शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापनामुळे नाणार भागात रिफायनरी करण्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

राजापूर : काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेसोबतची बांधीलकी जपून आहे. राजापूर तालुक्यातील नाणार भागात होणारे संभाव्य विस्थापन आणि धार्मिक अधिष्ठानांना ...

राजापूर : काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेसोबतची बांधीलकी जपून आहे. राजापूर तालुक्यातील नाणार भागात होणारे संभाव्य विस्थापन आणि धार्मिक अधिष्ठानांना येऊ शकणारी संभाव्य बाधा याचा विचार करून काँग्रेसने स्थानिक जनतेची मागणी लक्षात घेता नाणार भागात प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, आता शून्य विस्थापन असलेल्या बारसू-सोलगावच्या जागेत रिफायनरी प्रकल्प उभा राहत असल्याने त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असे काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केले आहे.

यापूर्वी मतांच्या आकडेवारीला नगण्य स्थान देत काँग्रेसने अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले होते. आज अणुऊर्जा प्रकल्पातील ९८ टक्के भूमिपुत्रांनी आर्थिक मोबदला स्वीकारला आहे. मात्र, प्रकल्पांना विरोध करून, मतांची बेगमी करून सत्ता पटकावणारे आजही तालुक्याचा कोणताच विकास करू शकलेले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. बारसू-सोलगांवमध्ये सध्या रत्नागिरी रिफायनरी कंपनी जागेचा शोध घेत आहे. या भागात आपल्या माहितीप्रमाणे प्रकल्पाला आवश्यक असलेली तब्बल साडेअकरा हजार एकर जमीन ही कातळपड असलेली आहे. या भागात कोणत्याही घरांचे, बागायतींचे विस्थापन होत नाही. नाणार भागात सर्वच राजकीय पक्षांनी विस्थापनामुळे प्रकल्पाला विरोध केला होता. बारसू-सोलगावसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले समर्थन दर्शवले आहे. तालुक्यातील तब्बल ५० विविध संघटनांनी प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांत नकारात्मक भावना निर्माण करण्यात आलेल्या राजापूर तालुक्याचे हे सुबत्तेकडे जाणारे आशादायक पाऊल असल्याचे खलिफे यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस नेते अविनाश लाड यांनी बारसू-सोलगावमध्ये प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. कोणत्याही प्रकल्पाबाबत पसरवण्यात येणारे गैरसमज, त्यासाठी घेण्यात येणारा जातीपातीचा आधार हे आता परवडणार नाही, याची खात्री विशेषतः तरुण आणि सुज्ञ तालुकावासीयांना झाल्याने येत्या काळात प्रकल्प होण्यासाठी काँग्रेस जनतेसोबत कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्याचा विकास ही भूमिका घेऊन आपण ग्रामीण भागाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.