शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

दापोलीत केवळ २५ टक्केच पाऊस

By admin | Updated: July 16, 2015 23:00 IST

पर्यटकांमध्ये दापोलीची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून निर्माण झाली आहे.

शेतकरी चिंताग्रस्त : पावसाचा अनुशेष बाकीचदापोली : पावसाळा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत गेल्या १० वर्षांचा विचार केल्यास चार महिन्यांमध्ये दापोली तालुक्यात साधारणपणे ३८०० ते ४ हजार मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी अद्याप दापोलीत आतापर्यंत केवळ १०६७ मिलिमीटर पाऊस बरसल्याने उर्वरित साधारण पातळीपर्यंत पाऊस कधी पडणार? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.पर्यटकांमध्ये दापोलीची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पाऊस अनियमितपणे बरसत असल्याने तालुक्यात पावसाचा अनुशेष तसाच बाकी आहे. दापोलीत यापूर्वी प्रचंड प्रमाणात आणि नियमित स्वरूपात पाऊस पडत असल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहात असल्याचे चित्र होते. मात्र, यंदा केवळ दोन दिवस सलग पडलेल्या पावसाने ओढे, नद्यांना पूर आल्याचे चित्र नव्हते.केवळ नद्या, नाल्यांमधील घाण साफ करण्याचे काम या पावसाने केले. मात्र, त्यानंतर आजतागायत पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणी पूर्ण केलेला शेतकरीवर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, हव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने अनेक ठिकाणी वरकस पट्ट्यात भातशेतीतील पाणी पूर्ण सुकून गेली असून, पिके पिवळी पडत चालली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण असून, पावसाने आणखीन दगा दिल्यास लावलेले भात शेतातच मरून पडण्याची शक्यता आहे. गेले आठ ते दहा दिवस तुरळक सरी वगळता पाऊस गायब असून त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणीही साचून राहत नाही. त्यामुळे शेती सुकून जात आहे.दरम्यान, ज्या ठिकाणी भातशेतीच्या जवळ ओढे, नाले आहेत आणि जेथून पाणी घेता येणे शक्य आहे, अशा ठिकाणी शेतकरी हे पाणी भातशेतीकडे वळवताना दिसत आहेत. मात्र, असे असले तरी बहुतांश ठिकाणी ओढ्यांतील पाणी पूर्णपणे आटल्याने भातशेतीला पाण्याचा पुरवठा कुठून करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)दापोली तालुक्यात अन्य तालुक्यांच्या मानाने पावसाचे प्रमाण अजूनही जास्त आहे. मात्र, प्रतिवर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे शेती संकटात सापडत आहे. यंदाही पाऊस गायब झाल्याने भातशेती संकटात सापडली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच लावणीची कामे उरकली, त्यांच्या शेतात पावसाअभावी पाणी नसल्याने शेतजमीन पूर्णत: सुकून गेली असून, आणखी दोन दिवस पाऊस न झाल्यास शेती पिवळी पडण्याची भीती आहे.