शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा धनगर समाज रस्त्यावर : वैभव काेकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

वाटूळ : राजापूर तालुक्यातील ताम्हाणे - धनगरवाडीच्या विकासाबाबत बाेलणारे रामचंद्र आखाडे हे मुंबईत राहतात. त्यांनी तालुक्यातील एकाही धनगरवाडीचे दर्शन ...

वाटूळ : राजापूर तालुक्यातील ताम्हाणे - धनगरवाडीच्या विकासाबाबत बाेलणारे रामचंद्र आखाडे हे मुंबईत राहतात. त्यांनी तालुक्यातील एकाही धनगरवाडीचे दर्शन घेतलेले नाही. गेली २५ वर्ष तालुक्यात रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था कार्यरत आहे. त्यांनी राजापूरकडे पाहण्यापेक्षा आपल्या खेड तालुक्याकडे आधी पहावे. धनगर वाड्याच्या विकासासाठी उंटावरून शेळ्या हाकू नयेत. अन्यथा धनगर समाज त्यांच्या विराेधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा धनगर समाज संस्था युवक जिल्हाध्यक्ष वैभव कोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

वैभव काेकरे यांनी म्हटले आहे की, राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे माध्यमातून अनेक धनगर वाड्या विकासाच्या प्रवाहात येत आहेत. यासाठी मागील दहा-बारा वर्षात कोट्यवधी रुपये रस्ता पाणी या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी खर्ची पडले आहेत. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे धनगरवाडीवर सर्वात पहिला पाण्याचा टँकर जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच धावत होता. चार वर्षांपूर्वी ही वाडी नळपाणी योजना पूर्ण होऊन टँकरमुक्त झाली आहे. अनेक धनगर वाड्यावर टँकर धावत होता, सद्य:स्थितीत तालुक्यातील सर्व धनगर वाड्या टँकरमुक्त आहेत याचे श्रेय आमदार राजन साळवी यांना जात असल्याचे काेकरे यांनी म्हटले आहे.

ताम्हाणे येथील धनगर वाडीकडे जाणारा रस्ता हा कच्या स्वरूपात असून, पावसाळा सोडल्यास या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहतूक होते. ताम्हाणे येथील धनगरवाडी व तेलीवाडी या जवळजवळ असून, आखाडे हे धनगर वाडीत राहत नसल्याचेही म्हटले आहे. त्यांनी खेड येथील देवाचा डोंगर येथे वस्ती असलेल्या धनगर वाडीचा विकास करावा, असा टाेला काेकरे यांनी लगावला आहे. अजूनही रत्नागिरी जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेडमधील अनेक धनगर वाड्यावर जातो याचा अभ्यास करावा, असेही सांगितले आहे. ते ज्या पक्षाचे सरचिटणीस आहेत त्यांच्याच माजी आमदाराने धनगर समाजासाठी उपयुक्त असलेली तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत निधी देण्यास विरोध केला होता, याचाही त्यांनी अभ्यास करावा, असा सल्ला काेकरे यांनी दिला आहे.