शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कातळावर फुलवले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

वेतोशी येथे शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय सुरू केले आहेत. कातळावर जमीन असल्याने पाण्यासाठी विहीर आहे. मात्र, उन्हाळ्यात ...

वेतोशी येथे शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय सुरू केले आहेत. कातळावर जमीन असल्याने पाण्यासाठी विहीर आहे. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाण्याची उपलब्धता होत नाही. शेतीबरोबर जनावरांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, येथील जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नसल्याने पाण्याचा निचरा होतो. शासनाच्या योजनेचा लाभ घेत, साळुंखे यांनी शेततळे बांधले आहे. यामुळे एक कोटी लीटर पाण्याचा संचय होईल, इतकी क्षमता आहे. सध्या विहिरीचे पाणी तळ्यात साठविण्यात येत आहे. मात्र, येत्या पावसाळ्यात पाणी संचय होऊन, त्याचा वापर शेतीसाठी करता येणार आहे.

शेतीसाठी मजुरांची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यांत्रिक अवजारांचा पर्याय योग्य ठरत आहे. ग्रासकटर, पॉवर टिलर, पॉवर स्प्रेअरचा वापर ते करीत आहेत. सेंद्रीय शेतीकडे त्यांचा कल अधिक असल्याने गांडूळ खत युनिट उभारले आहे. पालापाचोळा संकलित करून गांडूळखत निर्मिती करीत आहेत. १० टन खत ते दरवर्षी तयार करतात.

भातशेतीबरोबर भुईमूग लागवड, तसेच भाजीपाला उत्पादन साळुंखे घेत आहेत. आंबा, काजू, तसेच अन्य पिकांचा दर्जा चांगला असल्याने विक्रीही चांगली होते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुट व शेळी पालनातूनही त्यांना चांगले अर्थाजन प्राप्त होत आहे. सेवानिवृत्तीनंतर साळुंखे यांनी स्वत:ला शेतीच्या कामात वाहून घेतले आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनाही शेतीची आवड असल्याने प्रत्येक कामात त्यांची मदत होत आहे.

शेततळ्यामुळे पाण्याची उपलब्धता होणार असल्याने उर्वरित पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे फायदेशीर ठरते. पिकांची लागवड, लागवडीच्या पद्धती याबाबत सतत माहिती ते घेत असतात. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मीकांत मांडवकर, कृषी सहायक सचिन पवार यांचे मार्गदर्शन लाभत असून, शेततळ्यामुळे साळुंखे यांची पाण्याची समस्या मार्गी लागली आहे.

वेतोशी येथे अशोक साळुंखे यांनी शेतीला बारमाही पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी शेततळे खोदले आहे.

शेतीची आवड पूर्वीपासून असल्याने निवृत्तीनंतर शेतीकडे वळलो. बारमाही शेतीसाठी पाण्याची उपलब्धता गरजेची आहे. विहिरीचे मे महिन्यापर्यंत उपलब्ध होत नसल्याने शेततळ्याचा पर्याय योग्य असल्याची खात्री पटली. त्यानंतर, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांचे मार्गदर्शन घेतले. शासनाच्या अनुदानाचा लाभ घेत शेततळे उभारण्यात असून, यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला, शिवाय पडीक क्षेत्र लागवडीखाली येणार आहे.

- रमेश साळुंखे, शेतकरी