शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कातळावर फुलवले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

वेतोशी येथे शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय सुरू केले आहेत. कातळावर जमीन असल्याने पाण्यासाठी विहीर आहे. मात्र, उन्हाळ्यात ...

वेतोशी येथे शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय सुरू केले आहेत. कातळावर जमीन असल्याने पाण्यासाठी विहीर आहे. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाण्याची उपलब्धता होत नाही. शेतीबरोबर जनावरांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, येथील जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नसल्याने पाण्याचा निचरा होतो. शासनाच्या योजनेचा लाभ घेत, साळुंखे यांनी शेततळे बांधले आहे. यामुळे एक कोटी लीटर पाण्याचा संचय होईल, इतकी क्षमता आहे. सध्या विहिरीचे पाणी तळ्यात साठविण्यात येत आहे. मात्र, येत्या पावसाळ्यात पाणी संचय होऊन, त्याचा वापर शेतीसाठी करता येणार आहे.

शेतीसाठी मजुरांची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यांत्रिक अवजारांचा पर्याय योग्य ठरत आहे. ग्रासकटर, पॉवर टिलर, पॉवर स्प्रेअरचा वापर ते करीत आहेत. सेंद्रीय शेतीकडे त्यांचा कल अधिक असल्याने गांडूळ खत युनिट उभारले आहे. पालापाचोळा संकलित करून गांडूळखत निर्मिती करीत आहेत. १० टन खत ते दरवर्षी तयार करतात.

भातशेतीबरोबर भुईमूग लागवड, तसेच भाजीपाला उत्पादन साळुंखे घेत आहेत. आंबा, काजू, तसेच अन्य पिकांचा दर्जा चांगला असल्याने विक्रीही चांगली होते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुट व शेळी पालनातूनही त्यांना चांगले अर्थाजन प्राप्त होत आहे. सेवानिवृत्तीनंतर साळुंखे यांनी स्वत:ला शेतीच्या कामात वाहून घेतले आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनाही शेतीची आवड असल्याने प्रत्येक कामात त्यांची मदत होत आहे.

शेततळ्यामुळे पाण्याची उपलब्धता होणार असल्याने उर्वरित पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे फायदेशीर ठरते. पिकांची लागवड, लागवडीच्या पद्धती याबाबत सतत माहिती ते घेत असतात. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मीकांत मांडवकर, कृषी सहायक सचिन पवार यांचे मार्गदर्शन लाभत असून, शेततळ्यामुळे साळुंखे यांची पाण्याची समस्या मार्गी लागली आहे.

वेतोशी येथे अशोक साळुंखे यांनी शेतीला बारमाही पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी शेततळे खोदले आहे.

शेतीची आवड पूर्वीपासून असल्याने निवृत्तीनंतर शेतीकडे वळलो. बारमाही शेतीसाठी पाण्याची उपलब्धता गरजेची आहे. विहिरीचे मे महिन्यापर्यंत उपलब्ध होत नसल्याने शेततळ्याचा पर्याय योग्य असल्याची खात्री पटली. त्यानंतर, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांचे मार्गदर्शन घेतले. शासनाच्या अनुदानाचा लाभ घेत शेततळे उभारण्यात असून, यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला, शिवाय पडीक क्षेत्र लागवडीखाली येणार आहे.

- रमेश साळुंखे, शेतकरी