शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
3
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
4
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
5
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
6
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
7
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
8
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
9
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
11
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
12
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
13
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
14
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
15
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
16
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
17
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
18
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
19
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
20
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ऑनलाईनचाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आठवडाभराचा कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. एकूणच विचित्र परिस्थितीत शाळांचे कामकाज दि.१५ जून ...

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आठवडाभराचा कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. एकूणच विचित्र परिस्थितीत शाळांचे कामकाज दि.१५ जून पासून सुरू झाले, तर अध्यापन मात्र यावर्षीही ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे. गावा-गावातून कोरोनाने प्रवेश केला असल्याने जिल्हा परिषदेने शाळा ताब्यात घेऊन शाळांमध्येच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमालीची वाढली असून, मृतांची संख्याही वाढतच आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शाळा व शाळांमधील अध्यापन सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे ऑनलाईन हाच उपाय सध्या तरी याेग्य आहे. भौगोलिकदृष्ट्या वाडी-वस्तीवर विखुरलेल्या लोकसंख्येमुळे शाळा असल्या, तरी मोबाईलची रेंज या शाळांमध्ये पोहोचलेली नाही. त्यामुळे या शाळांना ऑनलाईन अध्यापन पध्दतीचा उपयोग नाही. शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आसपासच्या गावातून ये-ज़ा करावी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्या कमालीची वाढली असल्याने प्रत्यक्ष अध्यापनासाठी पालक किती तयार होतील, याबाबत शंकाच आहे.

जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळेतून पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येत असली, तरी वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करावेच लागते. नव्या वह्या, पुस्तकांचा गंध नक्कीच मोहित करतो. त्यामुळे शाळेचा कंटाळा करणारे विद्यार्थीही पहिल्या दिवसाची आवर्जून प्रतीक्षा करतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्यादिवशी नवागताचे स्वागत केले जाते. वाजतगाजत मिरवणूक काढली जाते, पारंपरिक पध्दतीने औक्षण केले जाते. शाळेच्या पोषण आहारात त्यादिवशी चक्क गोड पदार्थांचा बेत आखला जातो. त्यामुळे बालमित्रांनाही शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरता लागते. परंतु गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे शाळेपासून दुरावलेले बालमित्र हिरमुसले आहेत. घरात राहून कंटाळलेल्यांनाही शाळेची ओढ लागली आहे.

शहरातील काही शाळांनी मात्र दहावीचे वर्ग ऑनलाईन पध्दतीने सुरू केले असून, अन्य वर्गही याचपध्दतीने सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी पालकांचे व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्यावर काही सूचना सुरू केल्या आहेत. ऑनलाईन अध्यापन पध्दतीमुळे वेळेची मर्यादा असल्याने गणित, विज्ञानसारख्या विषयांच्या आकलनावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी, प्रत्यक्ष शाळा इतक्यात सुरू होणे अशक्य आहे. गतवर्षीप्रमाणे ऑनलाईनच अध्यापनाचा पर्याय योग्य आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्यादिवशीही मुलांचे प्रत्यक्ष स्वागत न होता ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे.