शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सर्वदूर पोहोचलेल्या एस. टी.ला नुकसानीचा दणका

By admin | Updated: December 22, 2014 00:17 IST

परिवहन महामंडळ : सलग तीन वर्षे नफ्यात असलेली एसटी नुकसानीत

रत्नागिरी : खासगी वाहतुकीशी करावी लागणारी स्पर्धा, लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाढलेली वाहतूक शिवाय गेल्या वर्षातील डिझेल दरवाढ या सर्वांचा परिणाम म्हणून रत्नागिरी विभाग गेले दोन वर्षे तोटा सहन करीत कारभार हाकत आहे. २००९ पासून २०१२ पर्यंत सलग तीन वर्षे फायद्यात असलेला रत्नागिरी विभाग मात्र गेली दोन वर्षे कोट्यवधीचा तोटा सोसत आहे.रत्नागिरी जिल्हा भौगोलिक दृष्ट्या वाडी वस्त्यांवर, डोंगर दऱ्यातून वसलेला आहे. ग्रामीण भाग शहराशी एसटीद्वारे जोडण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एसटीला खासगी प्रवासी वाहतुकीशी दररोजची स्पर्धा करावी लागत आहे. एसटीची प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने तोट्यातील कारभार हाकावा लागत आहे.गेल्या वर्षभरामध्ये डीझेलचे दर भरमसाठ वाढले परंतु येत्या सहा महिन्यात ते कमी झाल्यामुळे एसटीला त्याचा लाभ झाला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी प्रवासी वाढवा मोहीम राबविण्यात येत आहे. वेळेवर गाड्या सोडणे, स्थानकातील स्वच्छता, कामगारांकरिता पास योजना, आवडेल तेथे प्रवास योजना, त्रैमासिक, मासिक पासांची उपलब्धता आदी विविध योजना राबवून प्रवाशांना आकर्षित करण्याचे काम महामंडळ करीत आहे. तरीदेखील एस. टी.ची सेवा गेल्या काही वर्षात खूपच कोलमडलेली आहे. एस. टी.ची देखभाल दुरुस्तीही होत नाही, त्याचप्रमाणे एस. टी.चे अपघातही वाढल्याने अनेक प्रवाशांनी एस. टी.कडे पाठ फिरवली आहे. सन २००९ - १०मध्ये चार कोटी ६७ लाख ६० हजार, २०१०मध्ये १ कोटी २० लाख ३१ हजार, २०११-१२मध्ये २ कोटी ६९ लाख २४ हजार रुपयांचा नफा मिळवलेल्या रत्नागिरी विभागास २०१२-१३ मध्ये १९ कोटी १ लाख ८३ हजार तर १३ - १४ मध्ये ४० कोटी ८८ लाख ४८ हजाराचा तोटा सोसावा लागला आहे.हा तोटा भरुन काढत असतानाच कर्मचाऱ्यांवरती दुहेरी ड्युटीचा वाढलेला ताण कमी करण्याकरिता नवीन वाहकांची नियुक्ती तसेच जुन्या नादुरुस्त गाड्या भंगारात काढल्या जात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सेवेचा दर्जाच घसरल्याने एस. टी.ची विश्वासार्हता कमी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)