शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

जिल्ह्यातील पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बागायतीचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यातील आंबा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला. अनेक शेतकऱ्यांची आंबे, काजू, ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बागायतीचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यातील आंबा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला. अनेक शेतकऱ्यांची आंबे, काजू, नारळ, सुपारी, फणसाची झाडे उन्मळून पडली. फांद्या तुटल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०० हेक्टर क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

सागरी किनारपट्टी लगतच्या गावात वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. ग्रामीण तसेच शहरी भागातील झाडे कोसळली. वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने विजेचे खांब, वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच शेवटच्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यापूर्वीच वादळाचे भक्ष्य बनला. नारळ, काजू, फणस, सुपारीची झाडेही वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार अडीच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. गावागावांत कृषी सहायक, पर्यवेक्षक, अधिकारी पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत १२०० शेतकऱ्यांचे पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ४१० शेतकऱ्यांचे २३५ हेक्टर क्षेत्र वादळामुळे बाधित झाल्याचे पंचनाम्यात आढळले आहे. उर्वरित तालुक्यातील बाधित क्षेत्राचे पंचनाम्याचे काम सुरू आहे.

...................

राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली तालुक्यातील बाधित क्षेत्राचे पंचनामे लवकरच पूर्ण करून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. येत्या पाच-सहा दिवसांत वादळग्रस्त तालुक्यातील बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.