शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

माता-पिता, ज्येष्ठांसाठी न्यायाधिकरण

By admin | Updated: February 18, 2016 21:16 IST

रत्नागिरीत अधिकाऱ्यांची नियुक्ती : उपेक्षित पालकांना मिळणार न्याय

रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांना नातेवाईकांकडून किंवा माता-पित्यांना त्यांच्या मुलांकडून उपेक्षित ठरवले जाते. त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आता माता - पिता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात पीठासन अधिकारी, निर्वाह अधिकारी, अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. ७५/२०१३ अन्वये शासनाच्या २८ सप्टेंबर २०१०च्या अधिसूचनेद्वारे माता-पिता ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियत २००७ मधील कलम ७नुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांची पीठासन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ४ मे २०११च्या अधिसूचनेद्वारे कलम १८ अन्वये जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांची निर्वाह अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २८ सप्टेंबर २०१०च्या अधिसूचनेद्वारे कलम १५नुसार जिल्हाधिकाऱ्यांना अपिलीय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.संपर्कासाठी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड आणि राजापूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. निर्वाह अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, ता जि. रत्नागिरी. अपिलीय अधिकारी : राधाकृष्ण बी. जिल्हाधिकारी यांची नेमणूक झाली आहे.या न्यायाधिकरणाला अधिनियमाच्या कलम ५ अन्वये निर्वाह खर्चाबाबतचे आदेश अधिनिर्णित करणे व कलम २३अन्वये आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांनी मुलांच्या व नातेवाईकांच्या नावे यापूर्वी हस्तांतरीत केलेली मालमत्ता हस्तांतरण विशिष्ट परिस्थितीत अवैध ठरवण्याचा अधिकार पीठासन अधिकारी यांना आहे. या अधिनियमान्वये न्यायाधिकरणाच्या आदेशावरील अपिलाची सुनावणी करण्यासाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व ज्या ज्येष्ठ नागारिकांना त्यांची मुले वा नातेवाईक सांभाळत नसतील, त्यांनी इच्छा असल्यास त्यांची निर्वाह न्यायाधिकरण किंवा अपिलीय बाजू मांडण्यासाठी रत्नागिरी येथील न्यायाधिकरणाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन अपिलीय अधिकारी तथा माता-पिता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण, तथा जिल्हाधिकारी, रत्नागिरी याच्याकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सर्व उपविभागीय अधिकारी होणार पीठासन अधिकारीज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले वा नातेवाईक सांभाळत नाहीत, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन.२८ सप्टेंबर २०१०च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी अपिलीय अधिकारी म्हणूून घोषित.