शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

जिल्ह्यात एकच गटशिक्षणाधिकारी

By admin | Updated: October 18, 2015 00:21 IST

रत्नागिरी जिल्हा : आठ तालुक्यांचा शिक्षणाचा कारभार प्रभारींकडे

रहिम दलाल, रत्नागिरी : शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात पुढे असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा डाव शासनाचा असल्याचे पुढे येत आहे. कारण जिल्ह्यात नऊ पैकी आठ तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कारभार प्रभारींकडे आहे. केवळ दापोली पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात प्रथम आला. मात्र, या जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत चालली आहे. कारण जिल्ह्याच्या शैक्षणिक विकास साधणाऱ्या शिक्षण विभागामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. पटसंख्या पडताळणीची धडक मोहीम राज्यभरात राबवण्यात आली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एखादं दुसरं उदाहरण वगळता बोगस पटसंख्या नसल्याचे समोर आले होते. शिक्षणाच्या कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्याही असली पाहिजे. मात्र, शिक्षकांची भरतीच झाली नसल्याने शासनाच्या या धोरणाचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे शासन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. मात्र, उपक्रम राबवण्यासाठी तालुक्याचा शिक्षण विभागाचा प्रमुख असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्याची पदेच रिक्त ठेवण्यात आली आहेत. आधीच जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असतानाही येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा बदलीनंतर सोडण्यात आले. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमध्ये आणखी भर पडली. आधीच ही पदे रिक्त असताना शासनाने अविचारीपणे गटशिक्षणाधिकाऱ्यांची बदली करुन ही पदे रिक्त ठेवली. यामागे जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यात दापोली तालुका वगळता मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गटशिक्षण अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदभरती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे बऱ्याचवेळा केली आहे. मात्र, शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे भरतीची मागणी करुनही या पदांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.