शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जिल्ह्यातील पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बागायतीचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यातील आंबा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला. अनेक शेतकऱ्यांची आंबे, काजू, ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बागायतीचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यातील आंबा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला. अनेक शेतकऱ्यांची आंबे, काजू, नारळ, सुपारी, फणसाची झाडे उन्मळून पडली. फांद्या तुटल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०० हेक्टर क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

सागरी किनारपट्टी लगतच्या गावात वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. ग्रामीण तसेच शहरी भागातील झाडे कोसळली. वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने विजेचे खांब, वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच शेवटच्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यापूर्वीच वादळाचे भक्ष्य बनला. नारळ, काजू, फणस, सुपारीची झाडेही वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार अडीच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. गावागावांत कृषी सहायक, पर्यवेक्षक, अधिकारी पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत १२०० शेतकऱ्यांचे पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ४१० शेतकऱ्यांचे २३५ हेक्टर क्षेत्र वादळामुळे बाधित झाल्याचे पंचनाम्यात आढळले आहे. उर्वरित तालुक्यातील बाधित क्षेत्राचे पंचनाम्याचे काम सुरू आहे.

...................

राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली तालुक्यातील बाधित क्षेत्राचे पंचनामे लवकरच पूर्ण करून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. येत्या पाच-सहा दिवसांत वादळग्रस्त तालुक्यातील बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.