शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन निकाल; शासन अनभिज्ञ

By admin | Updated: December 16, 2014 23:46 IST

चिरेखाणींवरील बंदी उठली : जिल्हा प्रशासनाला अद्याप मार्गदर्शन नाही

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिस्थगनाखाली असलेल्या गावांवरील बंदी उठली असली तरी अद्याप शासनाकडून तसा कोणताच आदेश आला नसल्याने जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील चिरेखाण व्यावसायिकांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे. न्यायालयाच्या आॅनलाईन आदेशाने जिल्हा प्रशासन चिरेखाणींवर बंदी आणू शकते, तर आता बंदी उठवल्याचा निकालही आॅनलाईन आहे. तरीही प्रशासनाकडून निर्णय मिळण्यास विलंब का? असा सवाल या व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात चिरेखाणीचा विषय आता ऐरणीवर आला आ६हे. चिरेखाणीवरील बंदी उठली असली तरी याबाबत प्रशासनाला आदेश प्राप्त न झाल्याने प्रशासनच संभ्रमात पडले आहे. मध्यंतरीच्या काळात खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यांमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणारी २९२ गावे वगळून ६३४ गावांवरील अधिस्थगन उठविण्यात आले होते. मात्र, यावर पुन्हा आवाज फाऊंडेशनने उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली. त्यामुळे या पाच तालुक्यांतील सर्वच ९९६ गावांमध्ये पुन्हा गौण खनिज बंदी कायम राहिली. यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती.त्यानुसार न्यायालयाने राज्य शासन, आवाज फाऊंडेशन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालय यांच्याकडून हरकती मागवल्या होत्या. मात्र, बंदी उठण्यास आवाज फाऊंडेशन आणि राज्य शासन यांच्याकडून कोणतीच हरकत आलेली नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही अनुकुलता दर्शविली. त्यामुळे न्यायालयाने गेल्या बुधवारी या व्यावसायिकांच्या बाजूने निर्णय देत या पाच तालुक्यांतील इको सेन्सेटिव्ह झोनमधील २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांवरील बंदी उठविण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचा निर्णय संघटनेला लेखी स्वरूपात पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर हा निर्णय आॅनलाईनही पाहण्यास खुला आहे. मात्र, एवढे दिवस उलटूनही शासनाकडून याविषयी जिल्हा प्रशासनाला कोणत्याच मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही याप्रकरणी अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे न्यायालयाचा निकाल आॅनलाईन पडूनही तो पाहण्यास शासनाला वेळ नाही की शासनच बेदखल राहात आहे, असा सवाल चिरेखाण व्यावसायिकांकडून होत आहे.दरम्यान आता चिरेखाणी सुरू असल्या तर स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे चिरेखाणीवरील बंदी उठूनही त्याचा फायदा न होता चिरेखाण व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले आहेत. (प्रतिनिधी)उच्च न्यायालयाच्या आॅनलाईन आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांवर जिल्हा प्रशासनाकडून लगेचच बंदी घालण्यात आली होती. आता ती बंदी उठविल्याचा निकालही आॅनलाईन आहे. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीच हालचाल दिसत नाही. चिरेखाण व्यावसायिक आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्याकडील निर्णयाची लेखी प्रत सादर करणार आहेत.- रवींद्र जठार, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा चिरेखाण व्यावसायिक संघटना उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय वृत्तपत्रांमधूनच वाचण्यात आला आहे. वरिष्ठ स्तरावरून अद्याप मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्या मिळताच व्यावसायिकांकडून ताबडतोब प्रस्ताव स्वीकारण्यात येतील.- गोपाळ निगुडकर, अपर जिल्हाधिकारी, रत्नागिरी