शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लसीकरणाची कासवगती; प्रत्येकालाच दाेन्ही डाेस मिळण्यासाठी लागू शकतात पाच वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय असला तरीही सध्या राज्यभरच कोरोनो प्रतिबंधक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय असला तरीही सध्या राज्यभरच कोरोनो प्रतिबंधक लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत पहिला डोस जेमतेम ४० टक्के लोकांना मिळाला असून, दोन्ही डोस केवळ ९ टक्के लोकानांच मिळाले आहेत. हाच वेग राहिला तर प्रत्येकालाच दोन्हीही डोस मिळण्यासाठी पाचपेक्षा अधिक वर्षे वाट पाहावी लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात १८ वर्षांवरील ११ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख ८१ हजार ३४० जणांचे लसीकरण झाले. पहिला डोस ३ लाख ७६ हजार ८५५ जणांना मिळाला तर दोन्हीही डोस मिळालेले लाभार्थी केवळ १ लाख ४ हजार ४८५ इतके आहेत.

दरदिवशी अगदी १५ हजारपेक्षाही अधिक जणांना डोस देण्याची क्षमता जिल्हा आरोग्य यंत्रणेची आहे. मात्र, सध्या लसच येत नसल्याने आता जिल्ह्यात केवळ ९ केंद्रांवर अधूनमधून लस दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला खीळ बसली आहे.

लसीची प्रतीक्षाच...

जिल्ह्यात लसीचा पुरवठा वाढल्यावर लसीकरण केंद्र वाढविण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा लसीचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे मुख्य ८ ते ९ केंद्रांवर अगदी ५० ते १०० एवढेच डोस दिले जात आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या अनेक नागरिकांना लस न घेताच परत फिरावे लागत आहे. अनेकांनी पहिला डोस घेऊन अनेक महिने उलटले आहेत.

अद्याप पहिलाच डाेस मिळेना...

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. परंतु, लस उपलब्ध होत नाही. मी गेल्या कित्येक महिन्यांपासून लस घेण्यासाठी प्रयत्न करूनही अद्याप पहिलाच डोस मिळालेला नाही.

- जयवंत खापरे, करबुडे (ता. रत्नागिरी)

शासनाने १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन करूनही झाले आहे. मात्र, लसीकरणाची तारीख जाहीर झाल्यावर केंद्र निवडण्यासाठी नोंदणी करण्यासाठी लिंक सुरू केल्यानंतर लगेचच नोंदणी बंद होते. त्यामुळे अजूनही पहिला डोस मिळालेला नाही.

- रईस नाकाडे, नेवरे, ता. रत्नागिरी

लसीकरण का वाढेना

प्रारंभी केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि आता अगदी १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, दिवसेंदिवस लस अपुरी पडू लागल्याने लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे.

१३३ केंद्रांत सुरु आहे लसीकरण

जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात मिळून एकूण १३३ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. दि. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात ५ केंद्रांवर प्रारंभ झाला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी आणि लसीचा पुरवठा वाढल्याने १७ केंद्रांवर लस दिली जात होती. त्यानंतर जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य अशा एकूण १३३ ठिकाणी लसीकरणाला सुरूवात झाली आहे. दि. १९ जुलैपर्यंत लसीकरण सुरू होते. मात्र, आता लसीचा पुरवठा अल्प झाला आहे. त्यातच दि. २० ते २४ जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सध्या लसीकरण बंदच आहे.