शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

आॅनलाईन खरेदी खत रेंगाळले

By admin | Updated: April 13, 2015 00:09 IST

गुहागर तालुका : तलाठ्यांची होतेय अडचण, खरेदी खत व्यवहारावर परिणाम

गुहागर : गुहागर तालुक्यातील सातबारा संगणकीकरण तसेच खरेदी खत वारस तपास आदी सर्व प्रकारच्या नोंदी आॅनलाईन पद्धतीने करण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मात्र, महिनाभरात अद्याप एकही खरेदी खत नोंदविले गेले नसल्याने आॅनलाईन कामकाज पद्धत येथील तलाठ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे.सर्वत्र सातबारा संगणीकरण करणे शासनाचा उद्देश आहे. यासाठी रत्नागिरी लांजासह मंडणगड व गुहागर या लहान तालुक्यांची निवड प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे. यासाठी तलाठ्यांना पहिल्या टप्प्यात लॅपटॉप देण्यात आले होते. यासाठी सर्व सातबारे संगणकावर नोंदणी करण्यात आले होते. आता पुढील टप्प्यात नव्याने होणारी खरेदी खते, वारस तपास, फेरफार व इतर सर्व प्रकारच्या नोंदी या आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासनाने एक विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर बनवून घेतले आहे. हे सॉफ्टवेअर सर्व तलाठ्यांच्या लॅपटॉलपला लोड करण्यात आले असून ते खोलण्यासाठी विशिष्ट कोड देण्यात आले आहे. आॅनलाईन पद्धतीने नोंदी होताना खरेदी खतासह विशिष्ट प्रकारच्या निवडक नोंदीचाच यामध्ये समावेश आहे.आजच्या स्थितीत अनेक तलाठ्यांना लॅपटॉप हाताळता येत नाही, हे वस्तुस्थिती आहे. अशा तलाठ्यांकडून दुसऱ्या तलाठ्यांना आपले काम करून देण्याची विनवणी करावी लागत आहे. तर नव्याने रुजू झालेले काही तलाठ्यांना संगणक हाताळण्याचे चांगले ज्ञान आहे.पण प्रत्यक्षात या नोंदी घालताना सॉफ्टवेअरमध्येच काही त्रुटी राहिल्याने या नोंदी घेतल्या जात नाहीत, तर काही नोंदी योग्य प्रकारे झाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्ष सातबारावर दिसत नाहीत. अशा अनेक वेगवेगळ्या विचित्र अनुभवांमुळे तलाठी हतबल झाले आहेत. एका नोंदीसाठी कधी एक तास तर कधी पाच तास एवढा वेळ देऊनही अखेर हाती काहीच लागत नसल्याने अखेर गुहागर तालुका तलाठी संघटनेने प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.गुहागर तालुक्यात गेल्या महिनाभरात झालेल्या खरेदीखतांमध्ये अद्याप एकही खरेदी खत नोंदवले गेलेले नाही. यामुळे खरेदी खत करणारे तलाठ्यांकडे वारंवार विचारणा करताना दिसत असून शासनाच्या चुकीच्या कामकाज पद्धतीबाबत संताप व्यक्त करत असून याबाबत योग्य सुधारणा केल्यानंतर याची अंमलबजावणी करावी तोपर्यंत जुन्या पद्धतीनेच लेखी नोंदी मंजूर कराव्यात अशी मागणी असून याबाबत पुढे काय होणार याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)याबाबतची गंभीर दखल प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी घेतली असून तलाठ्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अशा नोंदी नक्की का होत नाहीत याची प्रत्यक्ष पहाणी करणार असल्याचे समजते. तसेच या संगणीकृत एकमेव असून ते स्वत: येथे येऊन तलाठ्यांना न होणाऱ्या नोंदीबाबत समस्या जाणून घेणार असल्याने लवकरच याबाबत शासनस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा केली जातआहे. हा निर्णय लवकरच अपेक्षीत असल्याचे बोलले जातेय.