शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

वाशिष्ठी पुलावरून एकेरी वाहतुकीचा १५ जूनचा मुहूर्तही हुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत शहरातील वाशिष्ठी नदीवरील बहादूर शेखनाका पुलावरून एकेरी वाहतुकीसाठी अखेरचा १५ जूनचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत शहरातील वाशिष्ठी नदीवरील बहादूर शेखनाका पुलावरून एकेरी वाहतुकीसाठी अखेरचा १५ जूनचा मुहूर्त काढला आहे. मात्र, अजूनही पुलाचा स्लॅब, गर्डरजोडणी, दोन्ही बाजूंनी जोडरस्त्याचे काम बाकी असल्याने हाही मुहूर्त हुकण्याची चिन्हे आहेत.

काही दिवसांपूर्वी चिपळूण दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी बहादूर शेखनाका पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी अचानक भेट दिली. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, ईगल कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आर.आर. मराठे, कर्मचारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या पुलावरून कोणत्याही परिस्थितीत १५ जूनपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होईल, असे स्पष्ट केले होते.

मुळात येथील जुना पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे. या नवीन पुलाच्या ५६ गर्डरपैकी ४९ गर्डर पिलरवर चढविण्याचे काम याआधीच पूर्ण झाले होते. त्यानंतर आता उर्वरित गर्डरही चढविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गर्डर चढविण्यासाठी आणलेली यंत्रणा गुरुवारी पाठवून देण्यात आली. आता या पुलाच्या जोडरस्त्यासाठी भरावाचे काम सुरू केले आहे. हे जोडरस्त्याचे काम पूर्ण होताच तातडीने पुलावरील स्लॅब व संरक्षक कठडा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने तूर्तास १५ जूनचा मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

----------------------------------

वाशिष्ठी नदीवरील पुलाचे गर्डर चढविण्याचे काम पूर्ण झाले असल्याने आता कामाला वेग येऊ शकतो. मात्र, मध्यंतरी काही कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने कामगारसंख्या घटली आहे. त्यामुळे कामाचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र, तरीही १५ जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- आर.आर. मराठे, प्रभारी उपअभियंता, महामार्ग विभाग

---------------------------

बहादूर शेखनाका येथील वाशिष्ठी पूल अजून किमान तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकत नाही. पुलावरील गर्डर जोडणे, स्लॅब टाकणे, जोडरस्ता उभारणे, संरक्षक कठडा आदी कामे बाकी आहेत. हे काम १५ जूनपर्यंत होणे अशक्य आहे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी ते काम त्वरित मार्गी लागणे शक्य नाही. महामार्ग विभागाने पावसाळा लक्षात घेत आवश्यक असलेल्या उपाययोजनांची तयारी आतापासूनच करायला हवी.

- शौकत मुकादम, माजी सभापती, पंचायत समिती, चिपळूण

-----------------------

मुंबई-गोवा महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या वाशिष्ठी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, आता कळंबस्तेच्या बाजूने जोडरस्ता उभारण्याचे काम सुरू आहे. (छाया : संदीप बांद्रे)