शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत केवळ २५ टक्केच पाऊस

By admin | Updated: July 16, 2015 23:00 IST

पर्यटकांमध्ये दापोलीची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून निर्माण झाली आहे.

शेतकरी चिंताग्रस्त : पावसाचा अनुशेष बाकीचदापोली : पावसाळा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत गेल्या १० वर्षांचा विचार केल्यास चार महिन्यांमध्ये दापोली तालुक्यात साधारणपणे ३८०० ते ४ हजार मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी अद्याप दापोलीत आतापर्यंत केवळ १०६७ मिलिमीटर पाऊस बरसल्याने उर्वरित साधारण पातळीपर्यंत पाऊस कधी पडणार? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.पर्यटकांमध्ये दापोलीची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पाऊस अनियमितपणे बरसत असल्याने तालुक्यात पावसाचा अनुशेष तसाच बाकी आहे. दापोलीत यापूर्वी प्रचंड प्रमाणात आणि नियमित स्वरूपात पाऊस पडत असल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहात असल्याचे चित्र होते. मात्र, यंदा केवळ दोन दिवस सलग पडलेल्या पावसाने ओढे, नद्यांना पूर आल्याचे चित्र नव्हते.केवळ नद्या, नाल्यांमधील घाण साफ करण्याचे काम या पावसाने केले. मात्र, त्यानंतर आजतागायत पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणी पूर्ण केलेला शेतकरीवर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, हव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने अनेक ठिकाणी वरकस पट्ट्यात भातशेतीतील पाणी पूर्ण सुकून गेली असून, पिके पिवळी पडत चालली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण असून, पावसाने आणखीन दगा दिल्यास लावलेले भात शेतातच मरून पडण्याची शक्यता आहे. गेले आठ ते दहा दिवस तुरळक सरी वगळता पाऊस गायब असून त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणीही साचून राहत नाही. त्यामुळे शेती सुकून जात आहे.दरम्यान, ज्या ठिकाणी भातशेतीच्या जवळ ओढे, नाले आहेत आणि जेथून पाणी घेता येणे शक्य आहे, अशा ठिकाणी शेतकरी हे पाणी भातशेतीकडे वळवताना दिसत आहेत. मात्र, असे असले तरी बहुतांश ठिकाणी ओढ्यांतील पाणी पूर्णपणे आटल्याने भातशेतीला पाण्याचा पुरवठा कुठून करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)दापोली तालुक्यात अन्य तालुक्यांच्या मानाने पावसाचे प्रमाण अजूनही जास्त आहे. मात्र, प्रतिवर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे शेती संकटात सापडत आहे. यंदाही पाऊस गायब झाल्याने भातशेती संकटात सापडली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच लावणीची कामे उरकली, त्यांच्या शेतात पावसाअभावी पाणी नसल्याने शेतजमीन पूर्णत: सुकून गेली असून, आणखी दोन दिवस पाऊस न झाल्यास शेती पिवळी पडण्याची भीती आहे.