शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आंबा-काजू नुकसान भरपाई घेण्याची पुन्हा संधी

By admin | Updated: July 13, 2017 16:44 IST

दि. १५ जूलैपूर्वी अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतलांजा (जि. रत्नागिरी), दि. १३ : शासनाच्यावतीने सन २०१५-१६ मध्ये देण्यात आलेल्या आंबा-काजू नुकसान अनुदानापासून केवळ बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे लांजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले होते. त्यामुुळे गेले वर्षभर हे अनुदान शासनाकडेच जमा होेते. शिल्लक असलेल्या या अनुदानाचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असून, दि. १५ जूलैपूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या अचूक बँक खाते क्रमांकाच्या प्रती तलाठी कार्यालयामध्ये जमा करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे़ २०१५-१६ साली अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा-काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी शासनाकडून नुकसानभरपाई म्हणून लांजा तालुक्याला १३ कोटी ६६ लाख ११ हजार ७५० रुपये एवढा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार लांजा महसूल विभागाने तालुक्यातील आंबा-काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करुन त्या-त्या रकमेचे धनादेश बँकांना अदा करताना लाभार्थी शेतकऱ्यांना रकमेचे वाटप केले होते. मात्र, यावेळी अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे खाते क्रमांक दिल्याने बँकांनी तहसील कार्यालयाकडे सुधारीत यादी मागितली होती. त्यामुळे चुकीचे खाते क्रमांक असणाऱ्या लाभार्थ्यांना आंबा-काजू नुकसानभरपाईपासून वंचित रहावे लागले होते़

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे फळपीक नुकसान अदा करण्यासाठी अनुदान प्राप्त झाले असून, या अनुुदानामध्ये मार्च २०१६अखेर समर्पित अनुदान व पुरवणी यादीमधील देय अनुदान रकमेचाही समावेश आहे. लांजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे खाते क्रमांक दिल्याने तसेच नावातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात अनुदान शिल्लक राहिले असून, हे अनुदान अजूनही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झालेले नाही. खाते क्रमांक व नावात त्रुटी असल्याने अनुदान रक्कम खात्यावर न जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लांजा तहसील व तलाठी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या लाभार्थ्यांना आता अंतिम संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून, दिलेल्या कालावधीत आपला योग्य खाते क्रमांक न दिल्यास सदरची रक्कम शासनाकडे जमा करण्यात येणार असल्याचे लांजा तहसीलदार मारुती कांबळे यांनी सांगितले.