शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सेंद्रीय पध्दतीने बागायतीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पारंपरिक पध्दतीने शेती न करता, अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या ...

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पारंपरिक पध्दतीने शेती न करता, अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या लक्ष केंद्रित केले तर चांगले अर्थार्जन प्राप्त होऊ शकते, हे रत्नागिरी तालुक्यातील खरवते येथील प्रवीण जोशी यांनी आपल्या कृतीतून सिध्द केले आहे. तीस वर्षे ते शेतीतून उत्पन्न मिळवित आहेत. ७० एकर क्षेत्रावर त्यांनी आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड करून बागायती फुलविली आहे. नारळ, सुपारीमध्ये अंतर्गत काळीमिरी, जायफळ या मसालावर्गीय पिकांची लागवड केली आहे.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून ते गाई-म्हशींचा सांभाळ करीत आहेत. त्यातून दुधाचा व्यवसाय होत असून, शेणापासून खत व गोमूत्रापासून जीवामृत तयार करून शेतीसाठी वापर करीत आहेत. बागेतील पालापाचोळा तसेच गावातील अन्य शेतकऱ्यांकडील शेण व लेंडी विकत घेऊन त्यापासून सेंद्रीय खत तयार करून बागायतींसाठी वापरत आहेत.

गावातील पडिक जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर भात लागवड करून पडिक जमीन लागवडीखाली आणली आहे. ६०० आंबा झाडे असून, दरवर्षी दीड हजार पेटी आंबा होतो. मुंबई, पुणेसह खासगी विक्रीवर भर आहे. दोन हजार काजू लागवड असून दरवर्षी चार ते पाच टन काजू बी उत्पादन त्यांना प्राप्त होते. १७५ नारळ असून वर्षाला पाच हजार नारळ तर १७५ सुपारीपासून २५० ते ३०० किलो सुपारी त्यांना प्राप्त होत आहे. गावातील शेतकऱ्यांनाही चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी सर्व शेतकऱ्यांची दरवर्षी २० ते २२ टन काजू बी संकलित करून विक्री करीत आहेत.

- नारळ, सुपारीमध्ये अंतर्गत मसालावर्गीय पिकांची लागवड केली आहे.

- पाच हजार नारळ प्राप्त होत असून स्थानिक पातळीवर तसेच शहरात विक्री होत आहे.

- ओली सुपारी किरकोळ स्वरूपात विक्री होत असली तरी वर्षाला २५० ते ३०० किलाे सुपारी प्राप्त होत आहे.

काळीमिरीतून उत्पन्न

नारळ, सुपारीवर काळीमिरीचे वेल चढविण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना काळीमिरी विक्रीतून एक लाख रुपये प्राप्त झाले होते. मात्र गतवर्षी एका रोगामुळे ९० टक्के काळीमिरी रोपांचे नुकसान झाले. मात्र न डगमगता पुन्हा नव्याने काळीमिरी लागवड केली आहे. पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या जायफळांचे उत्पादन मात्र आता सुरू झाले आहे. नारळ बागेतून मसाला पिके घेता येत असल्यामुळेच या बागेला ‘लाखी’ बाग संबोधले गेले आहे. नवीन लागवड, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण ते उत्पादन बाजारात पाठवेपर्यंत विशेष मेहनत घेत असल्यामुळे त्यांच्याकडील उत्पादनाचा दर्जा उत्तम राखला गेला आहे.