शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय पध्दतीने बागायतीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पारंपरिक पध्दतीने शेती न करता, अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या ...

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पारंपरिक पध्दतीने शेती न करता, अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या लक्ष केंद्रित केले तर चांगले अर्थार्जन प्राप्त होऊ शकते, हे रत्नागिरी तालुक्यातील खरवते येथील प्रवीण जोशी यांनी आपल्या कृतीतून सिध्द केले आहे. तीस वर्षे ते शेतीतून उत्पन्न मिळवित आहेत. ७० एकर क्षेत्रावर त्यांनी आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड करून बागायती फुलविली आहे. नारळ, सुपारीमध्ये अंतर्गत काळीमिरी, जायफळ या मसालावर्गीय पिकांची लागवड केली आहे.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून ते गाई-म्हशींचा सांभाळ करीत आहेत. त्यातून दुधाचा व्यवसाय होत असून, शेणापासून खत व गोमूत्रापासून जीवामृत तयार करून शेतीसाठी वापर करीत आहेत. बागेतील पालापाचोळा तसेच गावातील अन्य शेतकऱ्यांकडील शेण व लेंडी विकत घेऊन त्यापासून सेंद्रीय खत तयार करून बागायतींसाठी वापरत आहेत.

गावातील पडिक जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर भात लागवड करून पडिक जमीन लागवडीखाली आणली आहे. ६०० आंबा झाडे असून, दरवर्षी दीड हजार पेटी आंबा होतो. मुंबई, पुणेसह खासगी विक्रीवर भर आहे. दोन हजार काजू लागवड असून दरवर्षी चार ते पाच टन काजू बी उत्पादन त्यांना प्राप्त होते. १७५ नारळ असून वर्षाला पाच हजार नारळ तर १७५ सुपारीपासून २५० ते ३०० किलो सुपारी त्यांना प्राप्त होत आहे. गावातील शेतकऱ्यांनाही चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी सर्व शेतकऱ्यांची दरवर्षी २० ते २२ टन काजू बी संकलित करून विक्री करीत आहेत.

- नारळ, सुपारीमध्ये अंतर्गत मसालावर्गीय पिकांची लागवड केली आहे.

- पाच हजार नारळ प्राप्त होत असून स्थानिक पातळीवर तसेच शहरात विक्री होत आहे.

- ओली सुपारी किरकोळ स्वरूपात विक्री होत असली तरी वर्षाला २५० ते ३०० किलाे सुपारी प्राप्त होत आहे.

काळीमिरीतून उत्पन्न

नारळ, सुपारीवर काळीमिरीचे वेल चढविण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना काळीमिरी विक्रीतून एक लाख रुपये प्राप्त झाले होते. मात्र गतवर्षी एका रोगामुळे ९० टक्के काळीमिरी रोपांचे नुकसान झाले. मात्र न डगमगता पुन्हा नव्याने काळीमिरी लागवड केली आहे. पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या जायफळांचे उत्पादन मात्र आता सुरू झाले आहे. नारळ बागेतून मसाला पिके घेता येत असल्यामुळेच या बागेला ‘लाखी’ बाग संबोधले गेले आहे. नवीन लागवड, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण ते उत्पादन बाजारात पाठवेपर्यंत विशेष मेहनत घेत असल्यामुळे त्यांच्याकडील उत्पादनाचा दर्जा उत्तम राखला गेला आहे.