शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

तंटामुक्त समित्यांमध्ये संधी द्यावी

By admin | Updated: October 23, 2014 00:05 IST

महिलांचे अल्प प्रमाण : सक्षम कारभार करण्याची सततची तयारी

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -गावातील तंटे सोडवण्यासाठी जिल्ह्यात तंटामुक्त समित्यांची घोडदौड सुरू असताना समित्यांवर पुरूषांचीच मक्तेदारी अधिक आहे. जिल्ह्याचा विचार करता समित्यांवरील महिला अध्यक्षांचे प्रमाण अल्प आहे. या समित्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्यास तंटामुक्त समित्यांमध्ये सातत्य राखण्यास मदत होईल. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिला विराजमान असून, सक्षमपणे कार्यभार सांभाळत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था, विविध प्रशासकीय नोकऱ्या, व्यवसायामध्ये महिलावर्ग आपापली जबाबदारी सांभाळत आहेत. सर्व क्षेत्रांत पुरूषांच्या बरोबरीने काम करीत असतानासुध्दा तंटामुक्त समित्यांवर नियुक्ती करताना महिलांचा विचार केला जात नाही. महिलांचे प्रश्न महिलाच योग्यरित्या हाताळू शकतात. बहुधा घरातील शारीरिक, मानिसक छळास बळी पडलेल्या महिला आपल्या व्यथा तंटामुक्त समित्यांकडे मांडण्यास टाळाटाळ करतात. मात्र, या समितीचे नेतृत्व स्त्री कडे असेल तर आपले प्रश्न योग्यरित्या त्या मांडू शकतात.सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. गृहिणीपदाची भूमिका योग्यरित्या सांभाळूनदेखील आज विविध क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे. कुटुंबाबरोबर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सहभाग निश्चित महत्त्वाचा राहिला आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्यांवर सध्या त्यांचे वर्चस्व अल्प असले तरी समित्यावर असलेल्या महिलांनी आपली जबाबदारी योग्यरित्या सांभाळलेली दिसून येत आहे. वाडापेठ - आडिवरे (ता. राजापूर) तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष स्नेहल रुमडे यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक तंटे सोडविले आहेत. राजापूर तालुक्यातील तंटामुक्त समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.गावातील कौटुंबीक तंटे सोडवण्याबरोबर दिवाणी, महसुली, फौजदारी, कामगारांचे तंटे मिटवण्याचे काम स्नेहल रुमडे यांनी केले आहे. गावात शांतता राहावी, यासाठी तंटे होऊच नये, अशी भूमिका रुमडे यांनी ठेवली होती. गावात छोटे वाद झाल्यानंतर थेट घटनास्थळी पोहोचून रुमडे त्या वादावर तत्काळ तोडगा काढण्याची पध्दत आहे. परंतु वाद सोडविताना त्यांना वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले. तंटे सोडविताना अनेक कटू अनुभवही आल्याचे त्यांनी सांगितले.रुमडे यांनी वाडापेठ येथे नळपाणी योजनेबरोबर गटारे, रस्त्यांची सोय केली. गावात महिलांचे बचत गट स्थापन करुन महिलांच्या हाताला काम दिले. गेली अनेक वर्षे गावात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नव्हती. रुमडे यांनी शासनाच्या माध्यमातून तीन स्मशानशेड उभारल्या आहेत. अंगणवाडीसेविका म्हणून कार्यरत असलेल्या रुमडे यांना जिल्ह्यात तंटामुक्त अभियान सुरू झाले, त्याचवर्षी त्यांना नेतृत्त्वाची संधी मिळाली. महिलांनी तंटामुक्त अभियानात सक्रिय होणे आवश्यक आहे.