शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आंबा-काजू नुकसान भरपाई घेण्याची पुन्हा संधी

By admin | Updated: July 13, 2017 16:44 IST

दि. १५ जूलैपूर्वी अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतलांजा (जि. रत्नागिरी), दि. १३ : शासनाच्यावतीने सन २०१५-१६ मध्ये देण्यात आलेल्या आंबा-काजू नुकसान अनुदानापासून केवळ बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे लांजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले होते. त्यामुुळे गेले वर्षभर हे अनुदान शासनाकडेच जमा होेते. शिल्लक असलेल्या या अनुदानाचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असून, दि. १५ जूलैपूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या अचूक बँक खाते क्रमांकाच्या प्रती तलाठी कार्यालयामध्ये जमा करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे़ २०१५-१६ साली अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा-काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी शासनाकडून नुकसानभरपाई म्हणून लांजा तालुक्याला १३ कोटी ६६ लाख ११ हजार ७५० रुपये एवढा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार लांजा महसूल विभागाने तालुक्यातील आंबा-काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करुन त्या-त्या रकमेचे धनादेश बँकांना अदा करताना लाभार्थी शेतकऱ्यांना रकमेचे वाटप केले होते. मात्र, यावेळी अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे खाते क्रमांक दिल्याने बँकांनी तहसील कार्यालयाकडे सुधारीत यादी मागितली होती. त्यामुळे चुकीचे खाते क्रमांक असणाऱ्या लाभार्थ्यांना आंबा-काजू नुकसानभरपाईपासून वंचित रहावे लागले होते़

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे फळपीक नुकसान अदा करण्यासाठी अनुदान प्राप्त झाले असून, या अनुुदानामध्ये मार्च २०१६अखेर समर्पित अनुदान व पुरवणी यादीमधील देय अनुदान रकमेचाही समावेश आहे. लांजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे खाते क्रमांक दिल्याने तसेच नावातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात अनुदान शिल्लक राहिले असून, हे अनुदान अजूनही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झालेले नाही. खाते क्रमांक व नावात त्रुटी असल्याने अनुदान रक्कम खात्यावर न जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लांजा तहसील व तलाठी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या लाभार्थ्यांना आता अंतिम संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून, दिलेल्या कालावधीत आपला योग्य खाते क्रमांक न दिल्यास सदरची रक्कम शासनाकडे जमा करण्यात येणार असल्याचे लांजा तहसीलदार मारुती कांबळे यांनी सांगितले.