शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

ऑनलाईनचाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आठवडाभराचा कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. एकूणच विचित्र परिस्थितीत शाळांचे कामकाज दि.१५ जून ...

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आठवडाभराचा कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. एकूणच विचित्र परिस्थितीत शाळांचे कामकाज दि.१५ जून पासून सुरू झाले, तर अध्यापन मात्र यावर्षीही ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे. गावा-गावातून कोरोनाने प्रवेश केला असल्याने जिल्हा परिषदेने शाळा ताब्यात घेऊन शाळांमध्येच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमालीची वाढली असून, मृतांची संख्याही वाढतच आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शाळा व शाळांमधील अध्यापन सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे ऑनलाईन हाच उपाय सध्या तरी याेग्य आहे. भौगोलिकदृष्ट्या वाडी-वस्तीवर विखुरलेल्या लोकसंख्येमुळे शाळा असल्या, तरी मोबाईलची रेंज या शाळांमध्ये पोहोचलेली नाही. त्यामुळे या शाळांना ऑनलाईन अध्यापन पध्दतीचा उपयोग नाही. शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आसपासच्या गावातून ये-ज़ा करावी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्या कमालीची वाढली असल्याने प्रत्यक्ष अध्यापनासाठी पालक किती तयार होतील, याबाबत शंकाच आहे.

जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळेतून पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येत असली, तरी वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करावेच लागते. नव्या वह्या, पुस्तकांचा गंध नक्कीच मोहित करतो. त्यामुळे शाळेचा कंटाळा करणारे विद्यार्थीही पहिल्या दिवसाची आवर्जून प्रतीक्षा करतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्यादिवशी नवागताचे स्वागत केले जाते. वाजतगाजत मिरवणूक काढली जाते, पारंपरिक पध्दतीने औक्षण केले जाते. शाळेच्या पोषण आहारात त्यादिवशी चक्क गोड पदार्थांचा बेत आखला जातो. त्यामुळे बालमित्रांनाही शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरता लागते. परंतु गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे शाळेपासून दुरावलेले बालमित्र हिरमुसले आहेत. घरात राहून कंटाळलेल्यांनाही शाळेची ओढ लागली आहे.

शहरातील काही शाळांनी मात्र दहावीचे वर्ग ऑनलाईन पध्दतीने सुरू केले असून, अन्य वर्गही याचपध्दतीने सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी पालकांचे व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्यावर काही सूचना सुरू केल्या आहेत. ऑनलाईन अध्यापन पध्दतीमुळे वेळेची मर्यादा असल्याने गणित, विज्ञानसारख्या विषयांच्या आकलनावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी, प्रत्यक्ष शाळा इतक्यात सुरू होणे अशक्य आहे. गतवर्षीप्रमाणे ऑनलाईनच अध्यापनाचा पर्याय योग्य आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्यादिवशीही मुलांचे प्रत्यक्ष स्वागत न होता ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे.