शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

कातळावर फुलवले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

वेतोशी येथे शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय सुरू केले आहेत. कातळावर जमीन असल्याने पाण्यासाठी विहीर आहे. मात्र, उन्हाळ्यात ...

वेतोशी येथे शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय सुरू केले आहेत. कातळावर जमीन असल्याने पाण्यासाठी विहीर आहे. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाण्याची उपलब्धता होत नाही. शेतीबरोबर जनावरांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, येथील जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नसल्याने पाण्याचा निचरा होतो. शासनाच्या योजनेचा लाभ घेत, साळुंखे यांनी शेततळे बांधले आहे. यामुळे एक कोटी लीटर पाण्याचा संचय होईल, इतकी क्षमता आहे. सध्या विहिरीचे पाणी तळ्यात साठविण्यात येत आहे. मात्र, येत्या पावसाळ्यात पाणी संचय होऊन, त्याचा वापर शेतीसाठी करता येणार आहे.

शेतीसाठी मजुरांची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यांत्रिक अवजारांचा पर्याय योग्य ठरत आहे. ग्रासकटर, पॉवर टिलर, पॉवर स्प्रेअरचा वापर ते करीत आहेत. सेंद्रीय शेतीकडे त्यांचा कल अधिक असल्याने गांडूळ खत युनिट उभारले आहे. पालापाचोळा संकलित करून गांडूळखत निर्मिती करीत आहेत. १० टन खत ते दरवर्षी तयार करतात.

भातशेतीबरोबर भुईमूग लागवड, तसेच भाजीपाला उत्पादन साळुंखे घेत आहेत. आंबा, काजू, तसेच अन्य पिकांचा दर्जा चांगला असल्याने विक्रीही चांगली होते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुट व शेळी पालनातूनही त्यांना चांगले अर्थाजन प्राप्त होत आहे. सेवानिवृत्तीनंतर साळुंखे यांनी स्वत:ला शेतीच्या कामात वाहून घेतले आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनाही शेतीची आवड असल्याने प्रत्येक कामात त्यांची मदत होत आहे.

शेततळ्यामुळे पाण्याची उपलब्धता होणार असल्याने उर्वरित पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे फायदेशीर ठरते. पिकांची लागवड, लागवडीच्या पद्धती याबाबत सतत माहिती ते घेत असतात. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मीकांत मांडवकर, कृषी सहायक सचिन पवार यांचे मार्गदर्शन लाभत असून, शेततळ्यामुळे साळुंखे यांची पाण्याची समस्या मार्गी लागली आहे.

वेतोशी येथे अशोक साळुंखे यांनी शेतीला बारमाही पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी शेततळे खोदले आहे.

शेतीची आवड पूर्वीपासून असल्याने निवृत्तीनंतर शेतीकडे वळलो. बारमाही शेतीसाठी पाण्याची उपलब्धता गरजेची आहे. विहिरीचे मे महिन्यापर्यंत उपलब्ध होत नसल्याने शेततळ्याचा पर्याय योग्य असल्याची खात्री पटली. त्यानंतर, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांचे मार्गदर्शन घेतले. शासनाच्या अनुदानाचा लाभ घेत शेततळे उभारण्यात असून, यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला, शिवाय पडीक क्षेत्र लागवडीखाली येणार आहे.

- रमेश साळुंखे, शेतकरी