शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

अवघड क्षेत्र घोषित करण्याचे आदेश

By admin | Updated: June 2, 2017 23:13 IST

अवघड क्षेत्र घोषित करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिक्षकांच्या बदल्यांसाठी बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या तसेच या बदल्यांसाठी अवघड क्षेत्र घोषित करण्याचे आदेश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत़ या आदेशामुळे जिल्हा परिषदेला नव्याने बदली प्रक्रिया राबवावी लागणार आहे.शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुगम व दुर्गम अशा दोन भागांची यादी तयार केली आहे. प्रथम ही यादी शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आली. त्यानंतर अंतिम यादी जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी आणि चिपळूण या दोन्ही बांधकाम विभागांनी केली होती. या याद्या तयार केल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षकांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आले. जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या याद्यांमध्ये महामार्गावरील व काही रस्त्यांच्या जवळ असलेल्या भागातील शाळा दुर्गम ठिकाणी, तर दुर्गम भागातील काही शाळा सुगम भागात दाखवण्यात आल्या होत्या. याद्यांमध्ये चुका झाल्याचे शिक्षण सभापती दीपक नागले यांच्या लक्षात आल्यानंतर ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मिश्रा यांनी नवीन याद्या तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाकडून आता नवीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत.