शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांना विम्याचा पर्याय

By admin | Updated: November 17, 2014 23:51 IST

आंबा-काजूला धोका : गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना पावणेतीन कोटींची भरपाई

रत्नागिरी : अवेळी पाऊस, उच्चत्तम तापमान व नीचांकी तापमान यामुळे आंबा व काजूच्या पिकावर परिणाम झाल्याने होणारे नुकसान लक्षात घेता शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गतवर्षीच्या १०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख ५५ हजार ९३२ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.शासनातर्फे कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०११-१२ पासून फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली. अवेळचा पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान या निकषावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हाळा यामुळे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.शासनातर्फे यावर्षीदेखील फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबा व काजू या फळपिकांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आंबा पिकासाठी ६ हजार रुपये विमा हप्त्याची रक्कम आहे. संबंधित रक्कम नजीकच्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकेच्या शाखेत भरायची आहे. या योजनेसाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स कंपनी कार्यरत असून, आंबा पिकासाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. ही योजना १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०१५ या कालावधीसाठी अवेळी पाऊस, कमी तापमान जास्त तापमान या बाबींसाठी वेगवेगळ्या कालावधीसाठी विविध निकषावर आधारित आहे. आंबा पिकासाठी १ लाख रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम असून, एकूण हप्त्याची रक्कम १२ हजार रुपये आहे. त्यापैकी ५० टक्के रकमेचा वाटा शासनाचा असून, उर्वरित ५० टक्के म्हणजे ६ हजार रुपये शेतकऱ्याने भरायचे आहेत. बागायतदारांना विम्याची रक्कम नजीकच्या बँकेमध्ये भरणा करावी लागणार आहे. राज्यातील निवडक फळांना पीक विमा योजना जाहीर करताना कोकणातील आंबा, काजू पिकाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हामुळे उत्पन्नाचे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. यंदा हवामानातील बदलामुळे आंबा, काजूवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विमा योजनेचा बागायतदारांनी आधार घ्यावा, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. (प्रतिनिधी)विमा काढणाऱ्यांच्या संख्येत घटसनबाधित क्षेत्रलाभार्थी भरपाई२०११-१२१८६६.४७१३६२३४ लाख ४१ हजार ५०० रूपये२०१२-१३११२०१२८६२ कोटी ३२ लाख ७९ हजार ५०० रूपये२०१३-१४१४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता.४बदलत्या हवामानामुळे यंदाही नुकसान होण्याची शक्यता.४दरवर्षी विमा काढणाऱ्यांची संख्या कमी-कमी होतेय.४गतवर्षी ८0 टक्के विमाधारकांना मिळाली नुकसानभरपाई.४शासनाकडून भरली जाते विमा हप्त्याची ५0 टक्के रक्कम.