शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

पुरामुळे जिल्ह्यात एक हजार हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये लागवड केलेली भातशेती वाहून गेल्याने जिल्ह्यातील एक हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात ...

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये लागवड केलेली भातशेती वाहून गेल्याने जिल्ह्यातील एक हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंचनामे सुरू झाले असून, नुकसानीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संततधार पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील नद्यांना पूर आला होता. पुराचे पाणी लगतच्या गावांमध्ये शिरले होते. २४ तासांपेक्षा अधिक काळ पाणी राहिल्याने मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. शिवाय भातशेतीलाही फटका बसला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात भात लावणीची कामे पूर्ण झालेली होती. त्याचवेळी पूर आल्याने भातशेती वाहून गेली आहे. काही ठिकाणी लागवड करू दोन-तीन दिवस झाले होते. पुराच्या पाण्याबरोबर माती, दगड शेतात आले आहेत. अद्याप काही ठिकाणी भात खाचरातून पाणी साचले आहे. पूर ओसरल्यानंतर कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र फूटभर पाणी असल्यामुळे नुकसानीचा अंदाज घेणे अशक्य झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, चार दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हरचिरी, चांदेराई, तोणदे, पोमेंडी, टेंबे, सोमेश्वर, चिंचखरी या गावांतील भातशेतीचे नुकसान झाले आहे. चिंचखरी येथील बांधलेला बंधारा फुटल्यामुळे शेतकरी हेमंत फाटक यांच्या शेतात खारे पाणी आले होते. बंधाऱ्याचा पंधरा फूट रुंदीचा भाग कोसळल्याने नुकसान झाले आहे. गेले तेरा दिवस भात शेती पाण्याखाली राहिल्यामुळे नुकसान झाले आहे. काजळी नदीकिनारी असलेल्या पोंमेंडीतील शेतकऱ्यांच्या शेतात पूर्ण गाळ साचून राहिला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चिपळूण तालुक्यात ५३६ हेक्टर, संगमेश्वरात ३०३ हेक्टर, राजापूर १०० हेक्टर, रत्नागिरी ६० हेक्टर, खेड तालुक्यात ३२ हेक्टरचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

..................

पुरामुळे जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून, रत्नागिरी तालुक्यातही काम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कृषी विभागाचे कर्मचारी पाहणी करीत आहेत. लवकरच पंचनाम्यांचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी