शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

बाजारपेठांना उड्डाणपूलाचा पर्याय

By admin | Updated: August 24, 2014 00:37 IST

टोलमुक्त महामार्गाची मागणी मान्य : विनायक राऊत

रत्नागिरी : महामार्ग चौपदीकरणाच्या कामामुळे बाजारपेठा उध्वस्त होऊ नयेत, यासाठी सहा बाजारपेठांच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत़ महामार्गाचे काँक्रिटीकरण आणि टोलमुक्त या दोन्ही मागण्या केंद्र शासनाने मान्य केल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़यावेळी माजी आमदार बाळ माने, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, भाजपा जिल्हाप्रमुख सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर उपस्थित होत्या. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते महामार्गाचे निवळी येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाच्या कामाचा आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ रविवारी होणार आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, चौपदरीकरणाच्या प्रकल्पामध्ये लोकांचा सहभाग आणि कमीत कमी विस्थापन, अशी भूमिका समोर ठेवूनच हे काम सुरु करण्यात येत आहे.ते पुढे म्हणाले की, महामार्गाचे चौपदरीकरणासाठी मागील वर्षी झालेल्या सर्वेक्षणाप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नव्हते़ चौपदरीकरणामध्ये रोहा, चिपळूण, लांजा, पाली, कणकवली, संगमेश्वर या बाजारपेठा उध्वस्त होऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करतानाच राऊत यांनी पाली, लांजा कणकवली या बाजारपेठांच्या ठिकाणी उड्डाणपूलासाठी तरतूद करा, अशी मागणी केली होती़ ती मान्य झाली असून आणखी चिपळूण, राजापूर, तळेरे या बाजारपेठेतही उड्डाणपूलाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़ते पुढे म्हणाले की, खेड, कणकवली, कुडाळ येथे महामार्गाच्या चौपदरीकणासाठी भूसंपादनाचे काम सुरु केले आहे़ त्यामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांचे योगदान घेण्यात येत असून त्यासाठी वेगळे मानधनाची तरतूद करण्यात आली आहे़इंदापूर ते झाराप रस्त्याच्या चौपदरीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम संथगतीने सुरु आहे़ कारण येथील भूसंपादनाची कार्यवाही व्यवस्थित झालेली नसल्याची खंतही व्यक्त करतानाच त्याप्रमाणे चुका होऊ नये, यासाठी यावेळी दक्षता घेण्यात आली असल्याचेही खा़ राऊत यांनी स्पष्ट केले़ चौपदरीकरणाचे काम पाच टप्प्यांमध्ये करण्यात येणार होते़ मात्र, आता ते आठ टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून हे काम २०१७ सालापर्यंत पूर्ण होणार असल्याचे राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले़ (शहर वार्ताहर)