शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

आॅनलाईन खरेदी खत रेंगाळले

By admin | Updated: April 13, 2015 00:09 IST

गुहागर तालुका : तलाठ्यांची होतेय अडचण, खरेदी खत व्यवहारावर परिणाम

गुहागर : गुहागर तालुक्यातील सातबारा संगणकीकरण तसेच खरेदी खत वारस तपास आदी सर्व प्रकारच्या नोंदी आॅनलाईन पद्धतीने करण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मात्र, महिनाभरात अद्याप एकही खरेदी खत नोंदविले गेले नसल्याने आॅनलाईन कामकाज पद्धत येथील तलाठ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे.सर्वत्र सातबारा संगणीकरण करणे शासनाचा उद्देश आहे. यासाठी रत्नागिरी लांजासह मंडणगड व गुहागर या लहान तालुक्यांची निवड प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे. यासाठी तलाठ्यांना पहिल्या टप्प्यात लॅपटॉप देण्यात आले होते. यासाठी सर्व सातबारे संगणकावर नोंदणी करण्यात आले होते. आता पुढील टप्प्यात नव्याने होणारी खरेदी खते, वारस तपास, फेरफार व इतर सर्व प्रकारच्या नोंदी या आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासनाने एक विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर बनवून घेतले आहे. हे सॉफ्टवेअर सर्व तलाठ्यांच्या लॅपटॉलपला लोड करण्यात आले असून ते खोलण्यासाठी विशिष्ट कोड देण्यात आले आहे. आॅनलाईन पद्धतीने नोंदी होताना खरेदी खतासह विशिष्ट प्रकारच्या निवडक नोंदीचाच यामध्ये समावेश आहे.आजच्या स्थितीत अनेक तलाठ्यांना लॅपटॉप हाताळता येत नाही, हे वस्तुस्थिती आहे. अशा तलाठ्यांकडून दुसऱ्या तलाठ्यांना आपले काम करून देण्याची विनवणी करावी लागत आहे. तर नव्याने रुजू झालेले काही तलाठ्यांना संगणक हाताळण्याचे चांगले ज्ञान आहे.पण प्रत्यक्षात या नोंदी घालताना सॉफ्टवेअरमध्येच काही त्रुटी राहिल्याने या नोंदी घेतल्या जात नाहीत, तर काही नोंदी योग्य प्रकारे झाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्ष सातबारावर दिसत नाहीत. अशा अनेक वेगवेगळ्या विचित्र अनुभवांमुळे तलाठी हतबल झाले आहेत. एका नोंदीसाठी कधी एक तास तर कधी पाच तास एवढा वेळ देऊनही अखेर हाती काहीच लागत नसल्याने अखेर गुहागर तालुका तलाठी संघटनेने प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.गुहागर तालुक्यात गेल्या महिनाभरात झालेल्या खरेदीखतांमध्ये अद्याप एकही खरेदी खत नोंदवले गेलेले नाही. यामुळे खरेदी खत करणारे तलाठ्यांकडे वारंवार विचारणा करताना दिसत असून शासनाच्या चुकीच्या कामकाज पद्धतीबाबत संताप व्यक्त करत असून याबाबत योग्य सुधारणा केल्यानंतर याची अंमलबजावणी करावी तोपर्यंत जुन्या पद्धतीनेच लेखी नोंदी मंजूर कराव्यात अशी मागणी असून याबाबत पुढे काय होणार याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)याबाबतची गंभीर दखल प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी घेतली असून तलाठ्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अशा नोंदी नक्की का होत नाहीत याची प्रत्यक्ष पहाणी करणार असल्याचे समजते. तसेच या संगणीकृत एकमेव असून ते स्वत: येथे येऊन तलाठ्यांना न होणाऱ्या नोंदीबाबत समस्या जाणून घेणार असल्याने लवकरच याबाबत शासनस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा केली जातआहे. हा निर्णय लवकरच अपेक्षीत असल्याचे बोलले जातेय.