शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

दापाेलीत केवळ २४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा -किरीट सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:33 IST

दापोली : कोरोनाचे थैमान राज्याच्या ग्रामीण भागात वाढत चालले असून, कोरोनावर उपाययोजना करण्यात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. ...

दापोली : कोरोनाचे थैमान राज्याच्या ग्रामीण भागात वाढत चालले असून, कोरोनावर उपाययोजना करण्यात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात केवळ २४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असून, नियमानुसार तो किमान तीन दिवस उपलब्ध असणे गरजेचे आहे. जर वेळेत ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर २४ रुग्णांचे प्राण संकटात येऊ शकतात, अशी भीती भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

दापोली उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी माजी खा. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांनी सोमय्या यांना कोविड सेंटरची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, कोरोनाला अंकुश लावण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. मात्र, राज्याने ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या मात्र केल्या जात नाहीत, असा आराेप त्यांनी केला.

कोरोनाच्या लसीबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, जगामध्ये केवळ ७ कंपन्यांना कोविडवरची लस उत्पादन करण्याची परवानगी असून, त्यातील २ कंपन्या या भारतामध्ये आहेत. या कंपन्या किती उत्पादन करू शकतात, याची पूर्ण कल्पना ही राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना आहे. मात्र, आपल्या अपयशाचे खापर केंद्रावर फोडायचे म्हणून केंद्र सरकार लस पुरवत नाही, असा खोटा प्रचार केला जात आहे. वस्तुस्थितीत मात्र केंद्राकडून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा हा महाराष्ट्राला केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने प्रत्येक राज्य सरकारला लस खरेदीचा अधिकार दिला असून, महाराष्ट्र सरकारने मात्र अद्याप कोणतीही लस खरेदी केलेली नाही. मात्र, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली असून, ही लस राज्य सरकारने खरेदी केल्याचे सांगितले जात असले तरी केंद्राच्या कोट्यातीलच लस वापरण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

राज्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असून राज्याचे आरोग्यमंत्री मात्र जालना व पुणे या भागाकडेच जास्त लक्ष देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. वस्तुस्थिती पाहून हे मंत्री बोलत नाहीत. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय त्यांना झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनय नातू, उपाध्यक्ष केदार साठे, दीपक महाजन, भाऊ इदाते, तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्मिता जावकर, शहराध्यक्ष संदीप केळकर, जिल्हा सरचिटणीस संजय सावंत, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

.................................

दापाेली उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची माजी खा. किरीट साेमय्या यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महेश भागवत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित हाेते.