शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कांद्याचे दर स्थिर, मात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

भाजीपाला, फळांच्या मागणीत वाढ, आवक घटली लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये भाजीपाला, फळांची आवक कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच ...

भाजीपाला, फळांच्या मागणीत वाढ, आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये भाजीपाला, फळांची आवक कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच मुंबईतून होत आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला, फळांची आवक घटली आहे. मात्र, मागणीत वाढ झाली असून दरही कडाडले आहेत. बटाट्याच्या दरात वाढ झाली असून कांद्याचे दर मात्र स्थिर आहेत. कोरोना व रमजान यामुळे फळांना मागणी अधिक होत आहे.

मे महिन्यात साधारणत: साठवणुकीच्या कांद्याची खरेदी सुरू होते. वाळलेला व ओला दोन्ही प्रकारचा कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. १२ ते १५ रुपये दराने कांदा विक्री सुरू आहे. बटाट्याचे दर वधारले असून २५ ते ३० रुपये दराने विक्री सुरू आहे. भाज्या मात्र १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांची जुडी १० ते १५ रुपये दराने विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातून भाजी व फळे विक्रेते गाड्या घेऊन विक्री व्यवसाय करीत आहेत. कांद्याचे दर आणखी खाली येणे ग्राहकांना अपेक्षित आहे.

सध्या भाजीपाला आवक घटली असल्याने दरात वाढ झाली आहे. १५ ते २० रुपये पाव किलो दराने भाजीपाला विक्री सुरू आहे. दर शंभरीच्या पटीत असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कडधान्यांच्याही दरात वाढ झाली असल्याने दैनंदिन आहारात भाज्या, कडधान्यांची सांगड कशी घालावी असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.

अननस मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असून ३५ ते ४५ रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. कच्चे, पिकलेले अननसाचे दर आकारावर ठरत असून हातगाडी घेऊन विक्रेते विक्रीसाठी फिरत आहेत.

सध्या रमजान मास सुरू असल्याने फळांना वाढती मागणी आहे. अन्य फळांच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना केळी खरेदीच परवडत आहेत. ४० ते ५० रुपये डझन दराने केळी विक्री सुरू आहे. गावठी केळी ६० ते ८० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत.

गेली दोन वर्षे लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात महागाईने उच्चांक गाठला आहे. शासनाचे महागाईवर निर्बंध नसल्याने सर्वसामान्यांपुढे समस्या उभारली आहे.

- ऋतुजा पाटील, गृहिणी

महागाईच्या परिणामामुळे दररोजचा डाळभातच महागला आहे. खाद्यतेलासह डाळी, कडधान्ये, भाजीपाल्याचे दर सतत वाढत असल्याने आर्थिक गणितेच विस्कटली आहेत.

- हेमलता देसाई, गृहिणी