शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

कांद्याचे दर स्थिर, मात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

भाजीपाला, फळांच्या मागणीत वाढ, आवक घटली लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये भाजीपाला, फळांची आवक कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच ...

भाजीपाला, फळांच्या मागणीत वाढ, आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये भाजीपाला, फळांची आवक कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच मुंबईतून होत आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला, फळांची आवक घटली आहे. मात्र, मागणीत वाढ झाली असून दरही कडाडले आहेत. बटाट्याच्या दरात वाढ झाली असून कांद्याचे दर मात्र स्थिर आहेत. कोरोना व रमजान यामुळे फळांना मागणी अधिक होत आहे.

मे महिन्यात साधारणत: साठवणुकीच्या कांद्याची खरेदी सुरू होते. वाळलेला व ओला दोन्ही प्रकारचा कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. १२ ते १५ रुपये दराने कांदा विक्री सुरू आहे. बटाट्याचे दर वधारले असून २५ ते ३० रुपये दराने विक्री सुरू आहे. भाज्या मात्र १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांची जुडी १० ते १५ रुपये दराने विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातून भाजी व फळे विक्रेते गाड्या घेऊन विक्री व्यवसाय करीत आहेत. कांद्याचे दर आणखी खाली येणे ग्राहकांना अपेक्षित आहे.

सध्या भाजीपाला आवक घटली असल्याने दरात वाढ झाली आहे. १५ ते २० रुपये पाव किलो दराने भाजीपाला विक्री सुरू आहे. दर शंभरीच्या पटीत असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कडधान्यांच्याही दरात वाढ झाली असल्याने दैनंदिन आहारात भाज्या, कडधान्यांची सांगड कशी घालावी असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.

अननस मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असून ३५ ते ४५ रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. कच्चे, पिकलेले अननसाचे दर आकारावर ठरत असून हातगाडी घेऊन विक्रेते विक्रीसाठी फिरत आहेत.

सध्या रमजान मास सुरू असल्याने फळांना वाढती मागणी आहे. अन्य फळांच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना केळी खरेदीच परवडत आहेत. ४० ते ५० रुपये डझन दराने केळी विक्री सुरू आहे. गावठी केळी ६० ते ८० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत.

गेली दोन वर्षे लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात महागाईने उच्चांक गाठला आहे. शासनाचे महागाईवर निर्बंध नसल्याने सर्वसामान्यांपुढे समस्या उभारली आहे.

- ऋतुजा पाटील, गृहिणी

महागाईच्या परिणामामुळे दररोजचा डाळभातच महागला आहे. खाद्यतेलासह डाळी, कडधान्ये, भाजीपाल्याचे दर सतत वाढत असल्याने आर्थिक गणितेच विस्कटली आहेत.

- हेमलता देसाई, गृहिणी