शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
4
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
5
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
6
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
7
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
8
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
9
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
10
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
11
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
12
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
13
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
14
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
15
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
16
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
17
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
18
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
19
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
20
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS

...अन्यथा १५ आॅगस्टला आंदोलन

By admin | Updated: July 19, 2016 00:27 IST

राष्ट्रीय समन्वय समिती : ईपीएस कर्मचाऱ्यांच्या समस्या

रत्नागिरी : ईपीएस १९९५ नुसार कर्मचाऱ्यांच्या समस्या न सुटल्यास दि. १५ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीने दिला आहे.संपूर्ण राष्ट्रामध्ये केंद्र व राज्य कर्मचारी सोडून कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (१९९५) भारत सरकारने सुरू केली. या योजनेंतर्गत महामंडळे, मंडळे, सहकार क्षेत्रातील उद्योग, लघुउद्योग, कॉन्ट्रॅक्टर ज्यामध्ये २०पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, राज्य मार्ग परिवहन महामंडळे, विद्युत मंडळ, वस्त्रोद्योग, मागासवर्गीय विकास महामंडळ, प्रिंट - इलेक्ट्रिक मीडिया, पत्रकारिता, पणन, सहकारी बँका, दुग्ध महासंघ, भू-विकास बँक, खासगी क्लब, हॉटेल्स, जिथे जिथे असंघटित कर्मचाऱ्यांची पीएफ कपात होते, असे सर्व कर्मचारी समाविष्ट आहेत. ईपीएस १९९५अंतर्गत पेन्शनधारकांची आजची संख्या ५२ लाखांपेक्षाही अधिक आहे. कर्मचाऱ्यांचे पीएफ फंडात साडेतीन लाख करोड रूपये जमा असतानाही आजही भारत सरकार पेन्शनधारकांना दोनशे ते दोन हजार रूपये पेन्शन देत आहे. गेल्या काही वर्षात निवृत्त कर्मचारी १९९५ राष्ट्रीय समन्वय समितीने कोशियारी समितीचा अहवाल लागू करून तीन हजार रूपये पेन्शन व महागाई भत्त्यासह एकूण सात हजार पाचशे रूपये पेन्शन मिळावी, म्हणून वेळोवेळी आंदोलन केले होते. प्रकाश जावडेकर यांनी ९० दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समितीने १५ आॅगस्ट रोजी लाल किल्यावरून कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात, यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ईपीएस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. २० जुलै रोजी दुपारी ३ वाजता सर्व ईपीएससी पेन्शनधारक एकत्र येऊन रत्नागिरीतील जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाबाबत निवेदन देणार आहेत.भारत सरकारने १९९५मध्ये निवृत्तिवेतन योजना सुरू केली.पीएफ फंडात कर्मचाऱ्यांचे साडेतीन लाख करोड रूपये जमा.आजही भारत सरकार पेन्शनधारकांना देते दोनशे ते दोन हजार रूपये पेन्शन.