शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

जिल्ह्यात एकच गटशिक्षणाधिकारी

By admin | Updated: October 18, 2015 00:21 IST

रत्नागिरी जिल्हा : आठ तालुक्यांचा शिक्षणाचा कारभार प्रभारींकडे

रहिम दलाल, रत्नागिरी : शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात पुढे असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा डाव शासनाचा असल्याचे पुढे येत आहे. कारण जिल्ह्यात नऊ पैकी आठ तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कारभार प्रभारींकडे आहे. केवळ दापोली पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात प्रथम आला. मात्र, या जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत चालली आहे. कारण जिल्ह्याच्या शैक्षणिक विकास साधणाऱ्या शिक्षण विभागामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. पटसंख्या पडताळणीची धडक मोहीम राज्यभरात राबवण्यात आली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एखादं दुसरं उदाहरण वगळता बोगस पटसंख्या नसल्याचे समोर आले होते. शिक्षणाच्या कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्याही असली पाहिजे. मात्र, शिक्षकांची भरतीच झाली नसल्याने शासनाच्या या धोरणाचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे शासन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. मात्र, उपक्रम राबवण्यासाठी तालुक्याचा शिक्षण विभागाचा प्रमुख असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्याची पदेच रिक्त ठेवण्यात आली आहेत. आधीच जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असतानाही येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा बदलीनंतर सोडण्यात आले. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमध्ये आणखी भर पडली. आधीच ही पदे रिक्त असताना शासनाने अविचारीपणे गटशिक्षणाधिकाऱ्यांची बदली करुन ही पदे रिक्त ठेवली. यामागे जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यात दापोली तालुका वगळता मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गटशिक्षण अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदभरती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे बऱ्याचवेळा केली आहे. मात्र, शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे भरतीची मागणी करुनही या पदांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.