शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पानवलचे पाणी आता आठवडाभरच

By admin | Updated: February 11, 2016 00:34 IST

रत्नागिरी नगर पालिका : धरणातील पाण्याने गाठला तळ, प्रयत्न चर्चेतच अडकलेले!

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पानवल धरणातील पाणीसाठा येत्या आठवडाभरात संपणार आहे. १९६५ सालापासून कार्यरत असलेल्या या धरणातील पाणी गुरुत्वबलाने रत्नागिरी शहराला मार्च, एप्रिल महिन्यांपर्यत याआधी पुरविले जात होते. दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच पानवल धरणाची पाणी साठवण क्षमता घटली व शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लोखंडी व बाहेरून सिमेंट असलेली पानवल धरणापासून ते रत्नागिरी शहरापर्यंतची जलवाहीनी १९६५ पासून कार्यरत झाली. त्याचवेळी हे धरण प्रत्यक्षात सुरू करण्यात आले. या धरणातील पाणी वीज न वापरता गुरुत्वबलाच्या सहाय्याने रत्नागिरीपर्यंत गेल्या ५० वर्षांपासून आणले जात आहे. मात्र, राजकीय उदासिनतेमुळे गाळात रुतलेल्या व गळतीमुळे कमकुवत झालेल्या या धरणाची दुरुस्ती न झाल्याने गेल्या पाच वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच या धरणाचे पाणी आटत आहे. पानवल धरणातून प्रतिदिवस २ दशलक्ष घनमीटर पाणी रत्नागिरी शहराला पुरविले जाते. या धरणातील गाळही सात वर्षांपूर्वी उपसण्यात आला होता. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, हा गाळ अन्यत्र न हलवता धरणाच्या काठावरच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात पुन्हा धरणात वाहून गेला होता. त्यानंतर या धरणाच्या दुरुस्तीबाबत वा नवीन धरण या जुन्या धरणाच्या शेजारीच बांधण्याबाबत अनेक वेळा चर्चा झाली. शासनाच्या योजनेतून या धरणाची दुरुस्ती करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानुसार अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे धरणाच्या दुर्दशेचा फेरा अजूनही कायम आहे. शहराला दररोज १४ ते १६ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. यातील सर्वाधिक १२ ते १४ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा हा शीळ धरणातून केला जातो. मात्र, शीळ धरणातील पाणी ३०० अश्वशक्तीच्या तीन पंपांद्वारे उपसा करून ते जलवाहिनीद्वारे साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रात आणले जाते. त्यानंतर शहरात वितरित केले जाते. मात्र, शीळचे पाणी शहरात आणण्यासाठी दर महिन्याला नगरपरिषदेला १६ ते २० लाखांचे वीजबिल भरावे लागते. वर्षाला हे वीजबिल दोन कोटींच्यावर येते. नगरपरिषदेवर हा वीजबिलाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पानवलचे पाणी रत्नागिरी शहरापर्यंत गुरुत्वबलादवारे (ग्रॅव्हिटी) आणले जात असल्याने त्यासाठी विजेचा खर्च येत नाही. त्यामुळे पानवल धरणाची दुरुस्ती करून, उंची वाढवून तसेच धरणातील गाळ उपसा करून या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करणे शक्य आहे. परंतु राजकीय उदासिनतेमुळे १९६५ मध्ये उभारलेले पानवलचे धरण अखेरच्या घटका मोजत आहे. (प्रतिनिधी)सवाल : नवीन प्रस्तावाचे झाले काय?पानवल धरणाच्या जुन्या बांधकामाशेजारीच पाणी अडविण्यासाठी नवीन धरण बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. जीवन प्राधिकरणकडून हे काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. शासनाकडून निधीचीही व्यवस्था झाल्याचे जाहीर झाले होते. या व्यवस्थेनुसार पानवल धरणाची दुरुस्ती करून जुलैपासून पुढे सहा महिने पानवलचे सर्वाधिक पाणी रत्नागिरीसाठी वापरावयाचे व शीळचे पाणी कमीत कमी वापरायचे. त्यातून वीजबिलात बचत करायची, असे ठरले होते. नंतरच्या मे महिन्यापर्यंतच्या सहा महिन्यात शीळ धरणाचे सर्वाधिक पाणी वापरायचे, असे ठरले होते. परंतु,वर्षभरापूर्वीच्या या प्रस्तावाचे नेमके काय झाले, याचा अद्याप पत्ता नाही. पानवलचे धरण नवीन होणार काय, असा सवाल आता नागरिकांतून होत आहे.