शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विस्थापनामुळे नाणार भागात रिफायनरी करण्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

राजापूर : काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेसोबतची बांधीलकी जपून आहे. राजापूर तालुक्यातील नाणार भागात होणारे संभाव्य विस्थापन आणि धार्मिक अधिष्ठानांना ...

राजापूर : काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेसोबतची बांधीलकी जपून आहे. राजापूर तालुक्यातील नाणार भागात होणारे संभाव्य विस्थापन आणि धार्मिक अधिष्ठानांना येऊ शकणारी संभाव्य बाधा याचा विचार करून काँग्रेसने स्थानिक जनतेची मागणी लक्षात घेता नाणार भागात प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, आता शून्य विस्थापन असलेल्या बारसू-सोलगावच्या जागेत रिफायनरी प्रकल्प उभा राहत असल्याने त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असे काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केले आहे.

यापूर्वी मतांच्या आकडेवारीला नगण्य स्थान देत काँग्रेसने अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले होते. आज अणुऊर्जा प्रकल्पातील ९८ टक्के भूमिपुत्रांनी आर्थिक मोबदला स्वीकारला आहे. मात्र, प्रकल्पांना विरोध करून, मतांची बेगमी करून सत्ता पटकावणारे आजही तालुक्याचा कोणताच विकास करू शकलेले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. बारसू-सोलगांवमध्ये सध्या रत्नागिरी रिफायनरी कंपनी जागेचा शोध घेत आहे. या भागात आपल्या माहितीप्रमाणे प्रकल्पाला आवश्यक असलेली तब्बल साडेअकरा हजार एकर जमीन ही कातळपड असलेली आहे. या भागात कोणत्याही घरांचे, बागायतींचे विस्थापन होत नाही. नाणार भागात सर्वच राजकीय पक्षांनी विस्थापनामुळे प्रकल्पाला विरोध केला होता. बारसू-सोलगावसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले समर्थन दर्शवले आहे. तालुक्यातील तब्बल ५० विविध संघटनांनी प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांत नकारात्मक भावना निर्माण करण्यात आलेल्या राजापूर तालुक्याचे हे सुबत्तेकडे जाणारे आशादायक पाऊल असल्याचे खलिफे यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस नेते अविनाश लाड यांनी बारसू-सोलगावमध्ये प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. कोणत्याही प्रकल्पाबाबत पसरवण्यात येणारे गैरसमज, त्यासाठी घेण्यात येणारा जातीपातीचा आधार हे आता परवडणार नाही, याची खात्री विशेषतः तरुण आणि सुज्ञ तालुकावासीयांना झाल्याने येत्या काळात प्रकल्प होण्यासाठी काँग्रेस जनतेसोबत कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्याचा विकास ही भूमिका घेऊन आपण ग्रामीण भागाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.