शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत केवळ २५ टक्केच पाऊस

By admin | Updated: July 16, 2015 23:00 IST

पर्यटकांमध्ये दापोलीची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून निर्माण झाली आहे.

शेतकरी चिंताग्रस्त : पावसाचा अनुशेष बाकीचदापोली : पावसाळा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत गेल्या १० वर्षांचा विचार केल्यास चार महिन्यांमध्ये दापोली तालुक्यात साधारणपणे ३८०० ते ४ हजार मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी अद्याप दापोलीत आतापर्यंत केवळ १०६७ मिलिमीटर पाऊस बरसल्याने उर्वरित साधारण पातळीपर्यंत पाऊस कधी पडणार? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.पर्यटकांमध्ये दापोलीची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पाऊस अनियमितपणे बरसत असल्याने तालुक्यात पावसाचा अनुशेष तसाच बाकी आहे. दापोलीत यापूर्वी प्रचंड प्रमाणात आणि नियमित स्वरूपात पाऊस पडत असल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहात असल्याचे चित्र होते. मात्र, यंदा केवळ दोन दिवस सलग पडलेल्या पावसाने ओढे, नद्यांना पूर आल्याचे चित्र नव्हते.केवळ नद्या, नाल्यांमधील घाण साफ करण्याचे काम या पावसाने केले. मात्र, त्यानंतर आजतागायत पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणी पूर्ण केलेला शेतकरीवर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, हव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने अनेक ठिकाणी वरकस पट्ट्यात भातशेतीतील पाणी पूर्ण सुकून गेली असून, पिके पिवळी पडत चालली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण असून, पावसाने आणखीन दगा दिल्यास लावलेले भात शेतातच मरून पडण्याची शक्यता आहे. गेले आठ ते दहा दिवस तुरळक सरी वगळता पाऊस गायब असून त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणीही साचून राहत नाही. त्यामुळे शेती सुकून जात आहे.दरम्यान, ज्या ठिकाणी भातशेतीच्या जवळ ओढे, नाले आहेत आणि जेथून पाणी घेता येणे शक्य आहे, अशा ठिकाणी शेतकरी हे पाणी भातशेतीकडे वळवताना दिसत आहेत. मात्र, असे असले तरी बहुतांश ठिकाणी ओढ्यांतील पाणी पूर्णपणे आटल्याने भातशेतीला पाण्याचा पुरवठा कुठून करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)दापोली तालुक्यात अन्य तालुक्यांच्या मानाने पावसाचे प्रमाण अजूनही जास्त आहे. मात्र, प्रतिवर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे शेती संकटात सापडत आहे. यंदाही पाऊस गायब झाल्याने भातशेती संकटात सापडली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच लावणीची कामे उरकली, त्यांच्या शेतात पावसाअभावी पाणी नसल्याने शेतजमीन पूर्णत: सुकून गेली असून, आणखी दोन दिवस पाऊस न झाल्यास शेती पिवळी पडण्याची भीती आहे.