शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय पध्दतीने बागायतीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पारंपरिक पध्दतीने शेती न करता, अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या ...

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पारंपरिक पध्दतीने शेती न करता, अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या लक्ष केंद्रित केले तर चांगले अर्थार्जन प्राप्त होऊ शकते, हे रत्नागिरी तालुक्यातील खरवते येथील प्रवीण जोशी यांनी आपल्या कृतीतून सिध्द केले आहे. तीस वर्षे ते शेतीतून उत्पन्न मिळवित आहेत. ७० एकर क्षेत्रावर त्यांनी आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड करून बागायती फुलविली आहे. नारळ, सुपारीमध्ये अंतर्गत काळीमिरी, जायफळ या मसालावर्गीय पिकांची लागवड केली आहे.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून ते गाई-म्हशींचा सांभाळ करीत आहेत. त्यातून दुधाचा व्यवसाय होत असून, शेणापासून खत व गोमूत्रापासून जीवामृत तयार करून शेतीसाठी वापर करीत आहेत. बागेतील पालापाचोळा तसेच गावातील अन्य शेतकऱ्यांकडील शेण व लेंडी विकत घेऊन त्यापासून सेंद्रीय खत तयार करून बागायतींसाठी वापरत आहेत.

गावातील पडिक जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर भात लागवड करून पडिक जमीन लागवडीखाली आणली आहे. ६०० आंबा झाडे असून, दरवर्षी दीड हजार पेटी आंबा होतो. मुंबई, पुणेसह खासगी विक्रीवर भर आहे. दोन हजार काजू लागवड असून दरवर्षी चार ते पाच टन काजू बी उत्पादन त्यांना प्राप्त होते. १७५ नारळ असून वर्षाला पाच हजार नारळ तर १७५ सुपारीपासून २५० ते ३०० किलो सुपारी त्यांना प्राप्त होत आहे. गावातील शेतकऱ्यांनाही चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी सर्व शेतकऱ्यांची दरवर्षी २० ते २२ टन काजू बी संकलित करून विक्री करीत आहेत.

- नारळ, सुपारीमध्ये अंतर्गत मसालावर्गीय पिकांची लागवड केली आहे.

- पाच हजार नारळ प्राप्त होत असून स्थानिक पातळीवर तसेच शहरात विक्री होत आहे.

- ओली सुपारी किरकोळ स्वरूपात विक्री होत असली तरी वर्षाला २५० ते ३०० किलाे सुपारी प्राप्त होत आहे.

काळीमिरीतून उत्पन्न

नारळ, सुपारीवर काळीमिरीचे वेल चढविण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना काळीमिरी विक्रीतून एक लाख रुपये प्राप्त झाले होते. मात्र गतवर्षी एका रोगामुळे ९० टक्के काळीमिरी रोपांचे नुकसान झाले. मात्र न डगमगता पुन्हा नव्याने काळीमिरी लागवड केली आहे. पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या जायफळांचे उत्पादन मात्र आता सुरू झाले आहे. नारळ बागेतून मसाला पिके घेता येत असल्यामुळेच या बागेला ‘लाखी’ बाग संबोधले गेले आहे. नवीन लागवड, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण ते उत्पादन बाजारात पाठवेपर्यंत विशेष मेहनत घेत असल्यामुळे त्यांच्याकडील उत्पादनाचा दर्जा उत्तम राखला गेला आहे.