शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाड्यांना मिळणार आता सकस खाद्य

By admin | Updated: May 21, 2015 00:07 IST

पशुसंवर्धन विभाग : ७५ लाखांची तरतूद

रत्नागिरी : गोधन वाढ आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी कपिला उत्कर्ष योजना राबवून गाय व म्हशींच्या पाड्यांना वयात येईपर्यंत १०० टक्के अनुदानातून सकस व संतुलित पशुखाद्य पुरवठा करण्यात येणार आहे.शेतीला दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा असून, त्यावर कोकणात जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस मोठा हातभार लाभणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पशुधन वाढीसाठी विविध योजनांची चांगल्या रितीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग विशेष प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात कपिला उत्कर्ष योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ७५ लाख रुपयांची तरतूद करुन त्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळाकडे केली आहे. या योजनेअंतर्गत गाय आणि म्हशीच्या पाड्यांना ते वयात येईपर्यंत १२ हजार रुपये किमतीचे खाद्य १०० टक्के अनुदानावर पुरवले जाणार आहे.त्याचबरोबर सुमारे १५०० रुपये किमतीचे क्षार मिश्रण व जीवनसत्त्वांचा पुरवठा केला जाणार असून, १५०० रुपये विम्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण १५ हजार रुपये एका पाड्यावर केले जाणार आहेत. त्यामुळे पाडे सुदृढ होण्यास मदत होणार असून, या योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाने आखणी सुरु केली आहे.या योजनेचा लाभ देण्यासाठी गावोगावी गोपालकांचा गट तयार करुन गटनिहाय लाभधारकांची निवड केली जाणार आहे. ही योजना तळागाळापर्यंत राबवता यावी, यासाठी महिला बचत गटांचा आधार घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचणार असून, त्याचा फायदाही चांगला घेता येणार आहे. (शहर वार्ताहर)पशुधन वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्याला चांगल्या प्रकारे यशही येत आहे. त्याचप्रमाणे कपिला उत्कर्ष योजनेतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देण्यासाठी गोपालकांचे गट तयार करुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. सुभाष म्हस्केजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद, रत्नागिरी.