शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

आखाड्यात पैलवान ‘तेच’

By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST

विधानसभा निवडणूक : सामंत-माने लढतीची हॅट्ट्रिक

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत, तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने निवडणूक आखाड्यात उभे ठाकले आहेत. या दोघांपैकी सामंत यांनी पक्ष बदलला आहे. मात्र, असे असले तरी या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा मुख्य लढत ही उदय सामंत व बाळ माने यांच्यातच होणार आहे. २००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी सलग दोनवेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळविला. दुसऱ्या टर्ममध्ये शेवटच्या सत्रात सामंत यांना राष्ट्रवादीने १५ महिन्यांसाठी नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपदही दिले. त्यामुळे सामंत यांचे नेतृत्व राज्यस्तरावर झळकले. दुसरीकडे बाळ माने हे १९९९ मध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर मात्र सामंत यांच्याकडून दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला आहे. परंतु त्या दोन्हीवेळची स्थिती वेगळी होती. आता महायुती तुटली आहे. भाजपा व सेना आमने - सामने ठाकली आहे. स्वबळावरच ही निवडणूक लढविली जात असल्याने अत्यंत अटीतटीचा सामना होणार हे नक्की आहे. भाजपातर्फे यंदा सलग चौथ्यांदा निवडणूक आखाड्यात असलेले बाळ माने हे यावेळी खचलेले दिसत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात संपर्क ठेवताना कार्यकर्त्यांची कामे केली आहेत. कार्यकर्त्यांच्या सुखदु:खात सहभागी झाले आहेत. मागील दोन निवडणुकांमधील आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी जय्यत तयारी केली. युतीतील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते दुधातील साखरेप्रमाणे मिसळले. मात्र, यावेळी महायुती तुटली. परंतु त्याचा काहीही परिणाम होणार नाही. युती तुटली असली तरी शिवसैनिकांशी मतभेद नाहीत. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा माने यांनी केला आहे. दुसरीकडे पालकमंत्री म्हणून काम केलेले उदय सामंत यावेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले असून, राष्ट्रवादीतील हजारो कार्यकर्ते आपल्याबरोबर आल्याचा त्यांचा दावा आहे. त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यात ९४ पैकी ६८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तालुक्यात गावागावात सेनेच्या शाखा आहेत. त्यामुळे हा मुद्दा सामंत यांच्या पथ्यावर पडणारा आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी सेनेत आलेल्या सामंत यांना शिवसैनिकांनी स्विकारले, तर त्यांचा विजय कठीण नाही. परंतु माने यांच्या दाव्याप्रमाणे शिवसैनिकांशी त्यांचे मनभेद नाहीत, या विधानात तथ्य असेल तर ही सामंत यांच्यासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. अत्यंत वेगळ्या स्थितीत ही निवडणूक होत असल्यानेच सामंत यांची विजयाची हॅट्ट्रिक होणार की माने यांची पराभवाची मालिका खंडित होणार याकडेच आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येत्या आठवडाभरात याबाबतचे चित्र अधिकच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)पक्ष बदलला, लढतीची समीकरणे बदलली.जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत ठरण्याची अपेक्षा.सामना अटीतटीचा होण्याची शक्यता.शिवसैनिकांशी मतभेद नसल्याचा माने यांचा दावा.मानेंचा दावा खरा ठरल्यास सामंतांसाठी धोक्याची घंटा.