शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांना विम्याचा पर्याय

By admin | Updated: November 17, 2014 23:51 IST

आंबा-काजूला धोका : गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना पावणेतीन कोटींची भरपाई

रत्नागिरी : अवेळी पाऊस, उच्चत्तम तापमान व नीचांकी तापमान यामुळे आंबा व काजूच्या पिकावर परिणाम झाल्याने होणारे नुकसान लक्षात घेता शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गतवर्षीच्या १०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख ५५ हजार ९३२ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.शासनातर्फे कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०११-१२ पासून फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली. अवेळचा पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान या निकषावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हाळा यामुळे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.शासनातर्फे यावर्षीदेखील फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबा व काजू या फळपिकांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आंबा पिकासाठी ६ हजार रुपये विमा हप्त्याची रक्कम आहे. संबंधित रक्कम नजीकच्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकेच्या शाखेत भरायची आहे. या योजनेसाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स कंपनी कार्यरत असून, आंबा पिकासाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. ही योजना १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०१५ या कालावधीसाठी अवेळी पाऊस, कमी तापमान जास्त तापमान या बाबींसाठी वेगवेगळ्या कालावधीसाठी विविध निकषावर आधारित आहे. आंबा पिकासाठी १ लाख रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम असून, एकूण हप्त्याची रक्कम १२ हजार रुपये आहे. त्यापैकी ५० टक्के रकमेचा वाटा शासनाचा असून, उर्वरित ५० टक्के म्हणजे ६ हजार रुपये शेतकऱ्याने भरायचे आहेत. बागायतदारांना विम्याची रक्कम नजीकच्या बँकेमध्ये भरणा करावी लागणार आहे. राज्यातील निवडक फळांना पीक विमा योजना जाहीर करताना कोकणातील आंबा, काजू पिकाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हामुळे उत्पन्नाचे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. यंदा हवामानातील बदलामुळे आंबा, काजूवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विमा योजनेचा बागायतदारांनी आधार घ्यावा, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. (प्रतिनिधी)विमा काढणाऱ्यांच्या संख्येत घटसनबाधित क्षेत्रलाभार्थी भरपाई२०११-१२१८६६.४७१३६२३४ लाख ४१ हजार ५०० रूपये२०१२-१३११२०१२८६२ कोटी ३२ लाख ७९ हजार ५०० रूपये२०१३-१४१४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता.४बदलत्या हवामानामुळे यंदाही नुकसान होण्याची शक्यता.४दरवर्षी विमा काढणाऱ्यांची संख्या कमी-कमी होतेय.४गतवर्षी ८0 टक्के विमाधारकांना मिळाली नुकसानभरपाई.४शासनाकडून भरली जाते विमा हप्त्याची ५0 टक्के रक्कम.