शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

माता-पिता, ज्येष्ठांसाठी न्यायाधिकरण

By admin | Updated: February 18, 2016 21:16 IST

रत्नागिरीत अधिकाऱ्यांची नियुक्ती : उपेक्षित पालकांना मिळणार न्याय

रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांना नातेवाईकांकडून किंवा माता-पित्यांना त्यांच्या मुलांकडून उपेक्षित ठरवले जाते. त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आता माता - पिता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात पीठासन अधिकारी, निर्वाह अधिकारी, अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. ७५/२०१३ अन्वये शासनाच्या २८ सप्टेंबर २०१०च्या अधिसूचनेद्वारे माता-पिता ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियत २००७ मधील कलम ७नुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांची पीठासन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ४ मे २०११च्या अधिसूचनेद्वारे कलम १८ अन्वये जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांची निर्वाह अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २८ सप्टेंबर २०१०च्या अधिसूचनेद्वारे कलम १५नुसार जिल्हाधिकाऱ्यांना अपिलीय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.संपर्कासाठी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड आणि राजापूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. निर्वाह अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, ता जि. रत्नागिरी. अपिलीय अधिकारी : राधाकृष्ण बी. जिल्हाधिकारी यांची नेमणूक झाली आहे.या न्यायाधिकरणाला अधिनियमाच्या कलम ५ अन्वये निर्वाह खर्चाबाबतचे आदेश अधिनिर्णित करणे व कलम २३अन्वये आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांनी मुलांच्या व नातेवाईकांच्या नावे यापूर्वी हस्तांतरीत केलेली मालमत्ता हस्तांतरण विशिष्ट परिस्थितीत अवैध ठरवण्याचा अधिकार पीठासन अधिकारी यांना आहे. या अधिनियमान्वये न्यायाधिकरणाच्या आदेशावरील अपिलाची सुनावणी करण्यासाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व ज्या ज्येष्ठ नागारिकांना त्यांची मुले वा नातेवाईक सांभाळत नसतील, त्यांनी इच्छा असल्यास त्यांची निर्वाह न्यायाधिकरण किंवा अपिलीय बाजू मांडण्यासाठी रत्नागिरी येथील न्यायाधिकरणाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन अपिलीय अधिकारी तथा माता-पिता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण, तथा जिल्हाधिकारी, रत्नागिरी याच्याकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सर्व उपविभागीय अधिकारी होणार पीठासन अधिकारीज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले वा नातेवाईक सांभाळत नाहीत, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन.२८ सप्टेंबर २०१०च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी अपिलीय अधिकारी म्हणूून घोषित.