शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे जिल्ह्यात एक हजार हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये लागवड केलेली भातशेती वाहून गेल्याने जिल्ह्यातील एक हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात ...

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये लागवड केलेली भातशेती वाहून गेल्याने जिल्ह्यातील एक हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंचनामे सुरू झाले असून, नुकसानीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संततधार पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील नद्यांना पूर आला होता. पुराचे पाणी लगतच्या गावांमध्ये शिरले होते. २४ तासांपेक्षा अधिक काळ पाणी राहिल्याने मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. शिवाय भातशेतीलाही फटका बसला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात भात लावणीची कामे पूर्ण झालेली होती. त्याचवेळी पूर आल्याने भातशेती वाहून गेली आहे. काही ठिकाणी लागवड करू दोन-तीन दिवस झाले होते. पुराच्या पाण्याबरोबर माती, दगड शेतात आले आहेत. अद्याप काही ठिकाणी भात खाचरातून पाणी साचले आहे. पूर ओसरल्यानंतर कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र फूटभर पाणी असल्यामुळे नुकसानीचा अंदाज घेणे अशक्य झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, चार दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हरचिरी, चांदेराई, तोणदे, पोमेंडी, टेंबे, सोमेश्वर, चिंचखरी या गावांतील भातशेतीचे नुकसान झाले आहे. चिंचखरी येथील बांधलेला बंधारा फुटल्यामुळे शेतकरी हेमंत फाटक यांच्या शेतात खारे पाणी आले होते. बंधाऱ्याचा पंधरा फूट रुंदीचा भाग कोसळल्याने नुकसान झाले आहे. गेले तेरा दिवस भात शेती पाण्याखाली राहिल्यामुळे नुकसान झाले आहे. काजळी नदीकिनारी असलेल्या पोंमेंडीतील शेतकऱ्यांच्या शेतात पूर्ण गाळ साचून राहिला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चिपळूण तालुक्यात ५३६ हेक्टर, संगमेश्वरात ३०३ हेक्टर, राजापूर १०० हेक्टर, रत्नागिरी ६० हेक्टर, खेड तालुक्यात ३२ हेक्टरचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

..................

पुरामुळे जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून, रत्नागिरी तालुक्यातही काम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कृषी विभागाचे कर्मचारी पाहणी करीत आहेत. लवकरच पंचनाम्यांचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी