शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सर्वदूर पोहोचलेल्या एस. टी.ला नुकसानीचा दणका

By admin | Updated: December 22, 2014 00:17 IST

परिवहन महामंडळ : सलग तीन वर्षे नफ्यात असलेली एसटी नुकसानीत

रत्नागिरी : खासगी वाहतुकीशी करावी लागणारी स्पर्धा, लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाढलेली वाहतूक शिवाय गेल्या वर्षातील डिझेल दरवाढ या सर्वांचा परिणाम म्हणून रत्नागिरी विभाग गेले दोन वर्षे तोटा सहन करीत कारभार हाकत आहे. २००९ पासून २०१२ पर्यंत सलग तीन वर्षे फायद्यात असलेला रत्नागिरी विभाग मात्र गेली दोन वर्षे कोट्यवधीचा तोटा सोसत आहे.रत्नागिरी जिल्हा भौगोलिक दृष्ट्या वाडी वस्त्यांवर, डोंगर दऱ्यातून वसलेला आहे. ग्रामीण भाग शहराशी एसटीद्वारे जोडण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एसटीला खासगी प्रवासी वाहतुकीशी दररोजची स्पर्धा करावी लागत आहे. एसटीची प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने तोट्यातील कारभार हाकावा लागत आहे.गेल्या वर्षभरामध्ये डीझेलचे दर भरमसाठ वाढले परंतु येत्या सहा महिन्यात ते कमी झाल्यामुळे एसटीला त्याचा लाभ झाला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी प्रवासी वाढवा मोहीम राबविण्यात येत आहे. वेळेवर गाड्या सोडणे, स्थानकातील स्वच्छता, कामगारांकरिता पास योजना, आवडेल तेथे प्रवास योजना, त्रैमासिक, मासिक पासांची उपलब्धता आदी विविध योजना राबवून प्रवाशांना आकर्षित करण्याचे काम महामंडळ करीत आहे. तरीदेखील एस. टी.ची सेवा गेल्या काही वर्षात खूपच कोलमडलेली आहे. एस. टी.ची देखभाल दुरुस्तीही होत नाही, त्याचप्रमाणे एस. टी.चे अपघातही वाढल्याने अनेक प्रवाशांनी एस. टी.कडे पाठ फिरवली आहे. सन २००९ - १०मध्ये चार कोटी ६७ लाख ६० हजार, २०१०मध्ये १ कोटी २० लाख ३१ हजार, २०११-१२मध्ये २ कोटी ६९ लाख २४ हजार रुपयांचा नफा मिळवलेल्या रत्नागिरी विभागास २०१२-१३ मध्ये १९ कोटी १ लाख ८३ हजार तर १३ - १४ मध्ये ४० कोटी ८८ लाख ४८ हजाराचा तोटा सोसावा लागला आहे.हा तोटा भरुन काढत असतानाच कर्मचाऱ्यांवरती दुहेरी ड्युटीचा वाढलेला ताण कमी करण्याकरिता नवीन वाहकांची नियुक्ती तसेच जुन्या नादुरुस्त गाड्या भंगारात काढल्या जात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सेवेचा दर्जाच घसरल्याने एस. टी.ची विश्वासार्हता कमी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)