शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

पेट्रोलसाठी शेतकऱ्यांची प्रशासनाकडून अडवणूक; बविआचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

एकप्रकारे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने शेतकऱ्यांवर हुकूमशाही सुरू केलेली असल्याचे कुळ्ये यांनी सांगितले. ...

एकप्रकारे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने शेतकऱ्यांवर हुकूमशाही सुरू केलेली असल्याचे कुळ्ये यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रशासन आणि त्यांना नाचवणारे लोकप्रतिनिधी येथील नागरिकांच्या समस्यांचे कोणतेही सोयरसुतक नसल्यासारखे वागत आहेत. व्यापारी वर्गाशी चर्चा करून लॉकडाऊन लावला जातो, पण येथील सामान्य शेतकऱ्यांशी कधी चर्चा करणार? असा सवाल तानाजी कुळ्ये यांनी केला आहे. शेती हंगामासाठी नियोजन करणे आवश्यक असताना प्रशासन अपयशी ठरले आहे.

गेले दोन महिने सर्वसामान्य माणसांबरोबरच येथील शेतकरी, कष्टकरी लॉकडाऊन काळात घरी आहेत. हाताला काम नाही, त्यामुळे पैसा नाही, पैसा नाही म्हणून किराणा नाही. अशा परिस्थितीत नैराश्येच्या गर्तेत अडकलेला आहे. अनेक सामान्यकुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत. पोलिसांनीही शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे, शेतीसाठी लागणारे बियाणे, पॉवर ट्रिलर, खते, इंधन आदी कृषी विषयक खरेदीसाठी शेतकरी ये-जा करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांची जर अशापकारे अडवणूक होत असेल तर त्यांना शेतीसाठी पेट्रोल-डिझेल जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची मागणीही कुळ्ये यांनी केली आहे.