शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

शून्य पटसंख्येच्या शाळांची संख्या घटणार

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

जिल्हा परिषद : शाळाबाह्य सर्वेक्षण मोहिमेचा फायदा ?

रत्नागिरी : इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागली आहे. दरवर्षी शून्य पटसंख्येच्या शाळांमध्ये वाढ होत असलेली दिसून येत आहे. मात्र, शासनातर्फे राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण मोहिमेमुळे त्यांना शालेय प्रवाहात सामील करून घेण्यात येत आहे. या उपक्रमामुळे यावर्षी शून्य पटाच्या शाळांची संख्या कमी होणार असल्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा आहेत. २०१४-१५मध्ये शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा १६६ आहेत. ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ३०८ इतक्या आहेत. ११ ते १५ पटसंख्या असलेल्या शाळा ३५९ तर १६ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा ३३७ इतक्या आहेत. ही संख्या गतवर्षीची असली तरी पटसंख्येची खरी आकडेवारी पटपडताळणीनंतर सप्टेंबरपर्यंत स्पष्ट होईल. परंतु शाळाबाह्य सर्वेक्षणामुळे मुलांना शाळेच्या प्रवाहात आणल्यामुळे कमी पटसंख्येत काही अंशी का होईना निश्चितच भर पडली आहे.शासनातर्फे शाळाबाह्य मुलांसाठी राबवण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातून ३२८ शाळाबाह्य मुले सापडली. त्यामध्ये १८६ मुलगे, तर १३२ मुलींचा समावेश आहे. मंडणगड तालुक्यात ३७, दापोली ३०, खेड १६, गुहागर ८४, चिपळूण ४२, संगमेश्वर १९, रत्नागिरी ४६, लांजा ८, राजापूर १३, रत्नागिरी शहर १३ मिळून एकूण ३३८ शाळाबाह्य मुलांची नोंदणी करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधून प्रवेश देऊन बसविणे सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांच्या एकूण पटसंख्येत ३२८ विद्यार्थ्यांची वाढ झाल्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. शून्य पटसंख्येमुळे शाळेतील शिक्षकांना समायोजित करावे लागते. त्यामुळे शिक्षकही पटसंख्या ढासळू नये, यासाठी घरोघरी जाऊन पालकांची मनधरणी करत आहेत. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा.२०१४-१५मध्ये शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा १६६.सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातून ३२८ शाळाबाह्य.शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधून प्रवेश देण्याचे काम सुरु.