शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बाजारपेठांना उड्डाणपूलाचा पर्याय

By admin | Updated: August 24, 2014 00:37 IST

टोलमुक्त महामार्गाची मागणी मान्य : विनायक राऊत

रत्नागिरी : महामार्ग चौपदीकरणाच्या कामामुळे बाजारपेठा उध्वस्त होऊ नयेत, यासाठी सहा बाजारपेठांच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत़ महामार्गाचे काँक्रिटीकरण आणि टोलमुक्त या दोन्ही मागण्या केंद्र शासनाने मान्य केल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़यावेळी माजी आमदार बाळ माने, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, भाजपा जिल्हाप्रमुख सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर उपस्थित होत्या. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते महामार्गाचे निवळी येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाच्या कामाचा आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ रविवारी होणार आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, चौपदरीकरणाच्या प्रकल्पामध्ये लोकांचा सहभाग आणि कमीत कमी विस्थापन, अशी भूमिका समोर ठेवूनच हे काम सुरु करण्यात येत आहे.ते पुढे म्हणाले की, महामार्गाचे चौपदरीकरणासाठी मागील वर्षी झालेल्या सर्वेक्षणाप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नव्हते़ चौपदरीकरणामध्ये रोहा, चिपळूण, लांजा, पाली, कणकवली, संगमेश्वर या बाजारपेठा उध्वस्त होऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करतानाच राऊत यांनी पाली, लांजा कणकवली या बाजारपेठांच्या ठिकाणी उड्डाणपूलासाठी तरतूद करा, अशी मागणी केली होती़ ती मान्य झाली असून आणखी चिपळूण, राजापूर, तळेरे या बाजारपेठेतही उड्डाणपूलाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़ते पुढे म्हणाले की, खेड, कणकवली, कुडाळ येथे महामार्गाच्या चौपदरीकणासाठी भूसंपादनाचे काम सुरु केले आहे़ त्यामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांचे योगदान घेण्यात येत असून त्यासाठी वेगळे मानधनाची तरतूद करण्यात आली आहे़इंदापूर ते झाराप रस्त्याच्या चौपदरीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम संथगतीने सुरु आहे़ कारण येथील भूसंपादनाची कार्यवाही व्यवस्थित झालेली नसल्याची खंतही व्यक्त करतानाच त्याप्रमाणे चुका होऊ नये, यासाठी यावेळी दक्षता घेण्यात आली असल्याचेही खा़ राऊत यांनी स्पष्ट केले़ चौपदरीकरणाचे काम पाच टप्प्यांमध्ये करण्यात येणार होते़ मात्र, आता ते आठ टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून हे काम २०१७ सालापर्यंत पूर्ण होणार असल्याचे राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले़ (शहर वार्ताहर)