शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बागायतदारांना विम्याचा पर्याय

By admin | Updated: November 17, 2014 23:51 IST

आंबा-काजूला धोका : गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना पावणेतीन कोटींची भरपाई

रत्नागिरी : अवेळी पाऊस, उच्चत्तम तापमान व नीचांकी तापमान यामुळे आंबा व काजूच्या पिकावर परिणाम झाल्याने होणारे नुकसान लक्षात घेता शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गतवर्षीच्या १०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख ५५ हजार ९३२ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.शासनातर्फे कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०११-१२ पासून फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली. अवेळचा पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान या निकषावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हाळा यामुळे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.शासनातर्फे यावर्षीदेखील फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबा व काजू या फळपिकांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आंबा पिकासाठी ६ हजार रुपये विमा हप्त्याची रक्कम आहे. संबंधित रक्कम नजीकच्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकेच्या शाखेत भरायची आहे. या योजनेसाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स कंपनी कार्यरत असून, आंबा पिकासाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. ही योजना १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०१५ या कालावधीसाठी अवेळी पाऊस, कमी तापमान जास्त तापमान या बाबींसाठी वेगवेगळ्या कालावधीसाठी विविध निकषावर आधारित आहे. आंबा पिकासाठी १ लाख रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम असून, एकूण हप्त्याची रक्कम १२ हजार रुपये आहे. त्यापैकी ५० टक्के रकमेचा वाटा शासनाचा असून, उर्वरित ५० टक्के म्हणजे ६ हजार रुपये शेतकऱ्याने भरायचे आहेत. बागायतदारांना विम्याची रक्कम नजीकच्या बँकेमध्ये भरणा करावी लागणार आहे. राज्यातील निवडक फळांना पीक विमा योजना जाहीर करताना कोकणातील आंबा, काजू पिकाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हामुळे उत्पन्नाचे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. यंदा हवामानातील बदलामुळे आंबा, काजूवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विमा योजनेचा बागायतदारांनी आधार घ्यावा, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. (प्रतिनिधी)विमा काढणाऱ्यांच्या संख्येत घटसनबाधित क्षेत्रलाभार्थी भरपाई२०११-१२१८६६.४७१३६२३४ लाख ४१ हजार ५०० रूपये२०१२-१३११२०१२८६२ कोटी ३२ लाख ७९ हजार ५०० रूपये२०१३-१४१४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता.४बदलत्या हवामानामुळे यंदाही नुकसान होण्याची शक्यता.४दरवर्षी विमा काढणाऱ्यांची संख्या कमी-कमी होतेय.४गतवर्षी ८0 टक्के विमाधारकांना मिळाली नुकसानभरपाई.४शासनाकडून भरली जाते विमा हप्त्याची ५0 टक्के रक्कम.