटामागे एक रूपयांची वाढ प्रवाशांना सोसावी लागणार आहे. सध्या रत्नागिरी विभागातील काही महत्वाच्या मार्गावर सुरू असणाऱ्या गाड्यांचे सध्याचे तिकीट दर व एक रूपयांप्रमाणे वाढ केल्यास प्रत्येक तिकीट दर एक रुपयाने वाढणार आहे. (प्रतिनिधी)