शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाड्यांना मिळणार आता सकस खाद्य

By admin | Updated: May 21, 2015 00:07 IST

पशुसंवर्धन विभाग : ७५ लाखांची तरतूद

रत्नागिरी : गोधन वाढ आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी कपिला उत्कर्ष योजना राबवून गाय व म्हशींच्या पाड्यांना वयात येईपर्यंत १०० टक्के अनुदानातून सकस व संतुलित पशुखाद्य पुरवठा करण्यात येणार आहे.शेतीला दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा असून, त्यावर कोकणात जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस मोठा हातभार लाभणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पशुधन वाढीसाठी विविध योजनांची चांगल्या रितीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग विशेष प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात कपिला उत्कर्ष योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ७५ लाख रुपयांची तरतूद करुन त्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळाकडे केली आहे. या योजनेअंतर्गत गाय आणि म्हशीच्या पाड्यांना ते वयात येईपर्यंत १२ हजार रुपये किमतीचे खाद्य १०० टक्के अनुदानावर पुरवले जाणार आहे.त्याचबरोबर सुमारे १५०० रुपये किमतीचे क्षार मिश्रण व जीवनसत्त्वांचा पुरवठा केला जाणार असून, १५०० रुपये विम्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण १५ हजार रुपये एका पाड्यावर केले जाणार आहेत. त्यामुळे पाडे सुदृढ होण्यास मदत होणार असून, या योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाने आखणी सुरु केली आहे.या योजनेचा लाभ देण्यासाठी गावोगावी गोपालकांचा गट तयार करुन गटनिहाय लाभधारकांची निवड केली जाणार आहे. ही योजना तळागाळापर्यंत राबवता यावी, यासाठी महिला बचत गटांचा आधार घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचणार असून, त्याचा फायदाही चांगला घेता येणार आहे. (शहर वार्ताहर)पशुधन वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्याला चांगल्या प्रकारे यशही येत आहे. त्याचप्रमाणे कपिला उत्कर्ष योजनेतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देण्यासाठी गोपालकांचे गट तयार करुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. सुभाष म्हस्केजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद, रत्नागिरी.