शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

पुरामुळे जिल्ह्यात एक हजार हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:31 AM

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये लागवड केलेली भातशेती वाहून गेल्याने जिल्ह्यातील एक हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात ...

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये लागवड केलेली भातशेती वाहून गेल्याने जिल्ह्यातील एक हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंचनामे सुरू झाले असून, नुकसानीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संततधार पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील नद्यांना पूर आला होता. पुराचे पाणी लगतच्या गावांमध्ये शिरले होते. २४ तासांपेक्षा अधिक काळ पाणी राहिल्याने मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. शिवाय भातशेतीलाही फटका बसला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात भात लावणीची कामे पूर्ण झालेली होती. त्याचवेळी पूर आल्याने भातशेती वाहून गेली आहे. काही ठिकाणी लागवड करू दोन-तीन दिवस झाले होते. पुराच्या पाण्याबरोबर माती, दगड शेतात आले आहेत. अद्याप काही ठिकाणी भात खाचरातून पाणी साचले आहे. पूर ओसरल्यानंतर कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र फूटभर पाणी असल्यामुळे नुकसानीचा अंदाज घेणे अशक्य झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, चार दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हरचिरी, चांदेराई, तोणदे, पोमेंडी, टेंबे, सोमेश्वर, चिंचखरी या गावांतील भातशेतीचे नुकसान झाले आहे. चिंचखरी येथील बांधलेला बंधारा फुटल्यामुळे शेतकरी हेमंत फाटक यांच्या शेतात खारे पाणी आले होते. बंधाऱ्याचा पंधरा फूट रुंदीचा भाग कोसळल्याने नुकसान झाले आहे. गेले तेरा दिवस भात शेती पाण्याखाली राहिल्यामुळे नुकसान झाले आहे. काजळी नदीकिनारी असलेल्या पोंमेंडीतील शेतकऱ्यांच्या शेतात पूर्ण गाळ साचून राहिला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चिपळूण तालुक्यात ५३६ हेक्टर, संगमेश्वरात ३०३ हेक्टर, राजापूर १०० हेक्टर, रत्नागिरी ६० हेक्टर, खेड तालुक्यात ३२ हेक्टरचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

..................

पुरामुळे जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून, रत्नागिरी तालुक्यातही काम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कृषी विभागाचे कर्मचारी पाहणी करीत आहेत. लवकरच पंचनाम्यांचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी