शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

एकमेव सेलिब्रिटीही मतदारांनी नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:04 IST

रत्नागिरी : नाट्य-चित्रपटातील सेलिब्रिटी आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असाच एक प्रयोग १९९८ ...

रत्नागिरी : नाट्य-चित्रपटातील सेलिब्रिटी आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असाच एक प्रयोग १९९८ साली करण्यात आला. मालवणी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र, हा एकमेव सेलिब्रिटीही मतदारांनी नाकारला.राजकीय पदे, त्यातील मानमरातब, त्यातून मिळणारे अधिकार याचे आकर्षण सेलिब्रिटिंना असते आणि अशा सेलिब्रिटींची लोकप्रियता राजकीय पक्षांना आकर्षित करते. त्यामुळे अभिनेते-अभिनेत्रींना राजकीय रिंगणात उतरवण्याचा खेळ जुनाच आहे. दक्षिणेकडील भागात हे प्रमाण अधिक आहे.वर्षानुवर्षे बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाºया राजापूर लोकसभा मतदार संघात सेलिब्रिटिला उतरवण्याचा मोह काँग्रेसला झाला आणि त्यातूनच मच्छिंद्र कांबळी यांचे नाव पुढे आले.‘वस्त्रहरण’च्या माध्यमातून मालवणी भाषेला वलय मिळवून देणारे नाट्य-सिने अभिनेते, निर्माते म्हणून मच्छिंद्र कांबळी यांचे नाव आजही घेतले जाते. काँग्रेसने १९९८ साली त्यांना राजापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजवर निवडणूक लढवलेला हा एकमेव सेलिब्रिटी. त्यावेळी त्यांच्यासमोर शिवसेनेकडून तत्कालिन खासदार सुरेश प्रभू तर पुष्पसेन सावंत (जनता दल), नलिनी भुवड आणि किरण ठाकूर (दोन्ही अपक्ष) असे तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र, मुख्य लढत झाली ती कांबळी आणि प्रभू यांच्यामध्येच. त्यात कांबळी यांना १ लाख ५२ हजार ७२४ मते मिळाली. यावेळी २ लाख १७ हजार ७६६ मते मिळालेले सुरेश प्रभू विजयी झाले.एकदाच झाला प्रयोगकोकणातील अनेक कलाकार नाट्य-सिने क्षेत्रात प्रसिद्धीच्या झोतात आहेत. मात्र, एकदा झालेला प्रयोग फसल्यानंतर पुन्हा हा प्रयोग कोणीही केला नाही. कोकणातील मतदारांनी आजवर पक्ष पाहूनच मतदान केल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. कांबळी यांच्या निवडणुकीतही तेच अधोरेखित झाले होते.