शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

‘निवळी-जयगड’ला विरोध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2015 00:28 IST

हा निर्णय आम्हाला मान्य नसून, १५ मीटरचा रस्ता न केल्यास कामाला विरोध करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी - जयगड या ४२ किलोमीटरच्या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत एकूण १० मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय आम्हाला मान्य नसून, १५ मीटरचा रस्ता न केल्यास कामाला विरोध करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.वाटद, मिरवणे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावर वाटद - खंडाळा या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ आहे. या ठिकाणी १५ ते २० गावातील लोक खरेदीसाठी येतात. आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज असल्याने हजारो विद्यार्थी ये-जा करतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने, बँका, पतपेढ्या, पोस्ट आॅफीस, एस. टी. स्टॅण्ड, हॉटेल्स, रिक्षातळ व रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली बाजारपेठ असल्याने रुग्ण, वयोवृद्ध, महिला, पुरुष, मुले यांची सततची वर्दळ असते. तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या लोकांची येथे नियमीत गर्दी दिसून येते. खासगी वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या महत्वाच्या गोष्टींकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. रस्त्याचे दुपदरीकरण करताना प्रत्यक्ष रस्ता १० मीटर व उर्वरीत ५ मीटरमध्ये गटार व पादचारी मार्ग करावा. बाजारपेठ परिसरात बंदिस्त गटार व उत्तम प्रतीचा फुटपाथ बांधणे, जमीन ताब्यात घेताना जमीनमालकांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या पाल्यांना कंपनीत नोकरी मिळावी, दुपदरीकरण करताना येथील जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. खंडाळा तिठा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याने शासनातर्फे वाहतूक नियंत्रणाची कोणती उपाययोजना करण्यात येणार आहे, याबाबतची ग्रामस्थांना मिळावी. अन्यथा येथे सिग्नल व्यवस्था करावी. खंडाळा बाजारपेठ परिसर सपाट असल्याने गटाराच्या पाण्याची विल्हेवाट कशी करण्यात येणार आहे याची माहिती मिळावी. कंपनीने परिसराच्या विकासाकरिता सुसज्ज हॉस्पीटल, इंजिनिअरिंग कॉलेज या सुविधा पुरवाव्यात. तसेच बाजारपेठ परिसरात पार्किं गची सोय करावी, वाटद गावाला दत्तक घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी राकेश केदारी, दिलीप सुर्वे, शेखर भडसावळे, दीपक सुर्वे, राजेंद्र भडसावळे, अनिल धारकर, अशोक जोशी, विनोद जोग, राजेंद्र सागवेकर, राम साठे, प्रमोद चव्हाण, उल्हास मुळे, हेमंत सुर्वे, दीपक महाडिक, व्यापारी, जमीनमालकांनी उपस्थित होते. (प्रतिनिधी)