शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाची कासवगती; प्रत्येकालाच दाेन्ही डाेस मिळण्यासाठी लागू शकतात पाच वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय असला तरीही सध्या राज्यभरच कोरोनो प्रतिबंधक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय असला तरीही सध्या राज्यभरच कोरोनो प्रतिबंधक लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत पहिला डोस जेमतेम ४० टक्के लोकांना मिळाला असून, दोन्ही डोस केवळ ९ टक्के लोकानांच मिळाले आहेत. हाच वेग राहिला तर प्रत्येकालाच दोन्हीही डोस मिळण्यासाठी पाचपेक्षा अधिक वर्षे वाट पाहावी लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात १८ वर्षांवरील ११ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख ८१ हजार ३४० जणांचे लसीकरण झाले. पहिला डोस ३ लाख ७६ हजार ८५५ जणांना मिळाला तर दोन्हीही डोस मिळालेले लाभार्थी केवळ १ लाख ४ हजार ४८५ इतके आहेत.

दरदिवशी अगदी १५ हजारपेक्षाही अधिक जणांना डोस देण्याची क्षमता जिल्हा आरोग्य यंत्रणेची आहे. मात्र, सध्या लसच येत नसल्याने आता जिल्ह्यात केवळ ९ केंद्रांवर अधूनमधून लस दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला खीळ बसली आहे.

लसीची प्रतीक्षाच...

जिल्ह्यात लसीचा पुरवठा वाढल्यावर लसीकरण केंद्र वाढविण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा लसीचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे मुख्य ८ ते ९ केंद्रांवर अगदी ५० ते १०० एवढेच डोस दिले जात आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या अनेक नागरिकांना लस न घेताच परत फिरावे लागत आहे. अनेकांनी पहिला डोस घेऊन अनेक महिने उलटले आहेत.

अद्याप पहिलाच डाेस मिळेना...

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. परंतु, लस उपलब्ध होत नाही. मी गेल्या कित्येक महिन्यांपासून लस घेण्यासाठी प्रयत्न करूनही अद्याप पहिलाच डोस मिळालेला नाही.

- जयवंत खापरे, करबुडे (ता. रत्नागिरी)

शासनाने १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन करूनही झाले आहे. मात्र, लसीकरणाची तारीख जाहीर झाल्यावर केंद्र निवडण्यासाठी नोंदणी करण्यासाठी लिंक सुरू केल्यानंतर लगेचच नोंदणी बंद होते. त्यामुळे अजूनही पहिला डोस मिळालेला नाही.

- रईस नाकाडे, नेवरे, ता. रत्नागिरी

लसीकरण का वाढेना

प्रारंभी केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि आता अगदी १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, दिवसेंदिवस लस अपुरी पडू लागल्याने लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे.

१३३ केंद्रांत सुरु आहे लसीकरण

जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात मिळून एकूण १३३ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. दि. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात ५ केंद्रांवर प्रारंभ झाला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी आणि लसीचा पुरवठा वाढल्याने १७ केंद्रांवर लस दिली जात होती. त्यानंतर जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य अशा एकूण १३३ ठिकाणी लसीकरणाला सुरूवात झाली आहे. दि. १९ जुलैपर्यंत लसीकरण सुरू होते. मात्र, आता लसीचा पुरवठा अल्प झाला आहे. त्यातच दि. २० ते २४ जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सध्या लसीकरण बंदच आहे.