शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

‘निवळी-जयगड’ला विरोध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2015 00:28 IST

हा निर्णय आम्हाला मान्य नसून, १५ मीटरचा रस्ता न केल्यास कामाला विरोध करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी - जयगड या ४२ किलोमीटरच्या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत एकूण १० मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय आम्हाला मान्य नसून, १५ मीटरचा रस्ता न केल्यास कामाला विरोध करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.वाटद, मिरवणे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावर वाटद - खंडाळा या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ आहे. या ठिकाणी १५ ते २० गावातील लोक खरेदीसाठी येतात. आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज असल्याने हजारो विद्यार्थी ये-जा करतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने, बँका, पतपेढ्या, पोस्ट आॅफीस, एस. टी. स्टॅण्ड, हॉटेल्स, रिक्षातळ व रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली बाजारपेठ असल्याने रुग्ण, वयोवृद्ध, महिला, पुरुष, मुले यांची सततची वर्दळ असते. तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या लोकांची येथे नियमीत गर्दी दिसून येते. खासगी वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या महत्वाच्या गोष्टींकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. रस्त्याचे दुपदरीकरण करताना प्रत्यक्ष रस्ता १० मीटर व उर्वरीत ५ मीटरमध्ये गटार व पादचारी मार्ग करावा. बाजारपेठ परिसरात बंदिस्त गटार व उत्तम प्रतीचा फुटपाथ बांधणे, जमीन ताब्यात घेताना जमीनमालकांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या पाल्यांना कंपनीत नोकरी मिळावी, दुपदरीकरण करताना येथील जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. खंडाळा तिठा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याने शासनातर्फे वाहतूक नियंत्रणाची कोणती उपाययोजना करण्यात येणार आहे, याबाबतची ग्रामस्थांना मिळावी. अन्यथा येथे सिग्नल व्यवस्था करावी. खंडाळा बाजारपेठ परिसर सपाट असल्याने गटाराच्या पाण्याची विल्हेवाट कशी करण्यात येणार आहे याची माहिती मिळावी. कंपनीने परिसराच्या विकासाकरिता सुसज्ज हॉस्पीटल, इंजिनिअरिंग कॉलेज या सुविधा पुरवाव्यात. तसेच बाजारपेठ परिसरात पार्किं गची सोय करावी, वाटद गावाला दत्तक घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी राकेश केदारी, दिलीप सुर्वे, शेखर भडसावळे, दीपक सुर्वे, राजेंद्र भडसावळे, अनिल धारकर, अशोक जोशी, विनोद जोग, राजेंद्र सागवेकर, राम साठे, प्रमोद चव्हाण, उल्हास मुळे, हेमंत सुर्वे, दीपक महाडिक, व्यापारी, जमीनमालकांनी उपस्थित होते. (प्रतिनिधी)