शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

वाशिष्ठी पुलावरून एकेरी वाहतुकीचा १५ जूनचा मुहूर्तही हुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत शहरातील वाशिष्ठी नदीवरील बहादूर शेखनाका पुलावरून एकेरी वाहतुकीसाठी अखेरचा १५ जूनचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत शहरातील वाशिष्ठी नदीवरील बहादूर शेखनाका पुलावरून एकेरी वाहतुकीसाठी अखेरचा १५ जूनचा मुहूर्त काढला आहे. मात्र, अजूनही पुलाचा स्लॅब, गर्डरजोडणी, दोन्ही बाजूंनी जोडरस्त्याचे काम बाकी असल्याने हाही मुहूर्त हुकण्याची चिन्हे आहेत.

काही दिवसांपूर्वी चिपळूण दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी बहादूर शेखनाका पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी अचानक भेट दिली. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, ईगल कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आर.आर. मराठे, कर्मचारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या पुलावरून कोणत्याही परिस्थितीत १५ जूनपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होईल, असे स्पष्ट केले होते.

मुळात येथील जुना पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे. या नवीन पुलाच्या ५६ गर्डरपैकी ४९ गर्डर पिलरवर चढविण्याचे काम याआधीच पूर्ण झाले होते. त्यानंतर आता उर्वरित गर्डरही चढविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गर्डर चढविण्यासाठी आणलेली यंत्रणा गुरुवारी पाठवून देण्यात आली. आता या पुलाच्या जोडरस्त्यासाठी भरावाचे काम सुरू केले आहे. हे जोडरस्त्याचे काम पूर्ण होताच तातडीने पुलावरील स्लॅब व संरक्षक कठडा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने तूर्तास १५ जूनचा मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

----------------------------------

वाशिष्ठी नदीवरील पुलाचे गर्डर चढविण्याचे काम पूर्ण झाले असल्याने आता कामाला वेग येऊ शकतो. मात्र, मध्यंतरी काही कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने कामगारसंख्या घटली आहे. त्यामुळे कामाचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र, तरीही १५ जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- आर.आर. मराठे, प्रभारी उपअभियंता, महामार्ग विभाग

---------------------------

बहादूर शेखनाका येथील वाशिष्ठी पूल अजून किमान तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकत नाही. पुलावरील गर्डर जोडणे, स्लॅब टाकणे, जोडरस्ता उभारणे, संरक्षक कठडा आदी कामे बाकी आहेत. हे काम १५ जूनपर्यंत होणे अशक्य आहे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी ते काम त्वरित मार्गी लागणे शक्य नाही. महामार्ग विभागाने पावसाळा लक्षात घेत आवश्यक असलेल्या उपाययोजनांची तयारी आतापासूनच करायला हवी.

- शौकत मुकादम, माजी सभापती, पंचायत समिती, चिपळूण

-----------------------

मुंबई-गोवा महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या वाशिष्ठी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, आता कळंबस्तेच्या बाजूने जोडरस्ता उभारण्याचे काम सुरू आहे. (छाया : संदीप बांद्रे)