शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

गणेशोत्सवासाठी यंत्रणांना सज्जतेचे आदेश

By admin | Updated: September 8, 2015 22:22 IST

रवींद्र वायकर : गणेशभक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना

रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव काळात सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय साधून अपघातविरहीत वाहतुकीबरोबरच गणेशभक्तांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. पूर्वतयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.मुंबई- गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी जागरूक राहावे. तसेच गणेशभक्तांचा ओघ सुरू होण्यापूर्वी महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम संबधित विभागांनी पूर्ण करावे. गणेशभक्तांना महामार्गावरील १९ मदत केंद्राच्या माध्यमातून वाहनधारकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात याव्यात आणि आवश्यक मदतदेखील उपलब्ध करुन द्यावी. मदत केंद्राच्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णवाहिकेत औषधे आणि डॉक्टर्सची उपलब्धता ठेवावीत. अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात महामार्गावरील १९ ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. यात महसूल, पोलीस, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी नियुक्त असणार आहेत. याच्या माध्यमातून गणेशभक्तांना आवश्यक मदत देतांनाच सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येतील. महामार्गावर आवश्यक ठिकाणी साईडपट्ट्या, संरक्षक कठडे आणि रिफ्लेक्टर लावण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हाभरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे बंदोबस्तासाठी अतिरीक्त पोलीस, होमगार्डससह आणि एसआरपीएफची एक कंपनी मागविण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हाभरात उत्सव काळात चोख बंदोबस्त राखण्यात येणार आहे, अशा माहिती दिली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकावरदेखील बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)