शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पेयजल योजनेतून एकच वाडी वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

राजापूर : राजापूर शहरानजीकच्या कोंढे तर्फ राजापूर ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना तसेच घरोघरी नळ ...

राजापूर : राजापूर शहरानजीकच्या कोंढे तर्फ राजापूर ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना तसेच घरोघरी नळ देण्याच्या योजनेतूनही कुवळेकरवाडीला वगळण्यात आले आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या कारभारामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, याची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कुवळेकरवाडीतील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोंढे तर्फ राजापूर ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत असताना अचानक सरपंच व ग्रामसेवक यांनी कुवळेकरवाडीला या योजनेतून वगळले आहे. गेली दोन वर्षे या योजनेचे काम सुरु असून, या योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्यात येत नाही. या योजनेचे झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. योजनेसाठी पाईपलाईन टाकताना संबंधित जमीन मालकांची संमतीपत्रे घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे भविष्यात या योजनेत अडचणी येऊन योजना बंद पडण्याची शक्यता आहे.

या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून, ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. ही योजना संपूर्ण गावासाठी असल्याने प्रत्येक वाडीला पाणी मिळाल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे या योजनेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

घरोघरी नळजोडणी देण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे निविदा काढण्यात आली आहे. त्यामध्येही कुवळेकरवाडीला वगळण्यात आले आहे. सरपंच व ग्रामसेवकांच्या या कारभारामुळे कुवळेकरवाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकांच्या कारभाराची चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर उपरसपंच यशवंत कुवळेकर, ग्रामपंचायत सदस्य दक्षता कुवळेकर, माजी सदस्य मुकेश कुवळेकर यांच्यासह ३५ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.