शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जिल्ह्यातील पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बागायतीचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यातील आंबा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला. अनेक शेतकऱ्यांची आंबे, काजू, ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बागायतीचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यातील आंबा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला. अनेक शेतकऱ्यांची आंबे, काजू, नारळ, सुपारी, फणसाची झाडे उन्मळून पडली. फांद्या तुटल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०० हेक्टर क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

सागरी किनारपट्टी लगतच्या गावात वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. ग्रामीण तसेच शहरी भागातील झाडे कोसळली. वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने विजेचे खांब, वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच शेवटच्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यापूर्वीच वादळाचे भक्ष्य बनला. नारळ, काजू, फणस, सुपारीची झाडेही वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार अडीच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. गावागावांत कृषी सहायक, पर्यवेक्षक, अधिकारी पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत १२०० शेतकऱ्यांचे पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ४१० शेतकऱ्यांचे २३५ हेक्टर क्षेत्र वादळामुळे बाधित झाल्याचे पंचनाम्यात आढळले आहे. उर्वरित तालुक्यातील बाधित क्षेत्राचे पंचनाम्याचे काम सुरू आहे.

...................

राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली तालुक्यातील बाधित क्षेत्राचे पंचनामे लवकरच पूर्ण करून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. येत्या पाच-सहा दिवसांत वादळग्रस्त तालुक्यातील बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.