शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अन्यथा धनगर समाज रस्त्यावर : वैभव काेकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

वाटूळ : राजापूर तालुक्यातील ताम्हाणे - धनगरवाडीच्या विकासाबाबत बाेलणारे रामचंद्र आखाडे हे मुंबईत राहतात. त्यांनी तालुक्यातील एकाही धनगरवाडीचे दर्शन ...

वाटूळ : राजापूर तालुक्यातील ताम्हाणे - धनगरवाडीच्या विकासाबाबत बाेलणारे रामचंद्र आखाडे हे मुंबईत राहतात. त्यांनी तालुक्यातील एकाही धनगरवाडीचे दर्शन घेतलेले नाही. गेली २५ वर्ष तालुक्यात रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था कार्यरत आहे. त्यांनी राजापूरकडे पाहण्यापेक्षा आपल्या खेड तालुक्याकडे आधी पहावे. धनगर वाड्याच्या विकासासाठी उंटावरून शेळ्या हाकू नयेत. अन्यथा धनगर समाज त्यांच्या विराेधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा धनगर समाज संस्था युवक जिल्हाध्यक्ष वैभव कोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

वैभव काेकरे यांनी म्हटले आहे की, राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे माध्यमातून अनेक धनगर वाड्या विकासाच्या प्रवाहात येत आहेत. यासाठी मागील दहा-बारा वर्षात कोट्यवधी रुपये रस्ता पाणी या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी खर्ची पडले आहेत. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे धनगरवाडीवर सर्वात पहिला पाण्याचा टँकर जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच धावत होता. चार वर्षांपूर्वी ही वाडी नळपाणी योजना पूर्ण होऊन टँकरमुक्त झाली आहे. अनेक धनगर वाड्यावर टँकर धावत होता, सद्य:स्थितीत तालुक्यातील सर्व धनगर वाड्या टँकरमुक्त आहेत याचे श्रेय आमदार राजन साळवी यांना जात असल्याचे काेकरे यांनी म्हटले आहे.

ताम्हाणे येथील धनगर वाडीकडे जाणारा रस्ता हा कच्या स्वरूपात असून, पावसाळा सोडल्यास या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहतूक होते. ताम्हाणे येथील धनगरवाडी व तेलीवाडी या जवळजवळ असून, आखाडे हे धनगर वाडीत राहत नसल्याचेही म्हटले आहे. त्यांनी खेड येथील देवाचा डोंगर येथे वस्ती असलेल्या धनगर वाडीचा विकास करावा, असा टाेला काेकरे यांनी लगावला आहे. अजूनही रत्नागिरी जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेडमधील अनेक धनगर वाड्यावर जातो याचा अभ्यास करावा, असेही सांगितले आहे. ते ज्या पक्षाचे सरचिटणीस आहेत त्यांच्याच माजी आमदाराने धनगर समाजासाठी उपयुक्त असलेली तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत निधी देण्यास विरोध केला होता, याचाही त्यांनी अभ्यास करावा, असा सल्ला काेकरे यांनी दिला आहे.