शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

माता-पिता, ज्येष्ठांसाठी न्यायाधिकरण

By admin | Updated: February 18, 2016 21:16 IST

रत्नागिरीत अधिकाऱ्यांची नियुक्ती : उपेक्षित पालकांना मिळणार न्याय

रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांना नातेवाईकांकडून किंवा माता-पित्यांना त्यांच्या मुलांकडून उपेक्षित ठरवले जाते. त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आता माता - पिता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात पीठासन अधिकारी, निर्वाह अधिकारी, अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. ७५/२०१३ अन्वये शासनाच्या २८ सप्टेंबर २०१०च्या अधिसूचनेद्वारे माता-पिता ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियत २००७ मधील कलम ७नुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांची पीठासन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ४ मे २०११च्या अधिसूचनेद्वारे कलम १८ अन्वये जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांची निर्वाह अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २८ सप्टेंबर २०१०च्या अधिसूचनेद्वारे कलम १५नुसार जिल्हाधिकाऱ्यांना अपिलीय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.संपर्कासाठी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड आणि राजापूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. निर्वाह अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, ता जि. रत्नागिरी. अपिलीय अधिकारी : राधाकृष्ण बी. जिल्हाधिकारी यांची नेमणूक झाली आहे.या न्यायाधिकरणाला अधिनियमाच्या कलम ५ अन्वये निर्वाह खर्चाबाबतचे आदेश अधिनिर्णित करणे व कलम २३अन्वये आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांनी मुलांच्या व नातेवाईकांच्या नावे यापूर्वी हस्तांतरीत केलेली मालमत्ता हस्तांतरण विशिष्ट परिस्थितीत अवैध ठरवण्याचा अधिकार पीठासन अधिकारी यांना आहे. या अधिनियमान्वये न्यायाधिकरणाच्या आदेशावरील अपिलाची सुनावणी करण्यासाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व ज्या ज्येष्ठ नागारिकांना त्यांची मुले वा नातेवाईक सांभाळत नसतील, त्यांनी इच्छा असल्यास त्यांची निर्वाह न्यायाधिकरण किंवा अपिलीय बाजू मांडण्यासाठी रत्नागिरी येथील न्यायाधिकरणाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन अपिलीय अधिकारी तथा माता-पिता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण, तथा जिल्हाधिकारी, रत्नागिरी याच्याकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सर्व उपविभागीय अधिकारी होणार पीठासन अधिकारीज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले वा नातेवाईक सांभाळत नाहीत, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन.२८ सप्टेंबर २०१०च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी अपिलीय अधिकारी म्हणूून घोषित.