शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी ३७ जण निघाले पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून तब्बल १ लाख ९१६ चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये ज्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे दिसणाऱ्यांची ...

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून तब्बल १ लाख ९१६ चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये ज्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे दिसणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ८८६० जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यामध्ये ३७ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. तर शनिवारी एकाची दिवशी २,५६१ चाचणीपैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५ सप्टेंबरपासून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल हाेरू लागले आहेत. यामध्ये रेल्वेतून ३१,०९०,एस. टी. बसमधून २४,८५८, खासगी आराम बसने २२,६६९, खासगी वाहनाने २२,२९९ असे एकूण १ लाख ९१६ चाकरमानी दाखल झाले आहेत. गतवर्षी सरसकट सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यावर्षी जिल्हा प्रशासनाने त्यात बदल करून ज्यांना कोरोना सदृश लक्षणे दिसून येतात त्यांचीच आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

त्यातील पहिला अहवाल शनिवारी जिल्हा आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. ५ सप्टेंबरपासून ८८६० जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण ३७ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. तर शनिवारी (११ सप्टेंबर) चाचणी केलेल्या २५६१ जणांच्या अहवाल प्राप्त झाला असून, त्यातील १२ जणांचा अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील आहेत. यातील ११ जणांना गृह विलगीकरणमध्ये तर एकाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अद्याप ९,४०५ जणांचे अहवाल प्रगतीपथावर आहेत, असे डॉ आठल्ये यांनी सांगितले.