शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे दर स्थिर, मात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

भाजीपाला, फळांच्या मागणीत वाढ, आवक घटली लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये भाजीपाला, फळांची आवक कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच ...

भाजीपाला, फळांच्या मागणीत वाढ, आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये भाजीपाला, फळांची आवक कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच मुंबईतून होत आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला, फळांची आवक घटली आहे. मात्र, मागणीत वाढ झाली असून दरही कडाडले आहेत. बटाट्याच्या दरात वाढ झाली असून कांद्याचे दर मात्र स्थिर आहेत. कोरोना व रमजान यामुळे फळांना मागणी अधिक होत आहे.

मे महिन्यात साधारणत: साठवणुकीच्या कांद्याची खरेदी सुरू होते. वाळलेला व ओला दोन्ही प्रकारचा कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. १२ ते १५ रुपये दराने कांदा विक्री सुरू आहे. बटाट्याचे दर वधारले असून २५ ते ३० रुपये दराने विक्री सुरू आहे. भाज्या मात्र १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांची जुडी १० ते १५ रुपये दराने विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातून भाजी व फळे विक्रेते गाड्या घेऊन विक्री व्यवसाय करीत आहेत. कांद्याचे दर आणखी खाली येणे ग्राहकांना अपेक्षित आहे.

सध्या भाजीपाला आवक घटली असल्याने दरात वाढ झाली आहे. १५ ते २० रुपये पाव किलो दराने भाजीपाला विक्री सुरू आहे. दर शंभरीच्या पटीत असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कडधान्यांच्याही दरात वाढ झाली असल्याने दैनंदिन आहारात भाज्या, कडधान्यांची सांगड कशी घालावी असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.

अननस मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असून ३५ ते ४५ रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. कच्चे, पिकलेले अननसाचे दर आकारावर ठरत असून हातगाडी घेऊन विक्रेते विक्रीसाठी फिरत आहेत.

सध्या रमजान मास सुरू असल्याने फळांना वाढती मागणी आहे. अन्य फळांच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना केळी खरेदीच परवडत आहेत. ४० ते ५० रुपये डझन दराने केळी विक्री सुरू आहे. गावठी केळी ६० ते ८० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत.

गेली दोन वर्षे लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात महागाईने उच्चांक गाठला आहे. शासनाचे महागाईवर निर्बंध नसल्याने सर्वसामान्यांपुढे समस्या उभारली आहे.

- ऋतुजा पाटील, गृहिणी

महागाईच्या परिणामामुळे दररोजचा डाळभातच महागला आहे. खाद्यतेलासह डाळी, कडधान्ये, भाजीपाल्याचे दर सतत वाढत असल्याने आर्थिक गणितेच विस्कटली आहेत.

- हेमलता देसाई, गृहिणी